शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कोल्हापुरात ऊस वाहतूक रोखली, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 11:01 IST

ऊस दराचा तिढा सुटला नसतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक अडवत शेतकरी संघटनांनी कारखानदारांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.

ठळक मुद्दे

कोल्हापूर - ऊस दराचा तिढा सुटला नसतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक अडवत शेतकरी संघटनांनी कारखानदारांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी जयसिंगपूर येथे होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत पहिल्या उचलीचा बार फुटणार आहे. संघटना 3300 रुपयांची पहिली उचल देण्याची मागणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.संताजी घोरपडे कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारी वाहने शेतकऱ्यानी रात्री उशीरा अडवली. ऊस दराची कोंडी फुटल्याशिवाय ऊस तोड घेऊ नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. मात्र भोगावती परिसरात संताजी घोरपडे कारखान्याच्या तोडी सुरू आहेत. शुक्रवारी रात्री या कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारी वाहने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवत काही वाहनांची तोडफोडही केली आहे.गेल्या दोन दिवसांपासून बाचणी येथून संताजी घोरपडे कारखान्याकडे ऊस वाहतूक सुरू आहे. या कारखान्याच्या ऊस तोडी बाचणी परिसरात सुरू असल्याची माहिती संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. ऊस भरून रोज रात्री वाहने घोरपडे कारखान्याला जात असतानाच शुक्रवारी (27 ऑक्टोबर )मध्यरात्री अचानक परिते ता. करवीर येथील शेळेवाडी फाट्यावर ऊस भरून जाणाऱ्या वाहनांच्या चाकातील हवा सोडण्यात आली.संघटनेचे कार्यकर्ते दबा धरून बसले होते. ऊस दराची कोंडी जो पर्यत फोडत नाही तो पर्यत कारखाने सुरू करू नये, या शेतकरी संघटनेच्या या इशाऱ्याला न घाबरता घोरपडे कारखाना प्रशासनाने उस वाहतूक सुरूच ठेवली होती. चालू गळीत हंगामातील ऊस दराच्या आंदोलनाची पहिली ठिणगी परिते येथून पडली आहे. रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. परिते येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा ऊस वाहतुकीचा ट्रॅक्टर अडवून त्याची हवा सोडून वाहतूक बंद करण्यात आली. तसेच हेडलाईट स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले.या घटनेनंतर या मार्गावरुन सुरू असणारी ऊस वाहतूक ठप्प झाली. रात्री उशीरापर्यंत स्वाभिमानीचे कार्यकर्ते येथे थांबून होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भोगावती परिसर अध्यक्ष जनार्दन पाटील यांनी ऊस दराची कोंडी फुटल्याशिवाय कोणीही ऊस तोडी स्वीकारू नयेत, असे आवाहन करत सर्वच कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारी वाहने अडवणार असून ऊस उत्पादकांनी नुकसान टाळण्यासाठी ऊसतोड घेऊ नये, असे आवाहन केले.या आंदोलनात युवक अध्यक्ष जर्नादन पाटील, रावसाहेब डोंगळे, रंगराव पाटील, मानाजी पाटील, मनोज पाटील, रंगराव पाटील, सात्ताप्पा पाटील, बाबासो पाटील, रोहित पाटील, सुभाष पाटील, मानाजी पाटील , तानाजी बस्तवाडे या कार्यकर्त्यांनी भाग घेतला.

टॅग्स :FarmerशेतकरीRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर