शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
4
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
5
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
6
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
7
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
8
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
9
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
10
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
11
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
12
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
13
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
14
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
15
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
16
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
17
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
18
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
19
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
20
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या जागांबाबत  कोल्हापूर जिल्हा परिषदेचे प्रशासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 17:04 IST

खुल्या जागा ताब्यात घेण्याचा मुद्दा जिल्हा परिषदेने अर्धवट सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याआधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

ठळक मुद्देसुरू केलेले प्रयत्न सोडले अर्धवट, मोहीम हाती घेण्याची गरज

समीर देशपांडे 

 कोल्हापूर : खुल्या जागा ताब्यात घेण्याचा मुद्दा जिल्हा परिषदेने अर्धवट सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याआधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी याबाबत नियोजन केले होते. मात्र आता हा मुद्दा मागे पडला आहे. 

गेले दोन वर्षे विविध वसाहती विकसित झाल्यानंतर त्यातील खुल्या जागा ताब्यात घेण्याबाबत जिल्हा परिषद प्रयत्न करीत आहे. यासाठी एक फॉर्मही तयार करण्यात आला असून, गेल्या वर्षी हा फॉर्म गटविकास अधिकाऱ्यांना पाठवून माहिती मागविण्यात आली होती. मात्र सहा महिने उलटले तरी ही माहिती जिल्हा परिषदेला मिळाली नव्हती. ग्रामपंचायतींच्या खुल्या जागांचा ताबा देण्यासाठी मूळ मालक कधीच तयार होत नाही आणि ग्रामपंचायतीची यंत्रणाही त्यासाठी फारसे प्रयत्न करीत नाही. गावपातळीवर लागेबांधे असल्याने अनेकदा यासाठी पाठपुरावाही केला जात नाही. परिणामी अनेक वर्षे ही जागा मूळ मालकाच्या नावेच राहते आणि मग महसूल खात्यातील ‘नेमक्यांना’ गाठून गुंठेवारी करून ही सार्वजनिक जागाही विकून खाण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. दीड वर्षापूर्वी  ‘लोकमत’ने हा विषय ऐरणीवर आणला. अशातच पाचगाव, शिंगणापूर येथे सार्वजनिक जागाही घशात घालण्याचे प्रकार उघडकीस आले. 

‘लोकमत’ने याबाबत वस्तुस्थिती मांडल्यानंतर याबाबत हालचाली गतिमान झाल्या होत्या. करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी तर यासाठी जिल्हा परिषदेत करवीर तालुक्यातील मोठ्या गावांतील ग्रामसेवकांची बैठकही घेतली होती. इच्छाशक्तीचा अभावशासनाचा याबाबत नियम असतानाही तो धाब्यावर बसवून अनेक रिकाम्या जागा घशात घालण्याचे प्रकार सुरू आहेत. मोठमोठ्या शहरांजवळील जागांच्या किमती प्रचंड असल्याने महसूल विभागाच्याअधिकाऱ्यांना हाताशी धरून गुंठेवारी करून या जागा विकल्या जात आहेत. तरीही जिल्हा परिषदेकडून याबाबत ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र समोर आले असून केवळ इच्छाशक्तीचा अभाव हेच यामागील कारण असल्याचे दिसते. ..............................मानसिकता तयार झालीयगेली दोन वर्षे ‘लोकमत’ने हा विषय लावून धरला आहे. त्यामुळे शिंगणापूर येथील खुल्या जागा विक्रीची गुंठेवारी मंजूर करणाºया प्रांताधिकाऱ्यांनाही दणका बसला असून, ही मंजुरी रद्द करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागानेही मध्यंतरी चांगली वातावरण निर्र्मिती केली होती. सचिन इथापे यांनी बैठक घेतल्यानंतर अशा खुल्या जागा ग्रामपंचायतीकडे जमा करण्याची मानसिकता झाली होती. मात्र पुन्हा हे प्रयत्न थंडावले आहेत.  

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर