शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कोल्हापूर : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास सर्वांच्या योगदानाची गरज:  सुदर्शन भगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 6:19 PM

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरीवर्गाच्या सर्वांगीण विकासातच देशाची प्रगती अवलंबून आहे. त्यासाठीच सन २०२२ पर्यंत अर्थात देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी शेतकरी राजाचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देसिद्धगिरी कारागीर महाकुंभ; महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अलोट गर्दीशेतकरी राजाचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज : भगत

कणेरी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानतर्फे आयोजित कारागीर महाकुंभाला केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी भेट दिली. यावेळी बसंतकुमार सिंग, गोपाल उपाध्याय आदी उपस्थित होते.कोल्हापूर : भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरीवर्गाच्या सर्वांगीण विकासातच देशाची प्रगती अवलंबून आहे. त्यासाठीच सन २०२२ पर्यंत अर्थात देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी शेतकरी राजाचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.कणेरी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठातर्फे आयोजित कारागीर महाकुंभाला मंत्री सुदर्शन भगत यांनी भेट दिली. महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी सिद्धगिरी मठावर भाविकांची अलोट गर्दी झाली. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी राज्यांतून भाविक दर्शनासाठी आले होते. त्यामुळे मठाचा परिसर गर्दीने फुलून गेला.मंत्री सुदर्शन भगत म्हणाले, शेती व ग्रामीण परंपरागत उद्योगाकडे झालेले दुर्लक्ष हे फार चिंतनीय असून ही चूक वेळीच सुधारली पाहिजे. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते ‘ज्ञानदूत’ आणि ‘आरोग्य मंत्रा’ या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.

विजय कदम, मुक्ता दाभोलकर, विवेक सिद्ध, चंद्रशेखर, रूपाश्री सिद्धापुरे, डॉ. दत्ता निकम, सचिन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, राजेश आयदे, बसंतकुमार सिंग, आदी उपस्थित होते.

दरम्यान, सिद्धगिरी मठ येथे मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता काकड आरती आणि विधिवत पूजनाने ‘महाशिवरात्री उत्सव’चा प्रारंभ झाला. यावेळी मंत्री सुदर्शन भगत, फत्तेपूर (उत्तर प्रदेश) येथील स्वामी विज्ञानानंद प्रमुख उपस्थित होते.

 

कणेरी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानतर्फे आयोजित कारागीर महाकुंभाला केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी कोल्हापूरचे चित्रकार सुनील पंडित यांच्याकडून आपले चित्र रेखाटून घेतले.

यानंतर मंत्री भगत यांनी सिद्धगिरी कारागीर महाकुंभाला त्यांनी भेट देऊन तेथील कलाकारांनी निर्माण केलेल्या विविध कलात्मक वस्तूंची निर्मितीसह माहिती घेतली.

अदिवासी युवक-युवतींसाठी आश्रमशाळाआश्रमशाळा संस्कृतीमधूनच आपण आदिवासी युवक ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत प्रगती केली आहे. वाल्मिकी आणि सबरीमाता असे आदिवासी युवक युवतीसाठी आश्रमशाळा सुरू करणार असल्याचे यावेळी मंत्री सुदर्शन भगत यांनी सांगितले.

महाकुंभात बुधवारी 

  1. * सायंकाळी साडेपाच वाजता : महाशिवरात्री उत्सव (काकड आरती)
  2. * सकाळी नऊ वाजता : प्रवचन
  3. *सायंकाळी सहा वाजता : सिद्धगिरी गुरूकुलम्च्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम
  4. * रात्री आठ वाजता : सत्संग 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahashivratriमहाशिवरात्री