शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कोल्हापूर : प्रत्येकाच्या घरी ‘खादी’ पोहोचली पाहिजे : धनंजय महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 6:35 PM

सर्वसामान्यांना स्वावलंबन, श्रमाला प्रतिष्ठा आणि गरिबातील गरिबालाही चरख्यावर सूतकताई करून काम मिळेल; त्यामुळे प्रत्येकाच्या घरी खादी पोहोचली पाहिजे, असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघातर्फे

ठळक मुद्देखादी भांडार नूतनीकरण समारंभ; ४० चरख्यांची मागणीत्याचा प्रस्ताव मी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करतो, असे आश्वासन दिले.

कोल्हापूर : सर्वसामान्यांना स्वावलंबन, श्रमाला प्रतिष्ठा आणि गरिबातील गरिबालाही चरख्यावर सूतकताई करून काम मिळेल; त्यामुळे प्रत्येकाच्या घरी खादी पोहोचली पाहिजे, असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघातर्फे मंगळवारी महात्मा गांधीजी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त चरखापूजन व खादी भांडार नूतनीकरण उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या.

खासदार महाडिक म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वदेशीचा महामंत्र दिला. चरख्यावर खादी कपडे निर्मिती करण्याच्या कलेचा प्रचार केला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर खादीनिर्मिती हे लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले. काळाच्या ओघात खादी व ग्रामोद्योगाला उतरती कळा लागली. यावर अवलंबून असणारे लाखो लोक बेरोजगार झाले. काळाच्या ओघात खादीची विक्री कमी झाली आहे. खादीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महाखादी’ सुरू केली आहे. त्यामुळे प्रत्येक घरात एक खादी गेली पाहिजे; तरच खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींच्या तत्त्वाचे आचरण होईल.

गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते झाल्यावर चरखापूजन झाले. यावेळी प्रास्ताविक करताना संघाचे अध्यक्ष सुंदरराव देसाई यांनी खासदार महाडिक यांच्याकडे सौरऊर्जेवर चालणाºया चरख्यांची व एका मोबाईल व्हॅनची मागणी केली. यावर महाडिक यांनी त्याचा प्रस्ताव मी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करतो, असे आश्वासन दिले.

यावेळी महात्मा गांधी अध्यासनाच्या डॉ. भारती पाटील, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे प्राचार्य व्ही. डी. माने, प्रा. आशाताई कुकडे, दादासाहेब जगताप, प्रा. गीता गुरव, अ‍ॅड. धनंजय पठाडे, अनुराधा भोसले, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, प्रा. सुधीर देसाई, राजेश घोरपडे, सविता देसाई, सचिव एस. एल. तुपद, प्रकाश चौगुले यांसह सर्वोदय कार्यकर्ते उपस्थित होते. पद्माकर कापसे यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीkolhapurकोल्हापूर