शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

Kolhapur North By Election Result: शिवसेनेने मातोश्रीचा आदेश खरा करुन दाखवला..भाजपला लीड तुटलेच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 11:46 AM

कोल्हापूरच्या जनतेने काँग्रेसला हात देवून एकप्रकारे महाविकास आघाडीला बळ दिले.

कोल्हापूर : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी पंधराव्या फेरीअखेर निर्णायक १३ हजार ९९८ मतांची आघाडी घेतली आहे. एकूण २६ फेऱ्या आहेत. भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी तगडे आव्हान दिले परंतू कोल्हापूरच्या जनतेने काँग्रेसला हात देवून एकप्रकारे महाविकास आघाडीला बळ दिले.मोजलेल्या पंधरापैकी दहा फेऱ्यांमध्ये काँग्रेसला तर पाच फेऱ्यांमध्ये भाजपला मताधिक्कय मिळाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेला शब्द शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसच्या उमेदवारास मतदान करून खरा करून दाखविल्याचे चित्र पुढे आले आहे.काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबरमध्ये निधन झाल्याने ही निवडणूक झाली. एकूण २ लाख ९१ हजार मतदारांपैकी १ लाख ७५ हजार ३४१ (६१.१९ टक्के) मतदारांनी हक्क बजावला होता. एकूण १५ उमेदवार रिंगणात होते. परंतू लढत दुरंगीच झाली.भाजपचे हिंदुत्व विरुध्द महाविकास आघाडीचा शिव-शाहूचा विचार अशीच ही लढत झाली. कोल्हापूरची जनता शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांच्या शहरात कोणत्या विचारांना बळ देते याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. शनिवारी दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत एकूण ९८ हजार ९१४ मते मोजण्यात आली. त्यापैकी काँग्रेसच्या जयश्री जाधव यांन ५८३५१ तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ४४३५३ मते मिळाली.तिसऱ्या क्रमांकाची ९१६ मते नोटाला मिळाली आहेत. करुणा मुंडे यांना आतापर्यंत अवघी ७५ मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शाहीन शेख यांना ३१९ मते मिळाली आहेत. पोस्टल मतांमध्ये काँग्रेसच्या जाधव यांना ३१५ तर भाजपच्या कदम यांना २१४ मते मिळाली आहेत. टपाली मतांतही जाधव यांना १०१ मतांची आघाडी मिळाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकkolhapur-north-acकोल्हापूर उत्तरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा