शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

कोल्हापूर : बिंदू चौक सबजेलजवळ पाण्यासाठी रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 4:01 PM

गेल्या दोन वर्षापासून अपूऱ्या व कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्याला वैतागलेल्या नागरीकांनी शुक्रवारी बिंदू चौक सबजेल परिसरात रस्तारोको आंदोलन करुन महापालिका पाणी पुरवठा विभागाचा निषेध केला. तसेच या विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सोमवारपासून सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देबिंदू चौक सबजेलजवळ पाण्यासाठी रास्तारोकोमहापालिका पाणी पुरवठा विभागाचा निषेध

कोल्हापूर : गेल्या दोन वर्षापासून अपूऱ्या व कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्याला वैतागलेल्या नागरीकांनी शुक्रवारी बिंदू चौक सबजेल परिसरात रस्तारोको आंदोलन करुन महापालिका पाणी पुरवठा विभागाचा निषेध केला. तसेच या विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सोमवारपासून सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.बिंदू चौक सबजेल ते करवीर नगर वाचनमंदिर या रस्त्याच्या दोन्ही बाजूला रहात असलेल्या नागरीकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. या परिसराला गेल्या दोन वर्षापासून दिवसभरात एक तास तसेच कमी दाबाने पाणी पुरवठा होत असतो. त्यातून नागरीकांची गरज भागत नाही. त्यामुळे नागरीकांनी भागातील नगरसेविक हसिना फरास यांच्याकडे तक्रारी केल्या. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र या प्रश्नाकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही. त्यामुळे नागरीकांतून कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.ऐन सणासुदीच्या दिवसातही नागरीकांना पाणी मिळाले नसल्याने शुक्रवारी या परिसरातील नागरीकांचा उद्रेक झाला. सतप्त महिलांनी घागरी, बादल्या हाती घेऊन रस्त्यावर येत रास्ता रोको आंदोलन सुरु केले. अचानक झालेल्या या रास्तारोको मुळे या मार्गावरील वाहतुक अन्य मार्गाने वळविण्यात आली.

दरम्यान, या भागाचे नगरसेविका हसिना फरास, आदिल फरास यांनाही संपर्क साधून रास्तारोको झाल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांचे नातेवाईक रुग्णालयात अत्यवस्त असल्याने ते दोघेही रुग्णालयात थांबून होते. त्यांनी भागातील पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी सुरवसे यांना फोनवरुन नागरीकांना भेटून त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्या असे सांगितले.सुरवसे यांनी नागरीकांची भेट घेतली. पण पाणी कधी सोडणार ते आधी सांगा, इतके दिवस तक्रारी करत असतानाही दखल का घेतली नाही अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर सुरु केली. पाणी पुरवठ्याचे नवीन नियोजन केले असून येत्या सोमवारपासून सुरळीत पाणी मिळेल, तोपर्यंत पाण्याचे टॅँकर दिले जातील असे सुरवसे यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलन मागे घेतले.

२५ लाखाचा निधी फुकट गेलानगरसेविका हसिना फरास महापौर असताना त्यांनी त्यांच्या बजेटमधून २५ लाखाचा निधी उपलब्ध करुन देऊन परिसरातील नागरीकांच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचे ठरविले होते. हा भाग उंचवट्यावर असल्याने पाणी कमी मिळते, म्हणून खर्चाच्या पाण्यासाठी एका विहिरीवर मोटार बसवून चावीद्वारे हे पाणी द्यायचे नियोजन फरास यांनी केले होते. त्यासाठी २५ लाखाची तरतुद केली होते. परंतु आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी हे काम करण्यास नकार दिला. त्यामुळे निधी फुकट गेलाच शिवाय नागरीकांचा पश्नही तेथेच राहिला.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाWaterपाणीkolhapurकोल्हापूर