शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

कोल्हापूर : श्री जोतिबा यात्रेनिमित्त अन्नछत्र, पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 6:33 PM

श्री जोतिबा यात्रेनिमित्त शिवाजी चौक तरुण मंडळ (शिवाजी चौक)तर्फे यात्रेकरूंसाठी मोफत अन्नछत्राचा प्रारंभ माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी झाला. हे अन्नछत्र ३० मार्च ते १ एप्रिलदरम्यान सलगपणे यात्रेकरूंच्या सेवेत सुरू राहणार आहे. यंदा अन्नछत्राचे २४ वे वर्ष आहे.

ठळक मुद्देश्री जोतिबा यात्रेनिमित्त अन्नछत्रपहिल्या दिवशी हजारो भाविकांनी घेतला लाभ

कोल्हापूर : श्री जोतिबा यात्रेनिमित्त शिवाजी चौक तरुण मंडळ (शिवाजी चौक)तर्फे यात्रेकरूंसाठी मोफत अन्नछत्राचा प्रारंभ माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी झाला. हे अन्नछत्र ३० मार्च ते १ एप्रिलदरम्यान सलगपणे यात्रेकरूंच्या सेवेत सुरू राहणार आहे. यंदा अन्नछत्राचे २४ वे वर्ष आहे.

पंचगंगा नदीघाटावर या अन्नछत्रालयाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस रात्रंदिवस चालणाऱ्या या अन्नछत्रालयात सुमारे एक लाखाहून अधिक भाविक प्रसादाचा लाभ घेणार आहेत. यात मसालेभात, कुर्मापुरी, कांदा भजी, जिलेबी, शिरा, पापड, अशा पंचपक्वान्नांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या प्रसादाचा लाभ सावलीत बसून घेण्याकरिता पंचगंगा नदीघाटावर पाच हजार चौरस फुटांचा मंडप उभारण्यात आला आहे. गणेश सावंत यांनी कॅटरिंग व्यवस्था यांनी केली आहे. याकरिता १०० सहकारी कार्यरत आहेत. पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला.

मंडळाचे अध्यक्ष माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यासह उपाध्यक्ष सुहास भेंडे, चंद्रकांत स्वामी, महंमद पठाण, जगन्नाथ लिधडे यांच्या देखरेखेखाली अडीचशेहून कार्यकर्ते राबत आहेत. गेल्या वर्षी या अन्नछत्राचा लाभ सुमारे सव्वा लाखाहून अधिक भाविकांनी घेतला.दरम्यान, सौराष्ट्र कडवा पटेल समाजातर्फे रोज या ठिकाणी चार हजारांहून अधिक भाविकांसाठी सकाळी ७ ते १० या वेळेत पोहे, शिरा, उप्पीट, चहा या नाष्ट्याची सोय केली आहे. त्याचाही लाभ अनेकांनी घेतला.

अन्नछत्राच्या उद्घाटनप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, नीलेश पाटील, मनोहर चुघ, अतुल शहा, राजाभाऊ बेंडके, रमेश लालवाणी, मगनलाल ओसवाल, राजेंद्र आलूरकर, एस. के. पाटील, विजय शेटे, राजेंद्र शेटे, सतीश घोरपडे, के. के. खंडवाणी, अ‍ॅड. सुभाष हिंदुजा, गोपीशेठ वधवाणी, शशिकांत कोकाटे, सुरेश बेर्डे, जयसिंगराव कदम, आदी उपस्थित होते.

कोल्हापुरात दातृत्व असणारी माणसे भरपूर आहेत. त्यामुळे आमच्या मंडळाने गेली २४ वर्षे जोतिबा यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांची भोजनाची सोय चांगल्या प्रकारे केली आहे. यापुढेही हे दातृत्व असेच चालू राहिले आहे. मंडळाचे गेली ३८ वर्षांतील सामाजिक व विधायक उपक्रम पाहून अन्नछत्रासाठी समाजातील अनेकांनी हातभार लावला आहे.- दत्तात्रय लाड, अध्यक्ष, अन्नछत्र

 

टॅग्स :Jyotiba Chaitra Yatra 2018ज्योतिबा चैत्र यात्रा २०१८kolhapurकोल्हापूर