शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

कोल्हापूर-तिरूपती विमानसेवा बंद होण्याची शक्यता, प्रतिसाद कमी असल्याचे कंपनीचे म्हणणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 12:58 IST

जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी श्रेयवाद बाजूला ठेवून याविरोधात आवाज उठविणे गरजेचे

कोल्हापूर : कोल्हापूरकरांना तिरूपती देवस्थानाविषयी असणारी आपुलकी, दोन देवस्थानांच्या माध्यमातून दोन शहरांमध्ये जोडल्या गेलेल्या याच आध्यात्मिक स्नेहातून साडेचार वर्षांपूर्वी सुरू झालेली कोल्हापूर-तिरूपती ही विमानसेवा इंडिगो कंपनी बंद करणार आहे. या सेवेला प्रतिसाद कमी असल्याचे कारण देत कंपनीने हा निर्णय घेतला आहे. परंतु, या दोन धार्मिक क्षेत्रांना जोडण्यासाठी सुरू झालेली ही सेवा आहे. त्यावेळी शंभर टक्के प्रतिसादाची अट नव्हती.साडेचार वर्षांपूर्वी कोल्हापूर-तिरूपती ही ७५ प्रवासी क्षमता असणारी विमानसेवा इंडिगो कंपनीकडून सुरू करण्यात आली. या विमानसेवेला सुरूवातीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, आता प्रवाशांची संख्या कमी असल्याचे कारण देत कंपनीकडून येत्या १५ डिसेंबरपासून ही सेवा बंद करण्यात येत आहे. विमानतळावर कार्यरत कंपनीच्या व्यवस्थापनाला वरिष्ठ कार्यालयाने तसे कळविले आहे. तिरूपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर असंख्य भाविक अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरात येतात. हाच धागा जोडत दोन शहरांमधील आध्यात्मिक बंध या सेवेने जोडले गेले होते. मात्र, आता ही सेवा बंद केल्यास या दोन्ही मंदिरांचे दर्शन करू इच्छिणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार आहे. शिवाय, दोन्ही शहरांमधील आर्थिक उलाढालीवरही परिणाम होणार आहे.

सेवा द्यायची नसेल तर गाशा गुंडाळाही सेवा सुरू झाल्यापासून सव्वा लाखांच्या आसपास प्रवाशांनी कोल्हापूर-तिरूपती सेवेचा लाभ घेतला आहे. या सेवेला मिळणारा प्रतिसाद तसा चांगलाच आहे. पण कंपनीला शंभर टक्के प्रवाशांची अपेक्षा आहे. ती मिळत नसल्यानेच सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. कंपनीला ही सेवा द्यायची नसेल तर त्यांनी येथील व्यवस्थापन काढून घेत दुसऱ्या विमान कंपनीला सेवा सुरू करण्याची संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.

श्रेयवाद बाजूला ठेवाएकीकडे कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण करून त्याला अधिक सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. इंदौर, शिर्डेी, नागपूर या मार्गांवर नव्याने सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न चालविले जात आहेत. तर दुसरीकडे आहे त्या सेवाच बंद होत असल्याने या विमानतळाचे भवितव्य टांगणीला लागण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी श्रेयवाद बाजूला ठेवून याविरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे.

अंबाबाई व तिरूपती बालाजी या दोन देवस्थानांमध्ये पारंपरिक आध्यात्मिक नाते आहे. या विमानसेवेने ते अधिक वृद्धिंगत झाले आहे. कोल्हापुरातून तिरूपतीला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही सेवा बंद होऊ देणार नाही. यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करू. - विकासराव माने, सदस्य, कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळtirupati-pcतिरुपतीairplaneविमान