शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कोल्हापूर : लसीकरण नाकारणे पडले महागात, जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 6:05 PM

जनावरांसाठी लाळखुरकतची लस टोचून घेण्यास नकार देणे पशुपालकांना चांगलेच महागात पडले आहे. लस न दिल्याने गेल्या पंधरा दिवसांत जवळपास १३ जनावरे दगावली असल्याचे समोर आले आहे. शासनाकडून कोणताही लाभ मिळत नसल्याने पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या लसीबाबत गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देलसीकरण नाकारणे पडले महागात, जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढलेलाळखुरकत लसींबाबत पशुपालकांत गैरसमज

कोल्हापूर : जनावरांसाठी लाळखुरकतची लस टोचून घेण्यास नकार देणे पशुपालकांना चांगलेच महागात पडले आहे. लस न दिल्याने गेल्या पंधरा दिवसांत जवळपास १३ जनावरे दगावली असल्याचे समोर आले आहे. शासनाकडून कोणताही लाभ मिळत नसल्याने पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या लसीबाबत गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्ह्यात लाळखुरकत आजाराने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. याच्या प्रतिबंधासाठी जिल्हा परिषदेने नुकतीच लसीकरण प्रक्रिया पूर्ण केली आहे. २९ पशुधन विकास अधिकारी, १९ सहायक पशुधन अधिकारी, ७२ पर्यवेक्षक, ‘गोकुळ’चे १५० डॉक्टर, कृत्रिम रेतन केंद्रावरील ३६ जण यासह खासगी प्रॅक्टिस करणारे पशुवैद्यक यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेने लाळखुरकत प्रतिबंध लसीकरण पूर्ण केले आहे. ८ लाख लसींचे ६ लाख २५ हजार ७०३ जनावरांना लसीकरण पूर्ण केले आहे. यात १ लाख ९५ हजार १३६ गाई, तर ४ लाख ३० हजार ५६७ म्हशींचा समावेश आहे.परजिल्ह्यांतून येणाऱ्या ऊसतोडणी मजुरांच्या जनावरांमध्ये या आजारांची जास्त लक्षणे दिसत असल्याने कारखान्याच्या गाडीअड्ड्यावर जाऊन लसीकरण केले आहे.

तथापि स्थानिक पातळीवर मात्र ही लस टोचून घेण्याबाबत पशुपालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज असल्याने बऱ्याच जणांनी ती टोचून घेतलेली नाही. सध्या जी जनावरे दगावली आहेत, त्यांना ही लस टोचली गेली नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे. आजच्या घडीला एका जनावराची किंमत किमान ५० हजार आहे. केवळ गैरसमजुतीने लसीकरण न करून घेतल्याने पशुपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

लसीकरणाबाबत गैरसमज

  1. सरकारी लस नको, खासगीच हवी
  2. लस टोचल्यास जनावरांना ताप येतो.
  3. जनावरे तीन दिवस दूध देत नाहीत.
  4. जनावरांच्या कासेला गाठी होतात.

 

पंधरा दिवसांत तेरा जनावरे दगावलीजिल्ह्यात गेल्या १५ दिवसात १३ जनावरे दगावली आहे. यात माणगावातील तीन, नागदेववाडी तीन, कंदलगाव चार, करनूर तीन अशी मृत झालेली जनावरे आहेत. या जनावरांना लस देण्यात पशुपालकांनीच नकार दिला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लाभ मिळण्यात अडचणीकोणत्याही आजाराने जनावर दगावले तर त्याची जबाबदारी पशुसंवर्धन विभाग घेत नाही. जिल्हा परिषदेकडून गोठा जळून जनावरे दगावली तर प्रती जनावर १० हजार रुपये मिळतात; पण आजारासाठी पैसे मिळत नाहीत. खासगी दूध संघाचा विमा असेल तर मात्र एका जनावराला किमान २० हजार रुपये तरी मिळतात. लाभ मिळण्याची प्रक्रिया अवघड असल्याने त्याच्या मागे लागण्यापेक्षा लसीकरणासाठी आग्रह धरण्याची गरज आहे.

आम्ही घरोघरी जाऊन लसीकरणासाठी आवाहन केले तरीही पशुपालक लसीकरणास सहकार्य करीत नव्हते. अचानक थंडी वाढल्याने जनावरांना ताप येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून त्यांना न्यूमोनियाही होत आहे. जनावरांना उबदार जागेत बांधण्यासह त्यांना गारवा लागणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज आहे.- डॉ. संजय शिंदे, जिल्हा पशुधन विकास अधिकारी, कोल्हापूर 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर