शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पाणीटंचाई निवारणासाठी ३३ विंधन विहिरींचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 12:33 IST

कोल्हापूर जिल्हयातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करता पाणीटंचाई निवारण कृती आराखडा उपाययोजनांतर्गत विंधन विहिरींसाठी जिल्हयातून ३३ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत. लवकरच हे मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे येणार आहेत. यावर शहानिशा होऊन प्रांताधिकाऱ्यांचा अभिप्राय घेतल्यानंतरच त्याला मंजुरी दिली जाणार आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई निवारणासाठी ३३ विंधन विहिरींचे प्रस्ताव जिल्हा परिषद लवकरच मान्यतेसाठी जिल्हा प्रशासनाला पाठविणार प्रांताधिकाऱ्यांच्या अभिप्रायानंतरच मिळणार मंजुरी

प्रवीण देसाई

कोल्हापूर : जिल्हयातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करता पाणीटंचाई निवारण कृती आराखडा उपाययोजनांतर्गत विंधन विहिरींसाठी जिल्हयातून ३३ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत. लवकरच हे मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे येणार आहेत. यावर शहानिशा होऊन प्रांताधिकाऱ्यांचा अभिप्राय घेतल्यानंतरच त्याला मंजुरी दिली जाणार आहे.संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर महिन्याच्या कालावधीत पाणीटंचाई निवारण कृती आराखडा उपाययोजनेंतर्गत ग्रामस्तरावरून माहिती घेतली जाते. त्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक, जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक भूवैज्ञानिक, कार्यकारी अभियंता यांच्या माध्यमातून पाहणी करून तो प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला जातो.

ही पाहणी करताना संबंधित गावांत चौदाव्या वित्त आयोगातून पाणीपुरवठ्या संदर्भातील कोणते काम झाले आहे का हे पाहिले जाते. त्यानंतर त्या गावात पाण्यासाठी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे ते पाहिले जाते.

यामध्ये उदा. विंधन विहिरी, विहिरींचा गाळ काढणे व खोलीकरण, खासगी विहिरी अधिग्रहण करणे, नळ पाणीपुरवठा योजना विशेष दुरुस्ती करणे, टॅँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे आदींचा यामध्ये समावेश आहे.

यंदा संंबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून विंधन विहिरींसाठीचे ३३ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केले आहेत. हे प्रस्ताव परिपूर्ण करून जिल्हा परिषदेने मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवायचे आहेत.

लवकरच ते येणे अपेक्षित आहे. हे प्रस्ताव प्राप्त झाल्यावर खरोखर संबंधित गावात पाणीटंचाई आहे का? तसेच त्या ठिकाणी कोणती उपाययोजना अपेक्षित असून ती निकषांत बसते का हे पाहिले जाणार आहे. त्याचबरोबर संंबंधित प्रांताधिकाऱ्यांकडून अभिप्राय घेऊनच जिल्हाधिकारी त्याला मंजुरी देणार आहेत.

तालुके               प्रस्तावहातकणंगले       ६भुदरगड             ४गडहिंग्लज         ४कागल               ६राधानगरी         ६गगनबावडा      २चंदगड              २आजरा             १करवीर             २

जिल्हाधिकारीच घेणार निर्णयपाणीटंचाईसंदर्भात जिल्हा परिषदेकडे विंधन विहिरींसाठी प्राप्त झालेले प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे येणार आहेत. त्यावर शहानिशा करून आवश्यकता असल्यास या प्रस्तावांना मंजुरी जिल्हाधिकारी देणार आहेत. त्याचे सर्वाधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीcollectorतहसीलदारzpजिल्हा परिषद