शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

Election: महापालिकेची रणधुमाळी आता ऑक्टोबरनंतरच शक्य, इच्छुकांच्या तयारीवर फिरते पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 10:59 IST

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे त्रांगडे होऊन बसले आहे. ओबीसी आरक्षण, तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर राज्य सरकारने अतिक्रमण केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात डझनभर याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावर एकत्र सुनावणी घेण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.

कोल्हापूर : ओबीसी आरक्षण, तसेच प्रभाग रचना व निवडणूक तारखा जाहीर करण्याचे अधिकार राज्य सरकारने आपल्या हाती घेण्याच्या मुद्यावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबत चालल्यामुळे महानगरपालिका निवडणुका ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्या जातील, अशी शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे त्रांगडे होऊन बसले आहे. ओबीसी आरक्षण, तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर राज्य सरकारने अतिक्रमण केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात डझनभर याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावर एकत्र सुनावणी घेण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. सोमवारी या याचिकांवर सुनावणी सुरू होणार होती; परंतु ती झाली नाही. ती आता दि. ४ मे रोजी होणार आहे. सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांसह दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्यावर निर्णय घेण्याची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग रचना, तसेच निवडणुकांच्या तारखा ठरविण्याचे अधिकार स्वत:कडे घेतले आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायच्या नाहीत अशी भूमिका राज्य सरकारची आहे. राज्य सरकारची भूमिका, तसेच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत होत असलेला विलंब पाहता राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत पुढे जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यामुळे निवडणुका कधी होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

मुदत संपून दीड वर्ष लोटले

कोल्हापूर महानगरपालिका सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर २०२० रोजी संपली असून, सहा महिन्यांसाठी प्रशासक म्हणून कादंबरी बलकवडे यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला आहे. पुढे कोरोना संसर्ग सुरू झाल्यामुळे पुन्हा सहा महिन्यांनी प्रशासकांची मुदत वाढविली. २०२१ मध्येही कोरोनाचा संसर्ग राहिल्यानंतर तिसऱ्यांदा प्रशासक म्हणून बलकवडे यांच्याकडेच ठेवण्यात आला.

तीन वेळा प्रभाग रचना

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तीन वेळा प्रभाग रचना करण्यात आली. सर्वप्रथम २०१९ च्या अखेरीस प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू झाले, ते २०२० च्या सप्टेंबरपर्यंत चालले. त्यानंतर प्रभागांची संख्या वाढविण्याचा निर्णय झाला, त्यानुसार ८१ चे ९० प्रभाग करण्यात आले. त्यानंतर बहुसदस्यीय प्रभाग रचना, तसेच नगरसेवकांची संख्या ९२ पर्यंत वाढविण्यात आली. तिसऱ्यांदा केलेली प्रभाग रचना राज्य सरकारने अधिकारी आपल्याकडे घेतल्यामुळे रद्द करावी लागली. आता राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या मार्गदर्शनानुसार चौथ्यांदा प्रभाग रचना करावी लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकOBC Reservationओबीसी आरक्षण