शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

कुंभी कासारी साखर कारखाना ३०४५ एकरक्कमी एफआरपी देणार; चंद्रदीप नरके यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 15:21 IST

Chandradip Narke : महाराष्ट्रात सहकारी तत्वावरील कारखाने हे शेतकऱ्यांचेच आहेत. ते शेतकऱ्यांच्या मालकीचे राहणे काळाची गरज आहे.

प्रकाश पाटील

कोल्हापूर - कुडीत्रे (ता.करवीर) येथील कुंभी कासारी साखर कारखाना या वर्षी ३०४५ रूपये प्रति टन एकरकमी एफआरपी देणार आहे. स्वर्गीय डी सी नरके यांच्या शेतकरी, कामगार, ऊस तोडणी वाहतूकदार यांच्या हित सांभाळण्याचे दिलेल्या तत्वावर आमची वाटचाल सुरू असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष माजी आमंदार चंद्रदीप नरके यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले.

आज ५९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपण कार्यक्रमात चंद्रदीप नरके बोलत होते. संचालक विलास पाटील व त्यांच्या पत्नी कल्पना पाटील यांच्या हस्ते बॉयलर अग्नीप्रदिपन कार्यक्रम पार पडला. यावेळी उपाध्यक्ष निवास वातकर प्रमुख उपस्थित होते.

अध्यक्ष नरके म्हणाले, "एफआरपी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. पण एफआरपी ठरवताना त्या पासून तयार होणाऱ्या साखरेला मिळणाऱ्या हमी भावाची सरकार कडून कोणतीच तजवीज केली जात नाही. गेल्या चार वर्षांपासून साखरेला मिळणारा दर व एफआरपी यात मोठी तफावत आहे. कुंभी कासारी कारखान्यावर आर्थिक संकटे आली तरी शेतकरी सभासद, कामगार व तोडणी वाहतूकदार यांना शासन ज्या सोयी सवलती जाहीर करेल त्या दिल्या आहेत.

महाराष्ट्रात सहकारी तत्वावरील कारखाने हे शेतकऱ्यांचेच आहेत. ते शेतकऱ्यांच्या मालकीचे राहणे काळाची गरज आहे. यासाठी शासनाने ३६ रूपये साखरेला हमी भाव द्यावा अशी मागणी नरके यांनी केली. ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांनी आपला पीकवलेला सर्व कारखान्याला पुरवठा करावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक अशोक पाटील, सचिव प्रशांत पाटील, शेती अधिकारी संजय साळवी, मुख्य अभियंता संजय पाटील, चिफ केमिस्ट प्रकाश पाटील उपस्थित होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी