शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

कोल्हापूर : ‘एफआरपी’बाबत गुरुवारी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक, सहकार मंत्र्यांची मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 13:22 IST

एफआरपी व बॅँकांकडून मिळणारी उचल यामध्ये ५00-६00 रुपयांची तफावत असून, तेवढी रक्कम बॅँकांना देण्यास तयार नसल्याने सरकारच्या मदतीशिवाय एकरकमी एफआरपी देणेच शक्य नाही. याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुरुवारी (दि. १०) बैठक आयोजित केली आहे, तत्पूर्वी मंगळवारी (दि. ८) मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अडचणी मांडण्याचा निर्णय रविवारी झालेल्या साखर कारखानदारांच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्दे‘एफआरपी’बाबत गुरुवारी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक, सहकार मंत्र्यांची मध्यस्थी सरकारच्या मदतीशिवाय उचल अशक्यच, कारखानदारांची भूमिका

कोल्हापूर : एफआरपी व बॅँकांकडून मिळणारी उचल यामध्ये ५00-६00 रुपयांची तफावत असून, तेवढी रक्कम बॅँकांना देण्यास तयार नसल्याने सरकारच्या मदतीशिवाय एकरकमी एफआरपी देणेच शक्य नाही. याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुरुवारी (दि. १०) बैठक आयोजित केली आहे, तत्पूर्वी मंगळवारी (दि. ८) मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अडचणी मांडण्याचा निर्णय रविवारी झालेल्या साखर कारखानदारांच्या बैठकीत घेण्यात आला.एफआरपीबाबत जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक रविवारी कोल्हापुरात झाली. यामध्ये ऊस दरावरून निर्माण झालेल्या कोंडीवर चर्चा झाली. हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले, तरी शेतकऱ्यांच्या हातात दमडीही पडलेली नाही. शेतकऱ्यांची कर्जे थकली असून, खते, बियाणे व औषधांसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. याबद्दल शेतकऱ्यांमध्ये असंतोष असल्याची चर्चाही बैठकीत झाली; पण एफआरपीची रक्कम व बॅँकांकडून मिळणारी उचल यात मोठी तफावत असून, तेवढी कर्जरूपाने उचल वाढवून देण्यास बॅँका तयार नसल्याने एकरकमी पैसे देणेच अशक्य आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून गुरुवारच्या बैठकीपूर्वी उद्या, मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याची विनंती कारखानदारांनी केली. ती मान्य करत उद्या, मंगळवारी मोजकेच कारखानदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. यामध्ये कारखानदारीसमोरील अडचणी सांगून मदत करण्याची विनंती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीला माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर, के. पी. पाटील, योगेश पाटील, आदी उपस्थित होते.

‘स्वाभिमानी’च्या धास्तीने भरणा थांबविलाकारखानदारांनी एफआरपीच्या ८० टक्क्याप्रमाणे उसाची बिले भरण्याची तयारी केली होती. आज, सोमवारपासून त्याचा भरणा संबंधित बॅँकांत केला जाणार होता; पण ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने एफआरपीचे तुकडे करून पैसे दिले तर कारखाने बंद पाडण्याचा इशारा दिला होता. कारखानदारांनी त्याचा धसका घेऊन भरणाच थांबविला.

शेतकऱ्यांबद्दलही बैठकीत चिंताहंगाम सुरू होऊन दोन महिने झाले, तरी शेतकऱ्यांना पैसे देता आलेले नाहीत. याबाबत सर्वच कारखानदारांनी चिंता व्यक्त करत या संकटातून लवकर मार्ग काढावा, अशी विनंती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर