शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

कोल्हापूर : पंचगंगा काठच्या गावांसाठी २२ कोटींचा प्रकल्प आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 16:27 IST

प्रामुख्याने पंचगंगा नदीकाठच्या आणि प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या ३१ गावांतील सांडपाणी रोखण्यासाठी २२ कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये ही माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.

ठळक मुद्दे पंचगंगा काठच्या गावांसाठी २२ कोटींचा प्रकल्प आराखडाखिद्रापूर येथे जलव्यवस्थापन बैठक, सांडपाण्याचे होणार व्यवस्थापन

कोल्हापूर : प्रामुख्याने पंचगंगा नदीकाठच्या आणि प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या ३१ गावांतील सांडपाणी रोखण्यासाठी २२ कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये ही माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.सध्या जिल्ह्यामध्ये पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा तापला असून, याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निधी देण्याची ग्वाही दिली आहे. त्यानुसार तातडीचा उपाय म्हणून सांडपाणी साठविण्यासाठी स्थिरीकरण तळे आणि बायोरेमिडिएशन पद्धतीद्वारे हे सांडपाणी नदीत जाण्यापासून थांबविण्यासाठी २२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. बायोरेमिडिएशन पद्धतीमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे बॅक्टेरिया विकसित करण्यात आले असून, त्याचा वापर करण्याचे नियोजन आहे.शाळा, अंगणवाड्यांच्या स्वच्छतागृहांचेही सर्वेक्षण करण्याच्या यावेळी सूचना देण्यात आल्या. यावेळी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, महिला बालकल्याण सभापती वंदना मगदूम, जलव्यवस्थापन समितीचे सदस्य बंडा माने, प्रा. शिवाजी मोरे, अ‍ॅड. हेमंत कोलेकर, राणी खमेलट्टी, तसेच राजवर्धन निंबाळकर, अशोकराव माने, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्र. कार्यकारी अभियंता मनीष पवार, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता ना. बा. भोई, शिरोळचे गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव उपस्थित होते.

जैनापूर येथे सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटनजैनापूर येथील सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यापूर्वी गावात निर्माण होणारे सांडपाणी ग्रामपंचायतीच्या समोर साचून राहायचे, त्यामुळे गावात स्वच्छता आणि आरोग्याचे प्रश्न उभे राहिले होते.या प्रकल्पांतर्गत तीन स्थिरीकरण तळी घेण्यात आली आहेत. या तळ्यांतून शुद्ध होणारे पाणी हे शेतीसाठी वापरले जाणार आहे. या प्रकल्पाची अंदाजपत्रकीय रक्कम रु. १७.९१ लक्ष इतकी असून, या कामासाठी प्रत्यक्ष १०. ७० लक्ष इतका खर्च झालेला आहे.यावेळी राम शिंदे, सभापती अर्चना चौगले, उपसभापती संजय माने, पं. स. सदस्य सुरेश कांबळे, राजगोंड पाटील यांच्यासह सरपंच व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :riverनदीzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर