शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

‘गेल्याचे’ समजून घरी आणताना परत आला जीवात ‘जीव’; मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेले पांडू तात्या म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 08:57 IST

"मी विठ्ठलाचा भक्त आहे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर मंदिरात न चुकता दररोज दर्शनासाठी जातो. पंढरीची वारी कधीही चुकली नाही."

कसबा बावडा (जि. कोल्हापूर) :  विठ्ठलामुळेच माझा पुनर्जन्म झाला आहे, त्यामुळे संक्रांत झाल्यानंतर आणि गोळ्यांचा कोर्स संपल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी जाणार असल्याचे पांडुरंग रामा उलपे ऊर्फ पांडू तात्या यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

पंधरा दिवसांपूर्वी पांडू तात्या नेहमीप्रमाणे घरी देवाची पूजा करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पत्नी बाळाबाई यांना हे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. शेजाऱ्यांना हाका मारल्या. लगेचच त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर डॉक्टरांचे उपचार सुरू होते. पण, अखेर त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी घाेषित केले.

त्यानंतर काही वेळातच कसबा बावडा उलपे मळ्यातील त्यांच्या नातेवाइकांना ही बातमी समजली. त्यानंतर अंत्यविधीची तयारी सुरू झाली. दरम्यानच्या काळात तात्यांना ॲम्ब्युलन्समधून घरी आणताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यांमुळे त्यांची पुन्हा हालचाल सुरू झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे घरी येणारी ॲम्ब्युलन्स तशीच परतावून दवाखान्यात नेली. दवाखान्यात पुन्हा उपचार सुरू झाले. तात्या उपचाराला प्रतिसाद देऊ लागले. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

४४ वर्षे वारकरी‘मी विठ्ठलाचा भक्त आहे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर मंदिरात न चुकता दररोज दर्शनासाठी जातो. पंढरीची वारी कधीही चुकली नाही’, असे पांडू तात्या सांगत होते.पांडू तात्या शेतमजूर म्हणून काम करतात. त्यांना एक मुलगी आहे. १९८० सालापासून ते वारकरी संप्रदायात आहेत. सर्वांशी मिळून मिसळून वागत. तात्यांना भेटावयास त्यांच्या घरी रीघ लागली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू