शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कोल्हापुरातील राजेंद्रनगरमधील खूनप्रकरण: हल्लेखोरांनी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी तिसऱ्याच व्यक्तींच्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 14:11 IST

दुचाकींचे मूळ मालक पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले

कोल्हापूर : राजेेंद्रनगरमधील गुंड कुमार शाहूराज गायकवाड याच्या खूनप्रकरणी हल्लेखोरांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही दुचाकी तिसऱ्याच व्यक्तींच्या असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. हल्ल्यात वापरलेल्या दोन्ही दुचाकी हल्लेखोरांनी मित्रांकडून तात्पुरत्या कामासाठी मागून आणल्या होत्या, पण गंभीर गुन्ह्यात वापर झाल्यामुळे आता दुचाकींचे मूळ मालक पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.

राजेंद्रनगर परिसरातील गुंड कुमार गायकवाड याचा रविवारी (ता. १३) रात्री पाच हल्लेखोरांनी पाठलाग करून टाकाळा खण परिसरात निर्घृण खून केला होता. हल्लेखोरांनी या गुन्ह्यात वापरलेली एक स्कुटी आणि एक वेस्पा अशा दोन्ही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या दोन्ही दुचाकी राजेंद्रनगरातील तिसऱ्याच व्यक्तीच्या आहेत. दहा मिनिटांत येतो, असे सांगून या दोन्ही दुचाकी हल्लेखोरांनी मित्रांकडून मागून घेतल्या होत्या. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून दुचाकींचे नंबर मिळवून दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत.

गुन्ह्याशी थेट काहीही संबंध नसताना दुचाकींचे मूळ मालक आता पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. दोन्ही दुचाकींच्या मालकांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवले जाणार आहे. दुचाकींची योग्य कागदपत्रे सादर केल्यानंतरच कोर्टाच्या आदेशाने मूळ मालकांना दुचाकी मिळतील, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांनी दिली.

संशयित सोशल मीडिया अकाउंट्सची होणार पडताळणी

गुंड कुमार गाकवाड याच्या खुनानंतर विरोधी गटांना चिथावणी देणारे काही मेसेज सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. सायबर पोलिसांच्या मदतीने इन्स्टा, फेसबुकवरील संशयित अकाउंटसह काही मोबाइल नंबर्सच्या व्हॉट्सॲप स्टेट्सचीही पडताळणी करणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.

गुन्हेगारी कृत्यांमध्ये आपल्या वाहनांचा वापर होऊ नये, यासाठी वाहन मालकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. - भगवान शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस