शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
2
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
3
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
4
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
7
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
8
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
9
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
10
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
11
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
12
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
13
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
14
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
15
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
16
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
17
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
18
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
19
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
20
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पंचगंगा काठच्या गावांसाठी २२ कोटींचा प्रकल्प आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 16:27 IST

प्रामुख्याने पंचगंगा नदीकाठच्या आणि प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या ३१ गावांतील सांडपाणी रोखण्यासाठी २२ कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये ही माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.

ठळक मुद्दे पंचगंगा काठच्या गावांसाठी २२ कोटींचा प्रकल्प आराखडाखिद्रापूर येथे जलव्यवस्थापन बैठक, सांडपाण्याचे होणार व्यवस्थापन

कोल्हापूर : प्रामुख्याने पंचगंगा नदीकाठच्या आणि प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या ३१ गावांतील सांडपाणी रोखण्यासाठी २२ कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये ही माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.सध्या जिल्ह्यामध्ये पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा तापला असून, याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निधी देण्याची ग्वाही दिली आहे. त्यानुसार तातडीचा उपाय म्हणून सांडपाणी साठविण्यासाठी स्थिरीकरण तळे आणि बायोरेमिडिएशन पद्धतीद्वारे हे सांडपाणी नदीत जाण्यापासून थांबविण्यासाठी २२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. बायोरेमिडिएशन पद्धतीमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे बॅक्टेरिया विकसित करण्यात आले असून, त्याचा वापर करण्याचे नियोजन आहे.शाळा, अंगणवाड्यांच्या स्वच्छतागृहांचेही सर्वेक्षण करण्याच्या यावेळी सूचना देण्यात आल्या. यावेळी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, महिला बालकल्याण सभापती वंदना मगदूम, जलव्यवस्थापन समितीचे सदस्य बंडा माने, प्रा. शिवाजी मोरे, अ‍ॅड. हेमंत कोलेकर, राणी खमेलट्टी, तसेच राजवर्धन निंबाळकर, अशोकराव माने, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्र. कार्यकारी अभियंता मनीष पवार, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता ना. बा. भोई, शिरोळचे गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव उपस्थित होते.

जैनापूर येथे सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटनजैनापूर येथील सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यापूर्वी गावात निर्माण होणारे सांडपाणी ग्रामपंचायतीच्या समोर साचून राहायचे, त्यामुळे गावात स्वच्छता आणि आरोग्याचे प्रश्न उभे राहिले होते.या प्रकल्पांतर्गत तीन स्थिरीकरण तळी घेण्यात आली आहेत. या तळ्यांतून शुद्ध होणारे पाणी हे शेतीसाठी वापरले जाणार आहे. या प्रकल्पाची अंदाजपत्रकीय रक्कम रु. १७.९१ लक्ष इतकी असून, या कामासाठी प्रत्यक्ष १०. ७० लक्ष इतका खर्च झालेला आहे.यावेळी राम शिंदे, सभापती अर्चना चौगले, उपसभापती संजय माने, पं. स. सदस्य सुरेश कांबळे, राजगोंड पाटील यांच्यासह सरपंच व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :riverनदीzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर