शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 08:18 IST

राधानगरी धरण परिसरात सतत कोसळणाऱ्या संततधार पावसाने राधानगरी धरणाचे सात ही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत.

ठळक मुद्देराधानगरी धरण परिसरात सतत कोसळणाऱ्या संततधार पावसाने राधानगरी धरणाचे सात ही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले.धरणातून 11396 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

धामोड - राधानगरी धरण परिसरात सतत कोसळणाऱ्या संततधार पावसाने राधानगरी धरणाचे सात ही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून 11396 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.

मध्यरात्रीपासून धरण परिसरात पावसाचा जोर वाढतच चालला असल्याने सध्या धरणाचे सातही दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रविवारी (8 सप्टेंबर) सकाळी सात नंतरही परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून धरणाच्या सर्व्हिस गेटमधून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. परिणामी प्रशासनाकडून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कोळी लोकांनी वेळीच स्थलांतर करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोल्हापुराला पुराचा मोठा धोका संभावतो आहे.

मुंबई, कोकणात जोरधार; कोल्हापुरामध्ये पूरस्थिती

मुंबई, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून कोल्हापूरला पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होऊन ती 37 फुटांवर पोहोचली आहे. महापुराची 39 फुटांची इशारा पातळी गाठण्यास अवघे दोन फूट शिल्लक राहिल्याने धास्तीने नागरिकांनी स्थलांतरास सुरुवात केली आहे. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती कायम असून एक गणेश भक्त वाहून गेल्याची घटना घडली.

कोल्हापूर जिल्ह्यातील 65 बंधारे पाण्याखाली गेल्याने 20 मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या तीन तुकड्यांना नदीकाठच्या गावांजवळ तैनात करण्यात आले आहे. नदीकाठच्या 129 आणि पूरबाधित 363 गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. कोयना धरणातून 41 हजार 888 क्युसेक विसर्ग केला जात आहे. कृष्णा व कोयना नद्यांना पूर आला आहे. सांगलीत कृष्णा नदीपातळी मंदगतीने कमी होत असली तरी पुराचा धोका अद्याप टळलेला नाही.

गोव्यात पावसाचा मारा जोरात सुरू असून पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोलीत अनेक मार्ग बंद सतत दुसऱ्या दिवशीही गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थिती कायम आहे. अनेक मार्ग बंद आहेत. गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी देखील वाढली आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणfloodपूर