शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हापूर : वसुली, दाखले, सातबाऱ्यांच्या कामकाजावर परिणाम: चावड्यांवरील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 11:31 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या कोतवालांच्या बेमुदत धरणे आंदोलनाचा हा परिणाम आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. तरीही शासनाकडून या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. कडाक्याच्या थंडीतही आंदोलकांनी हे आंदोलन सुरू ठेवले आहे.

ठळक मुद्देवसुली, दाखले, सातबाऱ्यांच्या कामकाजावर परिणाम: चावड्यांवरील चित्र कोतवालांच्या धरणे आंदोलनाचा फटका, आंदोलन सुरूच : समरजितसिंह घाटगे यांची भेट

कोल्हापूर : जिल्ह्यातील चावड्यांवर महसूल वसुली, विविध प्रकारचे दाखले, सातबारे, दफ्तर ने-आण करणे, विविध शासकीय विभागांच्या नोटिसा बजावणे अशी विविध प्रकारची कामे ठप्प आहेत. गेल्या ११ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या कोतवालांच्या बेमुदत धरणे आंदोलनाचा हा परिणाम आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. तरीही शासनाकडून या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. कडाक्याच्या थंडीतही आंदोलकांनी हे आंदोलन सुरू ठेवले आहे.सरकारी सेवेत सामावून घेऊन चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे ४५४ कोतवाल काम बंद करून सहभागी झाल्याने जिल्ह्यातील चावड्यांवरील सर्व कामकाज ठप्प झाले आहे.सर्वच कामांसाठी कोतवाल हा महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक आहे; परंतु त्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने ते रस्त्यावर उतरले आहेत. याचा परिणाम म्हणजे गाव पातळीवर चावड्यांमधून होणारी महसूल वसुली, शिक्षण कर, जमीन कर, बिगर शेती कर, गौण खनिज कर वसुली, विविध प्रकारचे दाखले, सातबारा, दफ्तरांची ने-आण करणे, शासनाच्या विविध विभागांच्या नोटिसा संबंधितांना बजावणे, निवडणूक प्रक्रियेत मदत, अशा विविध कामांवर झाला आहे.

गेल्या ११ दिवसांपासून ही कामे पूर्णपणे ठप्प आहेत. कडाक्याच्या थंडीतही कोतवालांनी हे आंदोलन ताकदीने सुरू ठेवले आहे. शासनाला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तरीही जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत येथून न उठण्याचा त्यांचा निर्धार आहे.दरम्यान, सोमवारी पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. कोतवालांच्या मागण्यांबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर