शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

कोल्हापूर- तर प्रत्येक मंत्र्यांच्या वाट्याला ‘दगड’, खोत यांच्या गाडीवरील दगडफेकीचं राजू शेट्टींकडून समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 18:12 IST

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा व्यक्ती व्देषातून नव्हेतर शेतकऱ्यांच्या रोषांचे प्रत्यंतर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीतर राज्यातील प्रत्येक मंत्र्याच्या वाट्याला असे दगड येतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

ठळक मुद्देसदाभाऊंची औकात तर काय? : राजू शेट्टीतुमची प्रतिमा तपासा : राजू शेट्टीशेतकऱ्यांच्या रोषाचे प्रत्यंतर

कोल्हापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा व्यक्तीव्देषातून नव्हेतर शेतकऱ्यांच्या रोषांचे प्रत्यंतर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीतर राज्यातील प्रत्येक मंत्र्याच्या वाट्याला असे दगड येतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

शेतकऱ्यांचे प्रश्न आवासून उभे असताना कोणी सरकारचे गुणगान गात असेल तर अशा मंत्र्याचे स्वागत कसे करायचे? असा सवालही त्यांनी केला.माढा मतदारसंघात शनिवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्याचे पडसाद संपुर्ण राज्यात उमटले आहेत. व्यक्ती व्देषातून हल्ला केल्याचा खोत यांचा आरोप खोडून काढत खासदार शेट्टी म्हणाले, सरकारच्या भूमिकेने शेतकरी हैराण झाला आहे.

ऊस उत्पादकांमध्ये कमालीचा असंतोष असून त्या रोषाचे प्रत्यंतर खोत यांना आले आहे. आतापर्यंत शेतकरी शांत होता, आता त्याचा राग बाहेर पडत आहे. आज खोत यांच्या गाडीवर दगडफेक झाली, ही परिस्थिती सुधारली नाहीतर राज्यातील सर्वच मंत्र्यांच्या वाट्याला दगड येतील, याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवले पाहिजे.सदाभाऊंची औकात तर काय?ऊस दराच्या पहिल्या उचलीवरून सध्या पेच निर्माण झाला आहे. याबाबत विचारले असता, ऊस दराचा प्रश्न सोडवण्याची औकात व कुवत नसल्याचा टोला राजू शेट्टी यांनी लगावला.

तुमची प्रतिमा तपासा‘स्वाभिमानी’च्या पायाखालची वाळू सरकल्याची टीका काही मंडळी करत आहेत, पण आमच्या पायाखालची वाळू सरकली की नाही, यापेक्षा समाजातील तुमची प्रतिमा तपासा, असा टोलाही शेट्टी यांनी राज्यमंत्री खोत यांना लगावला. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत