शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कोल्हापूर :  लसणाच्या दरात कमालीची घसरण, घाऊक बाजारात दहा रुपयांपर्यंत दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 15:58 IST

चटणीचा हंगाम सुरू असताना यंदा लसणाच्या दरातील घसरण थांबत नाही. आवकेत थोडी वाढ झाल्याने घसरण सुरूच असून, घाऊक बाजारात १० पासून २५ रुपयांपर्यंत दर आहे. भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. डाळींची मागणी वाढली असली तरी दर स्थिरच राहिले आहेत.

ठळक मुद्दे लसणाच्या दरात कमालीची घसरण, घाऊक बाजारात दहा रुपयांपर्यंत दर  भाजीपाला स्थिर, डाळींची मागणी वाढली

कोल्हापूर : चटणीचा हंगाम सुरू असताना यंदा लसणाच्या दरातील घसरण थांबत नाही. आवकेत थोडी वाढ झाल्याने घसरण सुरूच असून, घाऊक बाजारात १० पासून २५ रुपयांपर्यंत दर आहे. भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. डाळींची मागणी वाढली असली तरी दर स्थिरच राहिले आहेत.पावसाळ्यासाठी चटणी करण्याकरिता आपल्याकडे साधारणत: मार्च महिन्यापासूनच लगबग सुरू असते. त्यामुळे मार्च ते मे या तीन महिन्यांत मिरची, मसाला यांसह लसणाचे दर काहीसे चढेच असतात. यंदा मात्र लसणाच्या दरात घसरण थांबलेली नाही.

बाजार समितीत रोज लसणाच्या सातशे ते आठशे पोत्यांची आवक सुरू आहे. त्या प्रमाणात उठाव होत नसल्याने दरात घसरण होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच घाऊक बाजारात लसूण दहा रुपयांपासून पंचवीस रुपये किलोपर्यंत राहिला आहे. तुलनेने कांदा व बटाट्याच्या दरांत चढउतार दिसत नाही.भाजीपाल्याची स्थानिक आवक अजूनही चांगली असल्याने दर स्थिर राहण्यास मदत होत आहे. कोबी, वांगी, ढबू, गवार, भेंडी, कारली, दोडक्याचे दर गत आठवड्याच्या तुलनेत कायम आहेत. टोमॅटोच्या दरात सुरू असलेली घसरण थोडी थांबली असून, घाऊक बाजारात चांगल्या टोमॅटोच्या दरात थोडी सुधारणा झालेली आहे.

कोथिंबिरीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून, बाजार समितीत रोज २२ हजार पेंढ्यांची आवक होत आहे. घाऊक बाजारात पाचपासून १७ रुपयांपर्यंत पेंढीचा दर आहे. मेथी, पालक, पोकळा या पालेभाज्यांचे दर स्थिर असून, पेंढीचा दर सरासरी दहा रुपये आहे.सध्या पावसाळ्याकरिता डाळींचा साठा करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यामुळे डाळींचा उठाव होत असला तरी गतवर्षीच्या तुलनेत तूरडाळ व हरभरा डाळीचे दर फारच कमी आहेत. किरकोळ बाजारात तूरडाळ प्रतिकिलो ६५ रुपये, तर हरभराडाळ ४९ रुपयांपर्यंत आहे.

शाबू, रवा, मैदा, ज्वारीसह इतर किराणा मालाच्या दरात फारसा चढउतार दिसत नाही. सरकी तेलाच्या दरात थोडी वाढ झाली असून ते ८५ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. साखरेच्या दरात फारसा फरक दिसत नाही.

हापूस सामान्यांच्या आवाक्यात!कोकणासह कर्नाटक, गुजरातमधून आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे हापूस आंबा सामान्य माणसाच्या आवाक्यात आला असून, हंगामाच्या शेवटी-शेवटी का असेना, त्याची चव चाखायला मिळत आहे. कलिंगडांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून पावसामुळे त्यांची गोडी कमी झाली आहे.

 

हापूस आंब्यांची आवक अजून पंधरा दिवस अशीच राहील. दरात चढउतार असला तरी चांगल्या आंब्याचे दर २०० ते ६०० रुपये डझन अजूनही आहेत.- सलीम बागवान, फळांचे व्यापारी, बाजार समिती 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूरMangoआंबा