शहरं
Join us  
Trending Stories
1
सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप; भूस्खलनामुळे ९ जणांचा मृत्यू, १२०० पर्यटक अडकले
2
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली, मेदांता रुग्णालयात दाखल
3
छत्तीसगडमध्ये पोलीस आणि सीआरपीफच्या पथकाला मोठं यश, चकमकीत मारले गेले ८ नक्षलवादी
4
SBI चा ग्राहकांना तगडा झटका, मासिक EMI वाढणार! MCLR च्या दरात 10 बेसिस प्वाइंट्सची वाढ 
5
वहीतुला करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पारड्यातून पडले; व्हिडीओ व्हायरल
6
नरेंद्र मोदींसोबत जॉर्जिया मेलोनींचा खास सेल्फी; दोन्ही नेत्यांमध्ये 'या' मुद्द्यांवर चर्चा
7
Ganga Dussehra 2024: दहा प्रकारच्या पापातून मुक्ती मिळवण्याचे दहा प्रकार गंगा दशहराच्या मुहूर्तावर करा!
8
संगमेश्वर बाजारपेठेत मोठी आग, लाखो रुपयांचे नुकसान
9
दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन
10
Tarot Card: कामांचा क्रम ठरवून सुरुवात केली तर निश्चितच यश मिळेल; वाचा येत्या आठवड्याचे भविष्य!
11
पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपले! अक्रमकडून पाकिस्तानी खेळाडूंचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव
13
ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त
14
"कुर्बानी के जानवर हाजीर हो", पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर; माजी खेळाडूची बोचरी टीका
15
मराठी अभिनेत्रीसाठी सचिन तेंडुलकरच्या लेकाची पोस्ट, फोटो शेअर करत अर्जुन म्हणतो...
16
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आजपासून 'या' ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती घटणार
17
ऐश्वर्या नाही तर सलमान खान या अभिनेत्रीसोबत थाटणार होता संसार, कोण आहे ती?
18
अफगाणिस्तान सुपर-८ मध्ये पोहोचला; पण स्टार स्पिनर T20 World Cup मधून बाहेर झाला
19
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
20
फुटबॉलचा Mini World Cup! यजमान जर्मनीची विजयी सलामी; स्कॉटलंडचा दारूण पराभव 

कोल्हापूर : माघार न घेतल्याने केली बदली, सुरक्षारक्षकांचा देवस्थानवर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 5:03 PM

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्याविरोधात सुरू असलेल्या दाव्यात माघार न घेतल्याने समितीने आमची अन्य देवस्थानांवर बदली केली आहे असा आरोप निवृत्त जवान असलेल्या सुरक्षारक्षकांनी केला आहे. समितीने मात्र आकसापोटी अशी कोणतिही गोष्ट घडली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देमाघार न घेतल्याने केली बदली सुरक्षारक्षकांचा देवस्थानवर आरोप

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्याविरोधात सुरू असलेल्या दाव्यात माघार न घेतल्याने समितीने आमची अन्य देवस्थानांवर बदली केली आहे असा आरोप निवृत्त जवान असलेल्या सुरक्षारक्षकांनी केला आहे. समितीने मात्र आकसापोटी अशी कोणतिही गोष्ट घडली नसल्याचे स्पष्ट केले आहे.देवस्थान समितीच्या अखत्यारित असलेल्या अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी समितीने २००७ साली निवृत्त जवान असलेल्या पंधरा जणांची सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांना सुरवातीपासून सात हजार रुपये पगार होता. अनेक वर्षे समितीने पगारवाढ न केल्याने हे सुरक्षारक्षक कामगार न्यायालयात गेले.

यात त्यांनी शासकीय नियमाने पगारवाढ व्हावी व त्यांना कायमसेवेत घेण्याचा करार व्हावा अशी मागणी केली. न्यायालयाने आॅगस्ट २०१७ मध्ये या सुरक्षारक्षकांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात तक्रार केली आहे.समितीच्या मासिक बैठकीत या विषयावर चर्चा झाल्यानंतर कोर्टकचेऱ्या करण्यापेक्षा तडजोड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सर्व सुरक्षा रक्षकांना बोलावून चर्चा करण्यात आली. त्यांना पगारवाढ आणि २००७ सालापासूनचा फरक म्हणून ८ लाख रुपये, व वयाच्या साठ वर्षांपर्यंत नोकरीत ठेवण्यावर तडजोड झाली.

या तडजोडीनंतर दहा सुरक्षारक्षकांनी दाव्यातून माघार घेतली मात्र पाच जणांनी त्यास नकार दिला. या नकारानंतर देवस्थान समितीने त्यांच्या सावंतवाडी, जोतिबा, ओढ्यावरील गणेश मंदिर, त्र्यंबोली मंदिर अशा ठिकाणी बदल्या केल्याचा आरोप केला आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTempleमंदिरAmbadevi Mandirअंबादेवी संस्थान