शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कोल्हापूर : गुळाच्या एका आधणामागे हजाराचा तोटा, गूळ उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 18:13 IST

गुळाच्या दरात सातत्याने घसरण सुरू झाल्याने गूळ उत्पादक अडचणीत आला आहे. सध्या गुळाला सरासरी प्रतिक्विंटल ३००० ते ३४०० रुपये दर मिळत आहे. उत्पादन खर्च वाढल्याने या दरामुळे फायदा राहू दे, उलट तोटाच पदरात पडत असल्याने गूळ उत्पादक आतबट्ट्यात आले आहेत.

ठळक मुद्देगुळाच्या एका आधणामागे हजाराचा तोटा, गूळ उत्पादक अडचणीतमिळणाऱ्या उत्पन्न-खर्चाचा ताळमेळ बिघडला, ३५०० रुपये किमान दर मिळावा

कोल्हापूर : गुळाच्या दरात सातत्याने घसरण सुरू झाल्याने गूळ उत्पादक अडचणीत आला आहे. सध्या गुळाला सरासरी प्रतिक्विंटल ३००० ते ३४०० रुपये दर मिळत आहे. उत्पादन खर्च वाढल्याने या दरामुळे फायदा राहू दे, उलट तोटाच पदरात पडत असल्याने गूळ उत्पादक आतबट्ट्यात आले आहेत.

एका आधणामागे ८३०० ते ८५०० रुपये खर्च होत असताना मिळणारे उत्पन्न ६६०० ते ७०४० रुपये इतके मिळत आहे. म्हणजेच एका आधणामागे हजार ते दीड हजार रुपयांचे नुकसान सहन करून गुऱ्हाळे चालवावी लागत असल्याने गूळ उत्पादक अस्वस्थ आहेत.उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बिघडत चालल्याने गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरची ओळख असणारा गूळ उद्योग अडचणीत आला आहे. १२०० गुऱ्हाळघरे असणाऱ्या जिल्ह्यात आता केवळ १३० ते १८० इतक्याच गुऱ्हाळघरांवर गुळाचे उत्पादन घेतले जात आहे.

गेल्या वर्षी ही संख्या २४० च्या आसपास होती. म्हणजेच एका वर्षात आणखी ६० ते ११० गुऱ्हाळघरे बंद पडली आहेत. मजुरांची कमतरता असतानाही प्रसंगी नुकसान सहन करून गुऱ्हाळघरे चालविली जात आहेत. त्यामुळे साहजिकच दराचीही अपेक्षा वाढली आहे.यावर्षी उसाचा उतारा कमी झाल्याने हंगाम लवकर संपणार आहे. त्याचा फटका गुऱ्हाळघरांनाही बसणार आहे. ऊसच उपलब्ध नसल्याने लाखोंची गुंतवणूक करून सुरू केलेली गुऱ्हाळघरे लवकर बंद होऊन उत्पादकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आता आवक आहे तोवर दर चांगला मिळावा, अशी उत्पादकांची अपेक्षा आहे.

साखरेच्या दरावर ठरतो गुळाचा दरसाखरेचे घाऊक दर २९०० ते ३००० रुपये क्विंटलपर्यंत खाली असल्याने त्याचा फटका गुळाला बसला असल्याचे व्यापारी सांगत आहेत. गुळाची मागणीही कमी झाल्याचे म्हणणे आहे. या सर्वांचा परिणाम होऊन दर कमी होत आहे, असे व्यापारी सांगत असलेले कारण मात्र गूळ उत्पादक शेतकऱ्यांना पटलेले नाही. दर पाडण्यासाठी ते कारण शोधत असल्याचा आरोप आहे.

महिन्याभरात ५०० ते ९०० रुपयांनी घसरणहंगाम सुरू होताना सरासरी ३९०० रुपये प्रतिक्विंटल असणारा गुळाचा दर आता ३००० ते ३४०० रुपयांवर आला आहे. गेल्या महिनाभरात ५०० ते ९०० रुपयांनी दरात घसरण झाली आहे.

 

किमान ३५०० रुपये भाव मिळणे आवश्यक उसाच्या कमी उपलब्धतेमुळे आधीच हंगाम जास्त दिवस चालणार नाही, अशी चिंता असताना आता दरही कमी होत असल्याने उत्पादक अडचणीत आहे. किमान ३५०० रुपये भाव मिळाल्याशिवाय या अडचणीतून तो बाहेर पडणे शक्य नाही.

: राजेंद्र पाटील, गूळ उत्पादक, निगवे

 

उत्पादकाला येणारा खर्च (एका आधणासाठी)एका आधणातून २२० किलो गूळ मिळतो. एका आधणासाठी दोन टन उस लागतो. त्याचा सरासरी दर २८०० ते ३२०० रुपये प्रतिटन गृहीत धरल्यास ही किंमत ५६०० ते ६४०० रुपये इतकी होते. वाहतूक, मजुरी, रसायने, घाणा भाडे, आदींसह २७०० रुपये लागतात. असा एकूण एका आधणासाठी ८३०० ते ८६०० खर्च होतो.उत्पादकाला मिळणारे उत्पन्न (एका आधणातून)एका आधणातून २२० किलो गूळ मिळतो. याला सरासरी ३० ते ३२ रुपये दर गृहीत धरल्यास ६६०० ते ७०४० रुपये इतके उत्पन्न मिळते. दिवसाला पाच आधणे घेतली जातात. म्हणजेच दररोजचा तोटा पाच हजारांचा आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर