शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 08:18 IST

राधानगरी धरण परिसरात सतत कोसळणाऱ्या संततधार पावसाने राधानगरी धरणाचे सात ही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत.

ठळक मुद्देराधानगरी धरण परिसरात सतत कोसळणाऱ्या संततधार पावसाने राधानगरी धरणाचे सात ही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले.धरणातून 11396 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

धामोड - राधानगरी धरण परिसरात सतत कोसळणाऱ्या संततधार पावसाने राधानगरी धरणाचे सात ही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून 11396 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.

मध्यरात्रीपासून धरण परिसरात पावसाचा जोर वाढतच चालला असल्याने सध्या धरणाचे सातही दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रविवारी (8 सप्टेंबर) सकाळी सात नंतरही परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून धरणाच्या सर्व्हिस गेटमधून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. परिणामी प्रशासनाकडून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कोळी लोकांनी वेळीच स्थलांतर करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोल्हापुराला पुराचा मोठा धोका संभावतो आहे.

मुंबई, कोकणात जोरधार; कोल्हापुरामध्ये पूरस्थिती

मुंबई, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून कोल्हापूरला पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होऊन ती 37 फुटांवर पोहोचली आहे. महापुराची 39 फुटांची इशारा पातळी गाठण्यास अवघे दोन फूट शिल्लक राहिल्याने धास्तीने नागरिकांनी स्थलांतरास सुरुवात केली आहे. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती कायम असून एक गणेश भक्त वाहून गेल्याची घटना घडली.

कोल्हापूर जिल्ह्यातील 65 बंधारे पाण्याखाली गेल्याने 20 मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या तीन तुकड्यांना नदीकाठच्या गावांजवळ तैनात करण्यात आले आहे. नदीकाठच्या 129 आणि पूरबाधित 363 गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. कोयना धरणातून 41 हजार 888 क्युसेक विसर्ग केला जात आहे. कृष्णा व कोयना नद्यांना पूर आला आहे. सांगलीत कृष्णा नदीपातळी मंदगतीने कमी होत असली तरी पुराचा धोका अद्याप टळलेला नाही.

गोव्यात पावसाचा मारा जोरात सुरू असून पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोलीत अनेक मार्ग बंद सतत दुसऱ्या दिवशीही गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थिती कायम आहे. अनेक मार्ग बंद आहेत. गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी देखील वाढली आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणfloodपूर