शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : हक्क मिळविण्यासाठी विभाजन नको, एकजूट आवश्यक  : मनीषा गुप्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 16:16 IST

जाती, धर्म, पंथ आदींच्या पातळीवर महिला एकमेकांपासून दुरावत आहेत. त्यांचे अशा पद्धतीने होणारे विभाजन क्लेशदायी आहे. त्यामुळे आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक हक्क मिळविण्यासाठी आपल्या विभाजन नको, तर एकजूट राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या, विचारवंत मनीषा गुप्ते यांनी गुरूवारी येथे केले.

ठळक मुद्दे हक्क मिळविण्यासाठी विभाजन नको, एकजूट आवश्यक : मनीषा गुप्तेशिवाजी विद्यापीठात राज्य महिला आरोग्य हक्क परिषदेचा प्रारंभ

कोल्हापूर : जाती, धर्म, पंथ आदींच्या पातळीवर महिला एकमेकांपासून दुरावत आहेत. त्यांचे अशा पद्धतीने होणारे विभाजन क्लेशदायी आहे. त्यामुळे आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक हक्क मिळविण्यासाठी आपल्या विभाजन नको, तर एकजूट राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या, विचारवंत मनीषा गुप्ते यांनी गुरूवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठातील सातव्या महाराष्ट्र राज्य महिलाआरोग्य हक्क परिषदेच्या उदघाटनप्रसंगी त्यांचे बीजभाषण झाले. विद्यापीठातील श्रीमती शारदाबाई पवार अध्यासन आणि आरोग्य हक्क परिषद संयोजन समितीतर्फे आयोजित परिषदेचा विषय ‘महाराष्ट्र : सामाजिक, राजकीय वर्तमान आणि महिलांचे आरोग्य’ असा आहे. वि. स. खांडेकर सभागृहातील या कार्यक्रमास संपदा ग्रामीण महिला संस्थेच्या (संग्राम) जनरल सेक्रेटरी मीना शेषू, ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, अध्यासनाच्या समन्वयक प्रा. डॉ. भारती पाटील प्रमुख उपस्थित होत्या.

ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या मनीषा गुप्ते म्हणाल्या, महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी कष्टकरी महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी सजग राहिले पाहिजे. आरोग्य हा मूलभूत अधिकार नसल्याने त्याचे खासगीकरण सहजतेने होत असून त्याचा परिणाम गरीब, महिला, अल्पसंख्यांकांवर होत आहे.

सरकारी आरोग्य सेवा सदृढ कशी होईल, याकडे आपण लक्ष द्यावे. देशात आज राज्यघटनेने दिलेले हक्क निघून जात आहेत. घरातील आणि बाहेरील कृत्रिम विभाजन दूर करणे हे आपल्यासमोरील मोठे आव्हान आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी म्हणाल्या, महिलांचे विविध हक्क कायम राहण्यासाठी संविधान अबाधित राहणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमास तनुजा शिपूरकर, सीमा पाटील, अनुराधा गायकवाड, शुभांगी कुलकर्णी, सुजाता मुस्कान, अनुराधा भोसले, पद्मिनी पिळणकर आदींसह राज्यभरातील सुमारे पाचशे महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. प्रा. भारती पाटील यांनी परिषद आणि अध्यासनाची उद्दिष्टे सांगितली.

परिषदेच्या संयोजिका डॉ. मेघा पानसरे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. लता भिसे यांनी प्रास्ताविक केले. विजया जोरी यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, उदघाटनानंतरच्या सत्रांमध्ये ऊसतोडणी, घरगुती, बांधकाम, कचरावेचक, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे प्रश्न, त्यांचे आरोग्याधिकार, शासकीय आरोग्य सेवा, योजनांबाबत चर्चा झाली.

अन्यथा सन्माचा अधिकार हिसकावून घेऊ : मीना शेषू समाजाला बदलण्याची ताकद आमच्यात आहे. संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना पायउतार करण्याचे काम आपण करूया, असे आवाहन ‘संग्राम’ संस्थेच्या जनरल सेक्रेटरी मीना शेषू यांनी केले. त्या म्हणाल्या, महिलांचे हक्क आणि मानवाधिकारासाठी आपण काम करूया. देश सर्वांचा असून येथील भूमीवर जगण्याचा सन्मानाचा अधिकार प्रत्येकाला आहे. जर, हा अधिकार आम्हाला दिला नाही, तर आम्ही तो हिसकावून घेऊ. 

 

टॅग्स :WomenमहिलाHealthआरोग्यShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर