शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

 कोल्हापूर : गाळपाचा वेग वाढला, उतारा घटला, २0 दिवसांत २५ टक्के उसाची तोडणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 15:02 IST

यंदा कोयता आणि मशीन यांचा एकाचवेळी रपाटा सुरू झाल्याने साखर कारखान्याच्या गाळपाचा वेग वाढला आहे. कारखाने सुरू झाल्याच्या १५ ते २0 दिवसांंतच २५ टक्के क्षेत्रावरील तब्बल २0 लाख मेट्रीक टन उसाची तोडणी पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देगाळपाचा वेग वाढला, उतारा घटला, २0 दिवसांत २५ टक्के उसाची तोडणी पूर्णउसाच्या एकरी उत्पादनात ४0 टक्क्यांपर्यंत घट

नसीन सनदी

कोल्हापूर : यंदा कोयता आणि मशीन यांचा एकाचवेळी रपाटा सुरू झाल्याने साखर कारखान्याच्या गाळपाचा वेग वाढला आहे. कारखाने सुरू झाल्याच्या १५ ते २0 दिवसांंतच २५ टक्के क्षेत्रावरील तब्बल २0 लाख मेट्रीक टन उसाची तोडणी पूर्ण झाली आहे. तोडणी लवकर होत असली, तरी उसाच्या उताऱ्यात ४0 टक्क्यांपर्यंत घट दिसत आहे. जेथे एकरी ६0 टन मिळायचे, तेथे कसेबसे रडतखडत ३५ ते ४0 टनापर्यंत आकडा जात असल्याने ऊस उत्पादकांना निम्म्याहून अधिक रकमेचे नुकसान सहन करावे लागत आहे.जिल्ह्यात आजच्या घडीला २१ कारखान्यांना लावण व खोडव्यासह जवळपास २ लाख ५0 हजार हेक्टरवरील ऊस तोडणीसाठी उपलब्ध आहे. यातून ९४ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे. या वाढीव क्षेत्राच्या तोडणीसाठी परजिल्ह्यातील मजुरांवर अवलंबून राहणे गेल्यावर्षी महागात पडल्याने यावर्षी जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी तोडणी मशिनचा वापर सुरू केला आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी तोडणी मजुरांची संख्याही १0 हजारांपर्यंत गेली आहे.तोडणी वेग वाढला असला, तरी उत्पादनात लक्षणीय घट दिसत आहे. जून ते आॅगस्ट अशा तीन महिन्यांत सलग पाऊस पडल्याने सूर्यप्रकाशाअभावी उसाची अपेक्षित वाढच झालेली नाही. त्यातच महापुरामुळेही पीक हातचे गेले आहे.

हुमणी आणि लोकरी मावा व तांबेºयाने उसाच्या क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. बºयाच ठिकाणी हुमणी व माव्यामुळे ऊस अर्धवट वाळला आहे. परतीचा पाऊसही न झाल्याने पीक वाळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. साहजिकच तोडणी करताना उसाचे वजन भरेनासे झाले आहे.

ज्या क्षेत्रावर २0 टन ऊस निघायचा तेथे नऊ ते १0 टनांवर समाधान मानावे लागत आहे. एकरी उतारा ३0 ते ३५ टनांपर्यंत खाली आला आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करून उत्पादन एकरी ६0 टनाच्या पुढे गेले होते, यावर्षी त्याला निसर्गानेच खीळ घातली आहे. एफआरपी तीन हजारावर गेली, तरी उतारा निम्म्यावर आल्याने शेतकऱ्याच्या पदरात मात्र निम्मेच पैसे येणार आहेत.

प्रती एकरी ४0 टन उतारा धरला, तर १ लाख २0 हजार रुपये मिळतात. त्यातून एकरी ७५ ते ८0 हजार रुपये खर्च वजा करता शेतकऱ्यांच्या हातात ४0 हजार रुपयेच राहत आहेत. १८ महिन्यांच्या मेहनतीला एवढेच मिळत असल्याने शेतकरी अस्वस्थ आहे.

गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, चंदगड, आजरा या अतिपावसाच्या तालुक्यांमध्ये तर ऊस पूर्णपणे खुंटला आहे. तीच गत कागल, करवीरमध्ये दिसत आहे. येथे पाण्याचा निचरा होणाऱ्या ठिकाणी ऊस बऱ्यापैकी असला, तरी पाणथळ ठिकाणी उसाचे वजन मिळेनासे झाले आहे.

गडहिंग्लजमध्ये उसाचे चिपाडेच झाल्याचे दिसत आहे. हातकणंगले व शिरोळमध्ये तुलनेने चांगली परिस्थिती असली, तरी तेथेही हुमणी व लोकरी माव्याचा मोठा फटका बसला आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांचा हंगाम इको केनचा २४ नोव्हेंबरचा अपवाद वगळता, उर्वरित १९ कारखाने ऊसदर आंदोलन मिटल्यानंतर लगेचच ११ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत सुरू झाले आहेत.

जिल्ह्यातील १४ सहकारी आणि ७ खासगी अशा २१ कारखान्यांकडून प्रतिदिन १ लाख १९ हजार ३00 मेट्रीक टनाप्रमाणे आतापर्यंत १९ लाख ९३ हजार ५७0 मेट्रीक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. सरासरी १0.२0 टक्के उताºयाने १८ लाख ३८ हजार मेट्रीक टन साखर उत्पादित झाली आहे.

उसाचे वजन घटल्याचा फटका शेतकऱ्याबरोबरच कारखान्यांनाही बसला आहे. उसाची उपलब्धता कमी झाल्याने गळीत हंगाम मार्चपर्यंत तरी जाईल की नाही याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.

१६0 ते १८0 दिवस हंगाम चालला तरच कारखान्यांना फायदा होतो. आताचा वेग व उसाची गुणवत्ता पाहता डिसेंबरमध्येच निम्मा उस संपणार आहे. जानेवारीनंतर उसासाठी कारखान्यांना शोधाशोध करावी लागणार असल्याचे दिसत आहे. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर