शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

Kolhapur: रिक्षावाल्याला आत्मविश्वास नडला अन् अपघात घडला; रिक्षा-बसच्या समोरासमोर धडकेत तिघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 12:16 IST

एसटी बसचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले

हातकणंगले : कोल्हापूर-सांगली राज्य मार्गावर हातकणंगलेनजीक रामलिंग फाट्यावर एस. टी. बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार झाले. शिवानी घेवरचंद खत्री (वय ३२), ललिता हंसराज खत्री (३०) आणि श्रीतेज विलासराव जंगम (१०, रा. इचलकरंजी) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली. रिक्षाचालक आणि सहा वर्षांच्या मुलासह एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे.इचलकरंजी येथील शिवानी खत्री आणि त्यांचे कुटुंब प्रशांत पेटकर (रा. इचलकरंजी) यांच्या रिक्षाने क्र. (एमएच ०९, जे ८९८९) रामलिंग आणि धुळोबा देवदर्शनासाठी निघाले होते. कोल्हापूर-सांगली राज्य मार्गावर हातकणंगलेनजीक रामलिंग फाट्यावर त्यांच्या रिक्षाला कोल्हापूरकडून येणाऱ्या कुडाळ ते पंढरपूर एस. टी. बस क्र. (एमएच १४ बीटी २५०९)ने जोरदार धडक दिली. त्यात रिक्षाचा चक्काचूर झाला. रिक्षातील शिवानी खत्री आणि त्यांच्या शेजारी राहणारा रितेश जंगम हे दोघे जागीच ठार झाले. रिक्षाचालक प्रशांत पेटकर व रिक्षातील कियान घेवरचंद खत्री (वय ६), ललिता हंसराज खत्री (वय ४०) हे गंभीर जखमी आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघातस्थळी स्थानिक नागरिक आणि स्वप्नील नरुटे यांनी तत्काळ मदत केल्याने तसेच पोलिसांनी अपघातातील वाहने बाजूला केल्याने वाहतूक कोंडी झाली नाही. एसटी बसचालक रवींद्र प्रभाकर चव्हाण (रा. पंढरपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आत्मविश्वास नडलासमोरून भरधाव एस. टी. बस येत असल्याचे बघूनही माझी रिक्षा रस्ता ओलांडेल, हा आत्मविश्वास रिक्षावाल्याला नडला आणि अपघात घडला. खत्री कुटुंबाचे इचलकरंजी येथे कपडे विक्रीचे दुकान आहे. शिवानी खत्री या पतीला मदत करत होत्या. देवदर्शनासाठी त्या बाहेर पडल्या आणि काळाने डाव साधला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू