शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

कोल्हापूर : ‘त्या’ दोघा समाजकंटकाना तडीपार करणार : सुरज गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 19:10 IST

गिरगाव (ता. करवीर) येथील दोन्ही समाजात तेढ निर्माण होईल, असा आक्षेपार्ह मॅसेज वॉटस्अ‍ॅपवरून प्रसारित करणारे समाजकंठक संशयित संग्राम भिकाजी कांबळे (वय १९), अरुण अशोक पाटील (२०, दोघे रा. गिरगाव) या दोघांना जिल्ह्यातून तडीपार करणार आहे.

ठळक मुद्दे‘त्या’ दोघा समाजकंटकाना तडीपार करणार : सुरज गुरवजातीय तेड निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार : शांतता बैठकीत इशारा

कोल्हापूर : गिरगाव (ता. करवीर) येथील दोन्ही समाजात तेढ निर्माण होईल, असा आक्षेपार्ह मॅसेज वॉटस्अ‍ॅपवरून प्रसारित करणारे समाजकंठक संशयित संग्राम भिकाजी कांबळे (वय १९), अरुण अशोक पाटील (२०, दोघे रा. गिरगाव) या दोघांना जिल्ह्यातून तडीपार करणार आहे.

यापुढे जातीय तेड निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असा इशारा करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी मंगळवारी दिला. घटनेच्या पार्श्वभूमिवर दोन्ही समाजातील लोकांची गांधीनगर पोलीस ठाण्यात शांतता बैठकीचे आयोजन केले होते.गिरगाव येथील आकाश संजय खेडकर या तरुणाच्या मोबाईलवर आक्षेपार्ह मजकूर पाठविल्याने गावात दोन्ही समाजामध्ये तणाव पसरला. याप्रकरणी इस्पूर्ली पोलिसांनी दलित समाजाच्या संग्राम कांबळे याला अटक केली. त्यानंतर सवर्ण समाजाच्या अरुण पाटील याला अटक केली. या अटक सत्रावरुन दोन्ही समाजातील लोक घराबाहेर पडत मुख्य चौकात जमा झालेने तणाव पसरला होता.

पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव हे फौजफाट्यासह गावात दाखल झाल्याने तणाव निवाळला. पुन्हा दोन्ही समाजामध्ये वादविवाद होवू नये, यासाठी समाजातील काही प्रमुख व्यक्तिंची मंगळवारी दूपारी गांधीनगर पोलीस ठाण्यात बैठक आयोजित केली होती. यावेळी पोलीस उपअधीक्षक गुरव यांनी दोन्ही समाजातील लोकांची समजूत घालत शांततेचे आवाहन केले.

कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नये, तरुणपिढीचे शैक्षणिक नुकसान होईल. शांतता प्रस्थापीत करण्यासाठी सर्वांनी ऐकोप्याने रहावे. यावेळी गुन्हे मागे घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर गुरव यांनी गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत.

समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार आहे. अटक केलेल्या दोन्ही समाजकंटकांना जिल्ह्यातून तडीपार केले जाणार आहे. यापुढे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याची जबाबदारी दोन्ही समाजाने घ्यावी, अशा सुचना केल्या. बैठकीस दोन्ही समाजातील लोक उपस्थित होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस