शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

‘गेल्याचे’ समजून घरी आणताना परत आला जीवात ‘जीव’; मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेले पांडू तात्या म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 08:57 IST

"मी विठ्ठलाचा भक्त आहे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर मंदिरात न चुकता दररोज दर्शनासाठी जातो. पंढरीची वारी कधीही चुकली नाही."

कसबा बावडा (जि. कोल्हापूर) :  विठ्ठलामुळेच माझा पुनर्जन्म झाला आहे, त्यामुळे संक्रांत झाल्यानंतर आणि गोळ्यांचा कोर्स संपल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी जाणार असल्याचे पांडुरंग रामा उलपे ऊर्फ पांडू तात्या यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

पंधरा दिवसांपूर्वी पांडू तात्या नेहमीप्रमाणे घरी देवाची पूजा करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पत्नी बाळाबाई यांना हे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. शेजाऱ्यांना हाका मारल्या. लगेचच त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर डॉक्टरांचे उपचार सुरू होते. पण, अखेर त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी घाेषित केले.

त्यानंतर काही वेळातच कसबा बावडा उलपे मळ्यातील त्यांच्या नातेवाइकांना ही बातमी समजली. त्यानंतर अंत्यविधीची तयारी सुरू झाली. दरम्यानच्या काळात तात्यांना ॲम्ब्युलन्समधून घरी आणताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यांमुळे त्यांची पुन्हा हालचाल सुरू झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे घरी येणारी ॲम्ब्युलन्स तशीच परतावून दवाखान्यात नेली. दवाखान्यात पुन्हा उपचार सुरू झाले. तात्या उपचाराला प्रतिसाद देऊ लागले. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

४४ वर्षे वारकरी‘मी विठ्ठलाचा भक्त आहे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर मंदिरात न चुकता दररोज दर्शनासाठी जातो. पंढरीची वारी कधीही चुकली नाही’, असे पांडू तात्या सांगत होते.पांडू तात्या शेतमजूर म्हणून काम करतात. त्यांना एक मुलगी आहे. १९८० सालापासून ते वारकरी संप्रदायात आहेत. सर्वांशी मिळून मिसळून वागत. तात्यांना भेटावयास त्यांच्या घरी रीघ लागली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू