शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा दुबईपेक्षाही महाग; खासदार, पालकमंत्र्यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 04:12 IST

कोल्हापूर - मुंबई विमानसेवा दुबईपेक्षाही महाग झाली आहे. सर्वसामान्यांना विमानाने प्रवास करणे सोपे राहिलेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: कोल्हापूर - मुंबई विमानसेवा दुबईपेक्षाही महाग झाली आहे. सर्वसामान्यांना विमानाने प्रवास करणे सोपे राहिलेले नाही. यावर जरा नियंत्रण ठेवा, असे सांगत पालकमंत्री प्रकाश आबिटकर व खासदार धैर्यशील माने यांनी गुरुवारी केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत सवलतीच्या दरात दिल्या जाणाऱ्या विमान प्रवासाच्या दाव्याची केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोरच पोलखोल केली. 

आपल्याच सरकारमधील लोकप्रतिनिधींनी उडाण योजनेवर शंका उपस्थित केल्याने मंत्री मोहोळही काही क्षण गोंधळले. मात्र, दुसऱ्याच क्षणी त्यांनी या दरावर नियंत्रण ठेवू, अशी ग्वाही देत सारवासारव केली.

कोल्हापूर विमानतळावरील एटीसी टॉवरच्या उद्घाटनानंतर मंत्री मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोल्हापूर विमानतळावरून काही मार्गांवर उडाण योजनेंतर्गत सेवा सुरू असतानाही मुंबईला जाण्यासाठी काहीवेळा २० ते २५ हजार रुपये मोजावे लागत असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. याचवेळी खासदार माने यांनी कोल्हापूर - मुंबई विमानसेवा दुबईपेक्षाही महाग झाली आहे. त्याच्या तिकीट दरावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली. पालकमंत्री आबिटकर यांनीही हाच मुद्दा पुढे नेत उडाण योजनेंतर्गत किती सर्वसामान्य लोकांनी प्रवास केला, याची माहिती द्या, असे सांगितले.

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूरairplaneविमान