शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कोल्हापूर :  लसणाच्या दरात कमालीची घसरण, घाऊक बाजारात दहा रुपयांपर्यंत दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 15:58 IST

चटणीचा हंगाम सुरू असताना यंदा लसणाच्या दरातील घसरण थांबत नाही. आवकेत थोडी वाढ झाल्याने घसरण सुरूच असून, घाऊक बाजारात १० पासून २५ रुपयांपर्यंत दर आहे. भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. डाळींची मागणी वाढली असली तरी दर स्थिरच राहिले आहेत.

ठळक मुद्दे लसणाच्या दरात कमालीची घसरण, घाऊक बाजारात दहा रुपयांपर्यंत दर  भाजीपाला स्थिर, डाळींची मागणी वाढली

कोल्हापूर : चटणीचा हंगाम सुरू असताना यंदा लसणाच्या दरातील घसरण थांबत नाही. आवकेत थोडी वाढ झाल्याने घसरण सुरूच असून, घाऊक बाजारात १० पासून २५ रुपयांपर्यंत दर आहे. भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. डाळींची मागणी वाढली असली तरी दर स्थिरच राहिले आहेत.पावसाळ्यासाठी चटणी करण्याकरिता आपल्याकडे साधारणत: मार्च महिन्यापासूनच लगबग सुरू असते. त्यामुळे मार्च ते मे या तीन महिन्यांत मिरची, मसाला यांसह लसणाचे दर काहीसे चढेच असतात. यंदा मात्र लसणाच्या दरात घसरण थांबलेली नाही.

बाजार समितीत रोज लसणाच्या सातशे ते आठशे पोत्यांची आवक सुरू आहे. त्या प्रमाणात उठाव होत नसल्याने दरात घसरण होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच घाऊक बाजारात लसूण दहा रुपयांपासून पंचवीस रुपये किलोपर्यंत राहिला आहे. तुलनेने कांदा व बटाट्याच्या दरांत चढउतार दिसत नाही.भाजीपाल्याची स्थानिक आवक अजूनही चांगली असल्याने दर स्थिर राहण्यास मदत होत आहे. कोबी, वांगी, ढबू, गवार, भेंडी, कारली, दोडक्याचे दर गत आठवड्याच्या तुलनेत कायम आहेत. टोमॅटोच्या दरात सुरू असलेली घसरण थोडी थांबली असून, घाऊक बाजारात चांगल्या टोमॅटोच्या दरात थोडी सुधारणा झालेली आहे.

कोथिंबिरीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून, बाजार समितीत रोज २२ हजार पेंढ्यांची आवक होत आहे. घाऊक बाजारात पाचपासून १७ रुपयांपर्यंत पेंढीचा दर आहे. मेथी, पालक, पोकळा या पालेभाज्यांचे दर स्थिर असून, पेंढीचा दर सरासरी दहा रुपये आहे.सध्या पावसाळ्याकरिता डाळींचा साठा करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यामुळे डाळींचा उठाव होत असला तरी गतवर्षीच्या तुलनेत तूरडाळ व हरभरा डाळीचे दर फारच कमी आहेत. किरकोळ बाजारात तूरडाळ प्रतिकिलो ६५ रुपये, तर हरभराडाळ ४९ रुपयांपर्यंत आहे.

शाबू, रवा, मैदा, ज्वारीसह इतर किराणा मालाच्या दरात फारसा चढउतार दिसत नाही. सरकी तेलाच्या दरात थोडी वाढ झाली असून ते ८५ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. साखरेच्या दरात फारसा फरक दिसत नाही.

हापूस सामान्यांच्या आवाक्यात!कोकणासह कर्नाटक, गुजरातमधून आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे हापूस आंबा सामान्य माणसाच्या आवाक्यात आला असून, हंगामाच्या शेवटी-शेवटी का असेना, त्याची चव चाखायला मिळत आहे. कलिंगडांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून पावसामुळे त्यांची गोडी कमी झाली आहे.

 

हापूस आंब्यांची आवक अजून पंधरा दिवस अशीच राहील. दरात चढउतार असला तरी चांगल्या आंब्याचे दर २०० ते ६०० रुपये डझन अजूनही आहेत.- सलीम बागवान, फळांचे व्यापारी, बाजार समिती 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूरMangoआंबा