शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

कोल्हापूर : पाणीटंचाई निवारणासाठी ३३ विंधन विहिरींचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 12:33 IST

कोल्हापूर जिल्हयातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करता पाणीटंचाई निवारण कृती आराखडा उपाययोजनांतर्गत विंधन विहिरींसाठी जिल्हयातून ३३ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत. लवकरच हे मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे येणार आहेत. यावर शहानिशा होऊन प्रांताधिकाऱ्यांचा अभिप्राय घेतल्यानंतरच त्याला मंजुरी दिली जाणार आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई निवारणासाठी ३३ विंधन विहिरींचे प्रस्ताव जिल्हा परिषद लवकरच मान्यतेसाठी जिल्हा प्रशासनाला पाठविणार प्रांताधिकाऱ्यांच्या अभिप्रायानंतरच मिळणार मंजुरी

प्रवीण देसाई

कोल्हापूर : जिल्हयातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करता पाणीटंचाई निवारण कृती आराखडा उपाययोजनांतर्गत विंधन विहिरींसाठी जिल्हयातून ३३ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत. लवकरच हे मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे येणार आहेत. यावर शहानिशा होऊन प्रांताधिकाऱ्यांचा अभिप्राय घेतल्यानंतरच त्याला मंजुरी दिली जाणार आहे.संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर महिन्याच्या कालावधीत पाणीटंचाई निवारण कृती आराखडा उपाययोजनेंतर्गत ग्रामस्तरावरून माहिती घेतली जाते. त्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक, जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक भूवैज्ञानिक, कार्यकारी अभियंता यांच्या माध्यमातून पाहणी करून तो प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला जातो.

ही पाहणी करताना संबंधित गावांत चौदाव्या वित्त आयोगातून पाणीपुरवठ्या संदर्भातील कोणते काम झाले आहे का हे पाहिले जाते. त्यानंतर त्या गावात पाण्यासाठी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे ते पाहिले जाते.

यामध्ये उदा. विंधन विहिरी, विहिरींचा गाळ काढणे व खोलीकरण, खासगी विहिरी अधिग्रहण करणे, नळ पाणीपुरवठा योजना विशेष दुरुस्ती करणे, टॅँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे आदींचा यामध्ये समावेश आहे.

यंदा संंबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून विंधन विहिरींसाठीचे ३३ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केले आहेत. हे प्रस्ताव परिपूर्ण करून जिल्हा परिषदेने मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवायचे आहेत.

लवकरच ते येणे अपेक्षित आहे. हे प्रस्ताव प्राप्त झाल्यावर खरोखर संबंधित गावात पाणीटंचाई आहे का? तसेच त्या ठिकाणी कोणती उपाययोजना अपेक्षित असून ती निकषांत बसते का हे पाहिले जाणार आहे. त्याचबरोबर संंबंधित प्रांताधिकाऱ्यांकडून अभिप्राय घेऊनच जिल्हाधिकारी त्याला मंजुरी देणार आहेत.

तालुके               प्रस्तावहातकणंगले       ६भुदरगड             ४गडहिंग्लज         ४कागल               ६राधानगरी         ६गगनबावडा      २चंदगड              २आजरा             १करवीर             २

जिल्हाधिकारीच घेणार निर्णयपाणीटंचाईसंदर्भात जिल्हा परिषदेकडे विंधन विहिरींसाठी प्राप्त झालेले प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे येणार आहेत. त्यावर शहानिशा करून आवश्यकता असल्यास या प्रस्तावांना मंजुरी जिल्हाधिकारी देणार आहेत. त्याचे सर्वाधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीcollectorतहसीलदारzpजिल्हा परिषद