शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कोल्हापुरात ऊस वाहतूक रोखली, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 11:01 IST

ऊस दराचा तिढा सुटला नसतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक अडवत शेतकरी संघटनांनी कारखानदारांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.

ठळक मुद्दे

कोल्हापूर - ऊस दराचा तिढा सुटला नसतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक अडवत शेतकरी संघटनांनी कारखानदारांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी जयसिंगपूर येथे होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत पहिल्या उचलीचा बार फुटणार आहे. संघटना 3300 रुपयांची पहिली उचल देण्याची मागणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.संताजी घोरपडे कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारी वाहने शेतकऱ्यानी रात्री उशीरा अडवली. ऊस दराची कोंडी फुटल्याशिवाय ऊस तोड घेऊ नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. मात्र भोगावती परिसरात संताजी घोरपडे कारखान्याच्या तोडी सुरू आहेत. शुक्रवारी रात्री या कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारी वाहने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवत काही वाहनांची तोडफोडही केली आहे.गेल्या दोन दिवसांपासून बाचणी येथून संताजी घोरपडे कारखान्याकडे ऊस वाहतूक सुरू आहे. या कारखान्याच्या ऊस तोडी बाचणी परिसरात सुरू असल्याची माहिती संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. ऊस भरून रोज रात्री वाहने घोरपडे कारखान्याला जात असतानाच शुक्रवारी (27 ऑक्टोबर )मध्यरात्री अचानक परिते ता. करवीर येथील शेळेवाडी फाट्यावर ऊस भरून जाणाऱ्या वाहनांच्या चाकातील हवा सोडण्यात आली.संघटनेचे कार्यकर्ते दबा धरून बसले होते. ऊस दराची कोंडी जो पर्यत फोडत नाही तो पर्यत कारखाने सुरू करू नये, या शेतकरी संघटनेच्या या इशाऱ्याला न घाबरता घोरपडे कारखाना प्रशासनाने उस वाहतूक सुरूच ठेवली होती. चालू गळीत हंगामातील ऊस दराच्या आंदोलनाची पहिली ठिणगी परिते येथून पडली आहे. रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. परिते येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा ऊस वाहतुकीचा ट्रॅक्टर अडवून त्याची हवा सोडून वाहतूक बंद करण्यात आली. तसेच हेडलाईट स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले.या घटनेनंतर या मार्गावरुन सुरू असणारी ऊस वाहतूक ठप्प झाली. रात्री उशीरापर्यंत स्वाभिमानीचे कार्यकर्ते येथे थांबून होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भोगावती परिसर अध्यक्ष जनार्दन पाटील यांनी ऊस दराची कोंडी फुटल्याशिवाय कोणीही ऊस तोडी स्वीकारू नयेत, असे आवाहन करत सर्वच कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारी वाहने अडवणार असून ऊस उत्पादकांनी नुकसान टाळण्यासाठी ऊसतोड घेऊ नये, असे आवाहन केले.या आंदोलनात युवक अध्यक्ष जर्नादन पाटील, रावसाहेब डोंगळे, रंगराव पाटील, मानाजी पाटील, मनोज पाटील, रंगराव पाटील, सात्ताप्पा पाटील, बाबासो पाटील, रोहित पाटील, सुभाष पाटील, मानाजी पाटील , तानाजी बस्तवाडे या कार्यकर्त्यांनी भाग घेतला.

टॅग्स :FarmerशेतकरीRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर