शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

कोल्हापूर : शिक्षण वाचविण्यासाठी शिक्षक रस्त्यावर, दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 4:57 PM

राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन काम करणाऱ्या राज्य सरकारने कायद्यांचे उल्लंघन करून खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्याचा अधिकार दिला आहे. राज्य सरकारचा हा डाव हाणून पाडू, असा निर्धार विद्यार्थ्यांसह शिक्षक, नागरिकांनी शपथ घेऊन केला.

ठळक मुद्दे शिक्षण वाचविण्यासाठी शिक्षक रस्त्यावरदहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली शपथ शिक्षण खासगी कंपन्यांकडे देण्याचा डाव हाणून पाडण्याचा निर्धार

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन काम करणाऱ्या राज्य सरकारने कायद्यांचे उल्लंघन करून खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्याचा अधिकार दिला आहे. राज्य सरकारचा हा डाव हाणून पाडू, असा निर्धार विद्यार्थ्यांसह शिक्षक, नागरिकांनी शपथ घेऊन केला.कोल्हापुरात शनिवारी दसरा चौकात शिक्षण बचाव नागरी कृती समिती व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संघटनांच्या वतीने ‘शिक्षण हक्क जागरा’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘शाळा वाचवा’अशी हाक दिली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी ‘आम्हाला मताचा अधिकार नसला तरी मत मांडण्याचा अधिकार आहे,’ असे सांगत ‘शाळा वाचली तर आपण वाचणार आहोत; त्यामुळे राज्य सरकारने घेतलेला निर्णय मागे घ्यावा,’ अशी मागणी केली. यानंतर कृती समिती व शैक्षणिक संघटनेतील प्रमुखांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना याबाबत मागण्यांचे निवेदन दिले.

केंद्र शासनाने ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९’ हा संपूर्ण राज्यात लागू केला. मात्र, महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी या कायद्याचे उल्लंघन करून खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे गोरगरीब व सामान्य जनतेच्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा हेतू स्पष्ट होतो.या अधिकारामुळे राज्यातील १३१४ पैकी कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ शाळा बंद होणार आहेत. शिक्षणाचा हक्क अबाधित राहावा यासाठी कृती समिती व शैक्षणिक संघटनेतर्फे दसरा चौकात ‘शिक्षण जागर’ होऊन विद्यार्थी व शिक्षकांनी शपथ घेतली.

शिक्षणाचा हक्क अबाधित राहावा यासाठी शिक्षण बचाव नागरी कृती समिती व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संघटना आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी दसरा चौकात शनिवारी शपथ घेतली. या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी. (छाया : आदित्य वेल्हाळ) 

‘देश वाचवा, शिक्षण वाचवा’, ‘सर्वांना मोफत व गुणवत्तापूर्ण सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे’, ‘गोरगरिबांचे शिक्षण वाचले पाहिजे’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसर दुमदुमवून सोडला. ‘गरिबांचे शिक्षण वाचवूया..!’ अशी शपथ विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली. यावेळी दसरा चौक विद्यार्थ्यांनी फुलून गेला होता.यावेळी समितीचे समन्वयक अशोक पोवार, रमेश मोरे, गिरीश फोंडे, दादा लाड, राजेश वरक, भरत रसाळे, पंडित पोवार, कोरे, सुरेश संकपाळ, दत्ता पाटील यांच्यासह वसंत मुळीक, संभाजीराव जगदाळे, सुभाष देसाई, किशोर घाटगे, सतीशचंद्र कांबळे, लाला गायकवाड, श्रीकांत भोसले, आदी उपस्थित होते.या शाळा होत्या सहभागी* एम. एल. जी., राजाराम हायस्कूल, नूतन मराठी, मुस्लिम बोर्डिंग हायस्कूल, विद्यापीठ, इंदूमती हायस्कूल, दादासाहेब मगदूम, एस. एम. लोहिया हायस्कूल, आदी

 

शिक्षणामुळे आपण समाजाभिमुख होतो. शिक्षणव्यवस्था मोडीत निघाली तर देश मोडेल. त्यामुळे शाळा टिकल्या पाहिजेत.- नेहा पाटील,उषाराजे हायस्कूल, कोल्हापूर.

 

जीवनाच्या जडणघडणीत शिक्षण महत्त्वाचे आहे. मुख्याध्यापक, शिक्षकांमुळे विद्यार्थी गुणवत्तापूर्ण व परिपक्व घडतो.- गुलनाम पठाण,छत्रपती राजाराम हायस्कूल, कोल्हापूर.

खासगी कंपन्यांच्या हातात शाळा गेल्या तर आपण कंपनीचे ‘प्रॉडक्ट’ होणार. हे थांबले पाहिजे. शाळा व शिक्षक विद्यार्थ्यांना घडवितात. शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे.- अक्षरा सौंदलगे,वाय. पी. पोवार विद्यालय, कोल्हापूर 

सत्ताधारी राज्य सरकारने शिक्षणाचे बाजारीकरण करण्यास सुरुवात केली आहे. मुलांत जिद्द, मेहनत असूनही या अधिकारामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम सरकार करीत आहे.-स्वाती थोरात,भाई माधवराव बागल हायस्कुल. 

 सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हा प्रश्न सोडविला पाहिजे होता. यावर चर्चा होणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही.-वैष्णवी परीट,छत्रपती राजाराम हायस्कूल, कोल्हापूर.

 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षक