शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

Kolhapur: रिक्षावाल्याला आत्मविश्वास नडला अन् अपघात घडला; रिक्षा-बसच्या समोरासमोर धडकेत तिघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 12:16 IST

एसटी बसचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले

हातकणंगले : कोल्हापूर-सांगली राज्य मार्गावर हातकणंगलेनजीक रामलिंग फाट्यावर एस. टी. बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार झाले. शिवानी घेवरचंद खत्री (वय ३२), ललिता हंसराज खत्री (३०) आणि श्रीतेज विलासराव जंगम (१०, रा. इचलकरंजी) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली. रिक्षाचालक आणि सहा वर्षांच्या मुलासह एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे.इचलकरंजी येथील शिवानी खत्री आणि त्यांचे कुटुंब प्रशांत पेटकर (रा. इचलकरंजी) यांच्या रिक्षाने क्र. (एमएच ०९, जे ८९८९) रामलिंग आणि धुळोबा देवदर्शनासाठी निघाले होते. कोल्हापूर-सांगली राज्य मार्गावर हातकणंगलेनजीक रामलिंग फाट्यावर त्यांच्या रिक्षाला कोल्हापूरकडून येणाऱ्या कुडाळ ते पंढरपूर एस. टी. बस क्र. (एमएच १४ बीटी २५०९)ने जोरदार धडक दिली. त्यात रिक्षाचा चक्काचूर झाला. रिक्षातील शिवानी खत्री आणि त्यांच्या शेजारी राहणारा रितेश जंगम हे दोघे जागीच ठार झाले. रिक्षाचालक प्रशांत पेटकर व रिक्षातील कियान घेवरचंद खत्री (वय ६), ललिता हंसराज खत्री (वय ४०) हे गंभीर जखमी आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघातस्थळी स्थानिक नागरिक आणि स्वप्नील नरुटे यांनी तत्काळ मदत केल्याने तसेच पोलिसांनी अपघातातील वाहने बाजूला केल्याने वाहतूक कोंडी झाली नाही. एसटी बसचालक रवींद्र प्रभाकर चव्हाण (रा. पंढरपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आत्मविश्वास नडलासमोरून भरधाव एस. टी. बस येत असल्याचे बघूनही माझी रिक्षा रस्ता ओलांडेल, हा आत्मविश्वास रिक्षावाल्याला नडला आणि अपघात घडला. खत्री कुटुंबाचे इचलकरंजी येथे कपडे विक्रीचे दुकान आहे. शिवानी खत्री या पतीला मदत करत होत्या. देवदर्शनासाठी त्या बाहेर पडल्या आणि काळाने डाव साधला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू