शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

कोल्हापूर : गुळाच्या एका आधणामागे हजाराचा तोटा, गूळ उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 18:13 IST

गुळाच्या दरात सातत्याने घसरण सुरू झाल्याने गूळ उत्पादक अडचणीत आला आहे. सध्या गुळाला सरासरी प्रतिक्विंटल ३००० ते ३४०० रुपये दर मिळत आहे. उत्पादन खर्च वाढल्याने या दरामुळे फायदा राहू दे, उलट तोटाच पदरात पडत असल्याने गूळ उत्पादक आतबट्ट्यात आले आहेत.

ठळक मुद्देगुळाच्या एका आधणामागे हजाराचा तोटा, गूळ उत्पादक अडचणीतमिळणाऱ्या उत्पन्न-खर्चाचा ताळमेळ बिघडला, ३५०० रुपये किमान दर मिळावा

कोल्हापूर : गुळाच्या दरात सातत्याने घसरण सुरू झाल्याने गूळ उत्पादक अडचणीत आला आहे. सध्या गुळाला सरासरी प्रतिक्विंटल ३००० ते ३४०० रुपये दर मिळत आहे. उत्पादन खर्च वाढल्याने या दरामुळे फायदा राहू दे, उलट तोटाच पदरात पडत असल्याने गूळ उत्पादक आतबट्ट्यात आले आहेत.

एका आधणामागे ८३०० ते ८५०० रुपये खर्च होत असताना मिळणारे उत्पन्न ६६०० ते ७०४० रुपये इतके मिळत आहे. म्हणजेच एका आधणामागे हजार ते दीड हजार रुपयांचे नुकसान सहन करून गुऱ्हाळे चालवावी लागत असल्याने गूळ उत्पादक अस्वस्थ आहेत.उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बिघडत चालल्याने गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरची ओळख असणारा गूळ उद्योग अडचणीत आला आहे. १२०० गुऱ्हाळघरे असणाऱ्या जिल्ह्यात आता केवळ १३० ते १८० इतक्याच गुऱ्हाळघरांवर गुळाचे उत्पादन घेतले जात आहे.

गेल्या वर्षी ही संख्या २४० च्या आसपास होती. म्हणजेच एका वर्षात आणखी ६० ते ११० गुऱ्हाळघरे बंद पडली आहेत. मजुरांची कमतरता असतानाही प्रसंगी नुकसान सहन करून गुऱ्हाळघरे चालविली जात आहेत. त्यामुळे साहजिकच दराचीही अपेक्षा वाढली आहे.यावर्षी उसाचा उतारा कमी झाल्याने हंगाम लवकर संपणार आहे. त्याचा फटका गुऱ्हाळघरांनाही बसणार आहे. ऊसच उपलब्ध नसल्याने लाखोंची गुंतवणूक करून सुरू केलेली गुऱ्हाळघरे लवकर बंद होऊन उत्पादकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आता आवक आहे तोवर दर चांगला मिळावा, अशी उत्पादकांची अपेक्षा आहे.

साखरेच्या दरावर ठरतो गुळाचा दरसाखरेचे घाऊक दर २९०० ते ३००० रुपये क्विंटलपर्यंत खाली असल्याने त्याचा फटका गुळाला बसला असल्याचे व्यापारी सांगत आहेत. गुळाची मागणीही कमी झाल्याचे म्हणणे आहे. या सर्वांचा परिणाम होऊन दर कमी होत आहे, असे व्यापारी सांगत असलेले कारण मात्र गूळ उत्पादक शेतकऱ्यांना पटलेले नाही. दर पाडण्यासाठी ते कारण शोधत असल्याचा आरोप आहे.

महिन्याभरात ५०० ते ९०० रुपयांनी घसरणहंगाम सुरू होताना सरासरी ३९०० रुपये प्रतिक्विंटल असणारा गुळाचा दर आता ३००० ते ३४०० रुपयांवर आला आहे. गेल्या महिनाभरात ५०० ते ९०० रुपयांनी दरात घसरण झाली आहे.

 

किमान ३५०० रुपये भाव मिळणे आवश्यक उसाच्या कमी उपलब्धतेमुळे आधीच हंगाम जास्त दिवस चालणार नाही, अशी चिंता असताना आता दरही कमी होत असल्याने उत्पादक अडचणीत आहे. किमान ३५०० रुपये भाव मिळाल्याशिवाय या अडचणीतून तो बाहेर पडणे शक्य नाही.

: राजेंद्र पाटील, गूळ उत्पादक, निगवे

 

उत्पादकाला येणारा खर्च (एका आधणासाठी)एका आधणातून २२० किलो गूळ मिळतो. एका आधणासाठी दोन टन उस लागतो. त्याचा सरासरी दर २८०० ते ३२०० रुपये प्रतिटन गृहीत धरल्यास ही किंमत ५६०० ते ६४०० रुपये इतकी होते. वाहतूक, मजुरी, रसायने, घाणा भाडे, आदींसह २७०० रुपये लागतात. असा एकूण एका आधणासाठी ८३०० ते ८६०० खर्च होतो.उत्पादकाला मिळणारे उत्पन्न (एका आधणातून)एका आधणातून २२० किलो गूळ मिळतो. याला सरासरी ३० ते ३२ रुपये दर गृहीत धरल्यास ६६०० ते ७०४० रुपये इतके उत्पन्न मिळते. दिवसाला पाच आधणे घेतली जातात. म्हणजेच दररोजचा तोटा पाच हजारांचा आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर