शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर टोलमुक्तीला १५ आॅगस्ट उजाडणार?

By admin | Updated: July 27, 2015 00:42 IST

टोल प्रश्न : अंतिम अहवाल दोन आठवड्यांत मुख्यमंत्र्यांकडे

कोल्हापूर : आयआरबीने केलेल्या रस्त्यांच्या मूल्यांकनाचा अंतिम अहवाल दोन आठवड्यांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाणार आहे. महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी साधारणत: १५ आॅगस्टदरम्यान टोलमुक्तीची घोषणा होईल, असे अधिकृत सूत्रांकडून समजले आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर टोलमुक्त करून त्याचे श्रेय घेऊन महापालिकेत भाजपने ‘कमळ’ फुलविण्याच्या दृष्टीने विविध व्यूहरचना आखल्या आहेत.एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पामधून कोल्हापुरात आयआरबी कंपनीकडून ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’(बीओटी) या तत्त्वावर रस्ते करण्यात आले. पण, या रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप कोल्हापूरच्या सर्वपक्षीय टोलविरोधी समितीसह शहरवासीयांनी केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आयआरबीच्या रस्त्यांसाठी फेरमूल्यांकन समिती नेमली आहे. चार दिवसांपूर्वी पुण्याच्या नोबेल कन्सल्टिंग कंपनीने एमएसआरडीसी व फेरमूल्यांकन समितीला मुंबईतील बैठकीत अंतिम अहवाल सादर केला. नोबेल कंपनीने रस्ते प्रकल्पाचा खर्च सुमारे १८२ कोटी व ५८ कोटी इतर खर्च असा एकूण २४० कोटी अहवालात दिला आहे. यावेळी चर्चा होऊन आता नोेबेल कंपनी रस्त्यांचा दुरुस्ती फेरमूल्यांकनाचा अंतिम अहवाल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहे आणि त्यानंतर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली असलेली उपसमिती यावर अभ्यास करणार आहे. या उपसमितीत आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके यांच्यासह ‘एमएसआरडीसी’चे अधिकारी आहेत. ही उपसमिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील आयआरबीच्या रस्ते प्रकल्पाच्या खर्चाचा अंतिम अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पाहता या निर्णयास किमान आणखी दोन आठवडे लागणार आहेत. यावरून कोल्हापूरच्या टोलमुक्तीला १५ आॅगस्ट उजाडणार असल्याचे दिसते. अर्थखात्याचे मत घेणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एमएसआरडीसी अंतिम अहवाल सादर करणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून आयआरबीच्या रस्ते प्रकल्पाचा एकूण खर्च व एमएसआरडीसीने दिलेला अहवाल यावर मत घेतील. मुनगंटीवार यांचे मत व एमएसआरडीचा अहवाल यांचा मेळ घालून कोल्हापूर टोलबाबत फडणवीस निर्णय घेतील.‘आयआरबी’च्या कोल्हापुरातील रस्ते प्रकल्पाचे मूल्यांकन योग्यरीत्या झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने यावर लवकर निर्णय घेऊन कोल्हापूर टोलमुक्त करावे.- राजेंद्र सावंत, आर्किटेक्ट तथा फेरमूल्यांकन समिती सदस्य.श्रेयवाद रंगणार...सध्या भाजप-शिवसेना यांची राज्यात सत्ता आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे, तर देवेंद्र फडणवीस हे भाजपचे आहेत. अगोदर, या दोन्ही पक्षांत कोल्हापुरात शहरात चांगली राजकीय टोलेबाजी रंगली आहे. त्यातच टोलमुक्ती झाली तर भाजप-शिवसेना यांच्यात महापालिकेच्या निवडणूक काळात श्रेयवाद रंगणार, हे निश्चित.