शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

कोल्हापूर : पानसरे खटल्यासाठी सर्वोच्च न्यायालयात वकील नेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 5:54 PM

ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञांची तातडीने नियुक्ती करावी, अशी लेखी मागणी पानसरे कुटुबियांच्यावतीने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. पुढील आठवड्यात ही सुनावणी असल्याने तातडीने नियुक्ती होण्याची गरज असल्याचे या कुटुंबियांनी निदर्शनास आणून दिले.

ठळक मुद्देपानसरे खटल्यासाठी सर्वोच्च न्यायालयात वकील नेमामुख्यमंत्र्यांकडे मागणी : पानसरे-दाभोलकर कुटुंबीयांचे पत्र

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञांची तातडीने नियुक्ती करावी, अशी लेखी मागणी पानसरे कुटुबियांच्यावतीने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. पुढील आठवड्यात ही सुनावणी असल्याने तातडीने नियुक्ती होण्याची गरज असल्याचे या कुटुंबियांनी निदर्शनास आणून दिले.पुरोगामी विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खूनप्रकरणी त्यांच्या पत्नी श्रीमती उमादेवी कलबुर्गी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कलबुर्गी यांच्या खूनप्रकरणांत तपासांत फारशी प्रगती नाही, असा त्यांचा मुख्य आक्षेप आहे. मागील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालायाने दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश या विचारवंतांच्या खूनामध्ये अनेक साम्यस्थळे असल्याने या सर्व खूनांचा तपास सीबीआय सारख्या एकाच तपास यंत्रणेकडून का होऊ नये, असे मत व्यक्त केले होते व सीबीआयला आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते.

पानसरे यांच्या खूनाचा तपास सुरुवातीपासून एसआयटी मार्फत सुरु आहे. लंकेश यांच्या खूनाचा तपास कर्नाटक एसआयटीमार्फत सुरु आहे. आता तपासाच्या या टप्प्यावर तपास यंत्रणा बदलल्यावर पुन्हा सगळा नवीन श्रीगणेशा होईल व त्यातून तपास कामावर परिणाम होईल असे मेघा पानसरे व लंकेश यांची बहिण कविता लंकेश यांचे म्हणणे आहे. म्हणून या खटल्यात महाराष्ट्र शासनातर्फे पानसरे खूनप्रकरणी ठामपणे बाजू मांडण्याची गरज आहे. त्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञांची नियुक्ती होण्याची गरज आहे.

आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची तारीख जवळ आल्याने ही नियुक्ती लगेच व्हावी, अशी पानसरे कुटुंबियांची अपेक्षा आहे. मेघा पानसरे यांनी कोल्हापूरचे अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे व एसआयटीच्या प्रमुखांनाही त्यासंबंधीचे पत्र पाठविले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनाही या पत्राची प्रत पाठवली आहे. मुख्यमंत्री या खटल्याचे गांभीर्य ओळखून सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी आशा पानसरे कुटुंबियांना आहे.

 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूर