शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

Kolhapur North By Election Result: दणदणीत विजयानंतर काँग्रेसच्या जयश्री जाधव भावूक, म्हणाल्या, ‘’या विजयाचं श्रेय…’’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 2:01 PM

Kolhapur North By Election Result Live: राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांना पराभूत केले.

कोल्हापूर - राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांना पराभूत केले. दरम्यान, या विजयानंतर जयश्री पाटील यांनी भावूक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या विजयामध्ये दिवंगत पती चंद्रकांत जाधव यांनी ठेवलेला जनसंपर्क उपयुक्त ठरल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या विजयात महाविकास आघाडी, सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, पदाधिकारी, स्वाभिमानी जनता आणि नगरसेवक यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले.

विजयानंतर जयश्री राजे म्हणाल्या की, कोल्हापूरच्या जनतेने आपला शब्द पाळला आहे. कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमान राखला. तसेच महाविकास आघाडीने या निवडणुकीत जी जबाबदारी घेतली होती ती पूर्ण केली आहे. त्याबरोबरच नेते मंडळी, कार्यकर्त, माझी स्वाभिमानी जनता यांनी अण्णांच्या माघारी जी जबाबदारी घेतली होती ती पूर्ण केली आहे. हा विजय हा कोल्हापूरमधील स्वाभिमानी जनचेचा आहे. महाविकास आघाडीचा आहे. अण्णांनी जे पेरलं ते उगवलं, असं मी म्हणेन. माझ्या विजयात महाविकास आघाडी, सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, मालोजीराजे, पदाधिकारी, स्वाभिमानी जनता आणि नगरसेवक यांचा हात आहे, असे त्यांनी सांगितले.

या निवडणुकीत मला मताधिक्य मिळणार ही अपेक्षा होती. जनता आमच्यासोबत होती. त्यांनी पूर्णपणे आम्हाला सहकार्य केलं. तसेच कोल्हापूर हे पुरोगामी विचारांचं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित ठरलेला होता. चंद्रकांतदादांचा मुद्दा फोल ठरला आहे, असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. खरंतर ही पोटनिवडणूक लागायला नको होती. दिवंगत आमदार अण्णांची हक्काची पाच वर्षे होती. पण नियतीच्या मनात वेगळं होतं. दुर्दैवाने अण्णांच निधन झालं. परंतु भाजपाने पोटनिवडणूक लावली. खरं म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी मोठेपण दाखवायला हवं होतं. ते त्यांच्यासाठी चांगलं ठरलं असतं, असे त्यांनी सांगितले.

अण्णांनी प्रामाणिकपणे काँग्रेसचं काम केलं होतं. पतीचं अपूर्ण काम पूर्ण करणे पत्नीचं कर्तव्य म्हणून काँग्रेसचा झेंडा हाती घेतला, असे सांगत जयश्री जाधव यांनी आता जनतेची सेवा करायची आहे. अण्णांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. अण्णांचा आशीर्वाद आहेत, अशी भावना व्यक्त केली.

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरElectionनिवडणूकcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी