शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

कोल्हापूर : शरद पवारांनी स्वामीनाथन अहवाल का डावलला?, माधव भंडारींचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 11:51 IST

अटलबिहारी वाजपेयी यांनी सन २००२ मध्ये स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली. सन २००४ मध्ये या समितीने अहवाल दिला. तत्कालिन कृषीमंत्री असलेल्या शरद पवारांनी हा अहवाल स्वीकारणे शक्य नसल्याचे २०१४ पर्यंतच्या प्रत्येक अधिवेशनात सांगितले. मात्र, सत्ता जाताच त्यांना हा आयोग जवळचा वाटू लागला. त्यांनी सत्तेवर असताना हा अहवाल का डावलला याचे आधी उत्तर द्यावे, असे आवाहन भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले आहे.

ठळक मुद्देशरद पवारांनी स्वामीनाथन अहवाल का डावलला?माधव भंडारींचा सवाल ६ एप्रिलला भाजपचा मुंबईत महामेळावा

कोल्हापूर : अटलबिहारी वाजपेयी यांनी सन २००२ मध्ये स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली. सन २००४ मध्ये या समितीने अहवाल दिला. तत्कालिन कृषीमंत्री असलेल्या शरद पवारांनी हा अहवाल स्वीकारणे शक्य नसल्याचे २०१४ पर्यंतच्या प्रत्येक अधिवेशनात सांगितले. मात्र, सत्ता जाताच त्यांना हा आयोग जवळचा वाटू लागला. त्यांनी सत्तेवर असताना हा अहवाल का डावलला याचे आधी उत्तर द्यावे, असे आवाहन भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले आहे.कोल्हापूर येथे डॉ. हेडगेवार व्याख्यानमालेसाठी आलेल्या भंडारी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. कोल्हापूरमध्ये आलोय म्हटल्यावर स्वामीनाथन अहवालावर सविस्तर बोलले पाहिजे, असे सांगून त्यांनी याबाबतची मांडणी केली. ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांना उत्पन्नखर्चाच्या दीडपट हमीभाव देता येणार नाही,’ अशी पवार यांनी स्पष्टपणे दिलेली उत्तरे संसदेत नोंदली गेली आहेत.

मात्र, सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तेच उलटा प्रश्न विचारत आहेत. मोदी सरकारने या अहवालाच्या बहुतांशी शिफारशी मान्य केल्या असून दीडपट हमीभावाची अंमलबजावणी येत्या खरिपापासून होईल.मित्रपक्षाच्या सोडचिठ्ठीबद्दल विचारल्यानंतर भंडारी म्हणाले, जनसंघ असल्यापासून आघाड्यांचे राजकारण सुरू केले गेले. अटलबिहारी वाजपेयी यांनी २६ पक्षांचे सरकार चालवले; परंतु आता ज्यांना आपल्या राजकारणासाठी म्हणून आमची संगत सोडायची आहे. त्यांना सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत. कर्नाटकमध्ये भाजप सत्तेवर येईल, असा पूर्व अंदाज व्यक्त होऊ लागला आहे. या निकालाचा परिणाम येत्या लोकसभेवर अपरिहार्य आहे.महाराष्ट्राच्या सकल उत्पन्नाच्या २२.५0 टक्के कर्ज घेणे शक्य आहे. मात्र, सध्या सरकारने १६ टक्के कर्ज घेतले आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळलेली नाही. या कर्जरकमेतून गेल्या साडेतीन वर्षांत मूलभूत सोयी आणि सुविधांचे मोठे काम झाल्याचा दावा यावेळी भंडारी यांनी केला.

पत्रकार परिषदेला भाजपचे कोल्हापूर महानगर अध्यक्ष संदीप देसाई, सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई, सुभाष रामुगडे, अमोल पालोजी, हेमंत आराध्ये, शंतनु मोहिते, नगरसेवक अजित ठाणेकर उपस्थित होते.

महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्नभाजपचा मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रातील दोन्ही काँग्रेस आणि अनेक डाव्या संघटना अस्वस्थ आहेत. त्यामुळे विविध संघटनांना पुढे करून, असलेले नसलेले प्रश्न उपस्थित करून गेली साडेतीन वर्षे महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यावेळी भंडारी यांनी केला.

राज ठाकरेंची घोषणा हा मोठा विनोदराज ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने रोजगारमुक्त केले आहे. ज्यांच्या निशाणीवर महाराष्ट्रात कुणीही निवडून येऊ शकत नाही, त्यांचा एकही आमदार नाही, मुंबईत नगरसेवकही नाहीत त्यांनी मोदीमुक्त भारताची घोषणा करणे यासारखा दुसरा मोठा विनोद नाही.

६ एप्रिलला मुंबईत महामेळावाभाजपच्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील ‘बीकेसी’मध्ये सकाळी ११.३० वाजता महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामपंचायत सदस्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत ३ लाख जण या मेळाव्यास उपस्थित राहणार असून त्याचे नियोजन सुरू असल्याचे भंडारी यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाkolhapurकोल्हापूर