शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कोल्हापूर : आजी-माजी विद्यार्थ्यांच्या गर्दीने ‘राजाराम महोत्सव’ बहरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 5:31 PM

आयुष्यात जे स्वप्न पहाल ते साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहा. करिअरसाठी आवडीचे क्षेत्र निवडा. त्यामध्ये कष्ट आणि स्वत:शी स्पर्धा करा. त्यातून निश्चितपणे यश मिळेल, असे प्रतिपादन भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी शुक्रवारी केले.

ठळक मुद्देआजी-माजी विद्यार्थ्यांच्या गर्दीने ‘राजाराम महोत्सव’ बहरलाकष्ट करा, निश्चितपणे यश मिळेल : हणमंतराव गायकवाड

कोल्हापूर : आयुष्यात जे स्वप्न पहाल ते साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहा. करिअरसाठी आवडीचे क्षेत्र निवडा. त्यामध्ये कष्ट आणि स्वत:शी स्पर्धा करा. त्यातून निश्चितपणे यश मिळेल, असे प्रतिपादन भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी शुक्रवारी केले.येथील राजाराम महाविद्यालयातर्फे आयोजित राजाराम महोत्सवात ते बोलत होते. महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहातील या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. ए. एम. खेमनार, महोत्सवाच्या संयोजनप्रमुख डॉ. अनिता बोडके उपस्थित होत्या. नेल आर्ट, हेअर स्टाईल अशा विविध स्पर्धा, यशस्वीतांचे मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आजी-माजी विद्यार्थ्यांच्या गर्दीने दुसऱ्या दिवशी हा महोत्सव बहरला आहे.

कोल्हापुरात शुक्रवारी राजाराम महोत्सवातील सेल्फी पॉर्इंट येथे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी असा सेल्फी टिपून आनंद व्यक्त केला. (छाया : नसीर अत्तार)

गायकवाड म्हणाले, आपल्याजवळ असणारी कोणतीही कल्पना कायमस्वरूपी आणि टिकणारी असायला हवी. त्यामागे ध्येयाने मागे लागल्यास पाहिजे तो व्यवसाय करण्यास मदत मिळते. उद्योग, व्यवसायातील यशासाठी टीमवर्क महत्त्वाचे ठरते. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षणासह संघर्ष आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा.

कोणतेही काम करत असताना ते सर्वोत्तम करा. प्राचार्य डॉ. खेमनार म्हणाले, खोटा अविर्भाव आणत जगण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेवत वेळीच सुधारणा केली, तरच यशस्वी होता येते. या कार्यक्रमात प्रा. डॉ. अंजली भागवत यांनी सूत्रसंचालन केले. उल्हास भागवत यांनी आभार मानले. दरम्यान, महोत्सवात दुपारी कथाकार आप्पासाहेब खोत यांचा कथाकथन आणि सायंकाळी ऋषीकेश जोशी, डॉ. शरद भुथाडिया यांचा एकपात्री प्रयोग रंगला.

जिद्दीने काम केलेस्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून कामाला सुरुवात केली. जिद्दीने काम करत गेलो. उत्तम काम केल्यामुळेच यश मिळविता आले, असे गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाले, पुढील वर्षात किमान १0 कोटी लोकांच्या आयुष्यात परिवर्तन करण्याचा प्रयत्न राहणार आहे. विद्यार्थ्यांनी नुसते चांगले नव्हे, तर सर्वोत्तम काम करण्याचा ध्यास घ्यावा.

 

 

 

टॅग्स :Rajaram Collegeराजाराम कॉलेजkolhapurकोल्हापूर