शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
3
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
4
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
5
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
6
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
7
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
8
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
9
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
10
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
11
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
12
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
13
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
14
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
15
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
16
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
17
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
18
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
19
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
20
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
Daily Top 2Weekly Top 5

कट मेरठच्या जेलमध्ये.. चोऱ्या कोल्हापुरात; सराईत आंतरराज्यीय टोळी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:14 IST

सात गुन्ह्यांचा उलगडा, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : चोरीच्या गुन्ह्यात मेरठ (उत्तर प्रदेश) येथील जेलमध्ये शिक्षा भोगताना चोरट्यांनी कट रचला आणि सुटका होताच कोल्हापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातला. बीएसएनलच्या मोबाइल टॉवरची बॅटरी आणि शेतकऱ्यांचे सोलर पंप चोरून भंगारात घालणारी आंतरराज्यीय टोळी पोलिसांनी जेरबंद केली. त्यांच्याकडून सात गुन्ह्यांचा उलगडा करून चोरीतील सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. २६) सायंकाळी कसबा बावडा ते शिये रोडवर ही कारवाई केली.दत्ता बाळू गावडे (वय ३२, रा. गोंदी, ता. आटपाडी, जि. सांगली), प्रीतेश गिरीष पुजारी (३५, रा. गुजरवाडी, कात्रज, पुणे) आणि साकिब साबिर मलिक (३५, सध्या रा. शाहूपुरी, चौथी गल्ली, मूळ रा. मेरठ, उत्तर प्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील चौथा आरोपी इम्रान अन्सारी (रा. मेरठ) याचा शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपासाची माहिती दिली. जिल्ह्यात झालेल्या बॅटरी आणि सोलर पंप चोरीच्या घटनांमध्ये सांगली जिल्ह्यातील सराईत चोरटा दत्ता गावडे याचा सहभाग असल्याची माहिती अंमलदार हिंदुराव केसरे आणि विजय इंगळे यांना मिळाली होती. दोन्ही संशयित चोरीतील मुद्देमाल विकण्यासाठी कसबा बावडामार्गे शाहूपुरीत जाणार असल्याचे समजताच शिये फाटा ते बावडा मार्गावर सापळा रचून संशयित कार अडवली. त्यातील गावडे आणि त्याचा साथीदार प्रीतेश पुजारी याला अटक केली.त्यांच्या चौकशीत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या सात गुन्ह्यांचा उलगडा झाला. चोरीतील मुद्देमाल शाहूपुरी येथील साकिब मलिक याच्याकडे भंगारात घातल्याची कबुली दोघांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी मलिक याला अटक करून चोरीतील बॅटरींसह सोलर पंपांच्या प्लेटा जप्त केल्या. उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने कारवाई केली.पाच महिन्यांपूर्वी सुटकागावडे आणि प्रीतेश पुजारी हे दोघे चोरीच्या गुन्ह्यात मेरठ येथील जेलमध्ये होते. त्यावेळी इम्रान अन्सारी आणि साकीब मलिक यांच्याशी ओळख झाली. तिथेच त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात चो-या करण्याचा कट रचला. त्यानुसार पाच महिन्यांपूर्वी सुटका होताच ते कोल्हापुरात पोहोचले. दिवसा रेकी करून रात्रीच्या वेळी त्यांनी चोऱ्या केल्या. त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.