शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

 कोल्हापूर : गाळपाचा वेग वाढला, उतारा घटला, २0 दिवसांत २५ टक्के उसाची तोडणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 15:02 IST

यंदा कोयता आणि मशीन यांचा एकाचवेळी रपाटा सुरू झाल्याने साखर कारखान्याच्या गाळपाचा वेग वाढला आहे. कारखाने सुरू झाल्याच्या १५ ते २0 दिवसांंतच २५ टक्के क्षेत्रावरील तब्बल २0 लाख मेट्रीक टन उसाची तोडणी पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देगाळपाचा वेग वाढला, उतारा घटला, २0 दिवसांत २५ टक्के उसाची तोडणी पूर्णउसाच्या एकरी उत्पादनात ४0 टक्क्यांपर्यंत घट

नसीन सनदी

कोल्हापूर : यंदा कोयता आणि मशीन यांचा एकाचवेळी रपाटा सुरू झाल्याने साखर कारखान्याच्या गाळपाचा वेग वाढला आहे. कारखाने सुरू झाल्याच्या १५ ते २0 दिवसांंतच २५ टक्के क्षेत्रावरील तब्बल २0 लाख मेट्रीक टन उसाची तोडणी पूर्ण झाली आहे. तोडणी लवकर होत असली, तरी उसाच्या उताऱ्यात ४0 टक्क्यांपर्यंत घट दिसत आहे. जेथे एकरी ६0 टन मिळायचे, तेथे कसेबसे रडतखडत ३५ ते ४0 टनापर्यंत आकडा जात असल्याने ऊस उत्पादकांना निम्म्याहून अधिक रकमेचे नुकसान सहन करावे लागत आहे.जिल्ह्यात आजच्या घडीला २१ कारखान्यांना लावण व खोडव्यासह जवळपास २ लाख ५0 हजार हेक्टरवरील ऊस तोडणीसाठी उपलब्ध आहे. यातून ९४ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे. या वाढीव क्षेत्राच्या तोडणीसाठी परजिल्ह्यातील मजुरांवर अवलंबून राहणे गेल्यावर्षी महागात पडल्याने यावर्षी जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी तोडणी मशिनचा वापर सुरू केला आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी तोडणी मजुरांची संख्याही १0 हजारांपर्यंत गेली आहे.तोडणी वेग वाढला असला, तरी उत्पादनात लक्षणीय घट दिसत आहे. जून ते आॅगस्ट अशा तीन महिन्यांत सलग पाऊस पडल्याने सूर्यप्रकाशाअभावी उसाची अपेक्षित वाढच झालेली नाही. त्यातच महापुरामुळेही पीक हातचे गेले आहे.

हुमणी आणि लोकरी मावा व तांबेºयाने उसाच्या क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. बºयाच ठिकाणी हुमणी व माव्यामुळे ऊस अर्धवट वाळला आहे. परतीचा पाऊसही न झाल्याने पीक वाळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. साहजिकच तोडणी करताना उसाचे वजन भरेनासे झाले आहे.

ज्या क्षेत्रावर २0 टन ऊस निघायचा तेथे नऊ ते १0 टनांवर समाधान मानावे लागत आहे. एकरी उतारा ३0 ते ३५ टनांपर्यंत खाली आला आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करून उत्पादन एकरी ६0 टनाच्या पुढे गेले होते, यावर्षी त्याला निसर्गानेच खीळ घातली आहे. एफआरपी तीन हजारावर गेली, तरी उतारा निम्म्यावर आल्याने शेतकऱ्याच्या पदरात मात्र निम्मेच पैसे येणार आहेत.

प्रती एकरी ४0 टन उतारा धरला, तर १ लाख २0 हजार रुपये मिळतात. त्यातून एकरी ७५ ते ८0 हजार रुपये खर्च वजा करता शेतकऱ्यांच्या हातात ४0 हजार रुपयेच राहत आहेत. १८ महिन्यांच्या मेहनतीला एवढेच मिळत असल्याने शेतकरी अस्वस्थ आहे.

गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, चंदगड, आजरा या अतिपावसाच्या तालुक्यांमध्ये तर ऊस पूर्णपणे खुंटला आहे. तीच गत कागल, करवीरमध्ये दिसत आहे. येथे पाण्याचा निचरा होणाऱ्या ठिकाणी ऊस बऱ्यापैकी असला, तरी पाणथळ ठिकाणी उसाचे वजन मिळेनासे झाले आहे.

गडहिंग्लजमध्ये उसाचे चिपाडेच झाल्याचे दिसत आहे. हातकणंगले व शिरोळमध्ये तुलनेने चांगली परिस्थिती असली, तरी तेथेही हुमणी व लोकरी माव्याचा मोठा फटका बसला आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांचा हंगाम इको केनचा २४ नोव्हेंबरचा अपवाद वगळता, उर्वरित १९ कारखाने ऊसदर आंदोलन मिटल्यानंतर लगेचच ११ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत सुरू झाले आहेत.

जिल्ह्यातील १४ सहकारी आणि ७ खासगी अशा २१ कारखान्यांकडून प्रतिदिन १ लाख १९ हजार ३00 मेट्रीक टनाप्रमाणे आतापर्यंत १९ लाख ९३ हजार ५७0 मेट्रीक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. सरासरी १0.२0 टक्के उताºयाने १८ लाख ३८ हजार मेट्रीक टन साखर उत्पादित झाली आहे.

उसाचे वजन घटल्याचा फटका शेतकऱ्याबरोबरच कारखान्यांनाही बसला आहे. उसाची उपलब्धता कमी झाल्याने गळीत हंगाम मार्चपर्यंत तरी जाईल की नाही याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.

१६0 ते १८0 दिवस हंगाम चालला तरच कारखान्यांना फायदा होतो. आताचा वेग व उसाची गुणवत्ता पाहता डिसेंबरमध्येच निम्मा उस संपणार आहे. जानेवारीनंतर उसासाठी कारखान्यांना शोधाशोध करावी लागणार असल्याचे दिसत आहे. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर