शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

कोल्हापूर : जनआंदोलने चिरडाल तर मंत्र्यांना फिरणे मुश्कील करू, युवक राष्ट्रवादीचा एल्गार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 5:10 PM

भाजप सत्तेच्या बळावर विरोधी पक्षांच्या नेत्यांना अडचणीत आणत आहे. पोलीस प्रशासन व शासकीय अधिकाऱ्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसारखे राबवून घेतले जात आहे. सत्तेच्या ताकदीवर जनसामान्यांची आंदोलने चिरडाल तर याद राखा. मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते -पाटील यांनी दिला.

ठळक मुद्देसंग्राम कोते-पाटील यांचा इशारा जनआंदोलने चिरडाल तर मंत्र्यांना फिरणे मुश्कील करू

कोल्हापूर : भाजप सत्तेच्या बळावर विरोधी पक्षांच्या नेत्यांना अडचणीत आणत आहे. पोलीस प्रशासन व शासकीय अधिकाऱ्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसारखे राबवून घेतले जात आहे. सत्तेच्या ताकदीवर जनसामान्यांची आंदोलने चिरडाल तर याद राखा. मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते -पाटील यांनी दिला.राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात मंगळवारी युवक राष्ट्रवादीचा कॉँग्रेसच्या वतीने ‘एल्गार मोर्चा’ काढण्यात आला. सासने मैदानातून युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास सुरुवात झाली. हलगीचा कडकडाट व सरकारविरोधातील घोषणा देत युवक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

मोर्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यांशी साम्य असलेली व्यक्ती सर्वांचे आकर्षण ठरली होती.  (छाया - आदित्य वेल्हाळ)

येथे झालेल्या सभेत सर्वच वक्त्यांनी भाजप सरकारची अक्षरश: चिरफाड केली. कोते-पाटील म्हणाले, या राज्यात विद्यार्थी, तरुण अस्वस्थ आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. समाजातील एकही घटक सुखी नसल्याने सगळीकडे असंतोष पसरला आहे. अशा परिस्थितीत सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना अडचणीत आणले जाते.

आंदोलन मोडून काढून दहशत पसरविली जात असून, याचा निषेध करण्यासाठी राज्यातील दोन लाख तरुण ‘एल्गार मोर्चा’च्या माध्यमातून रस्त्यावर उतरणार आहेत. त्यांतील एक लाख तरुणांना घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळावर धडक देणार असल्याचे कोते-पाटील यांनी सांगितले.

प्रदेश उपाध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताना दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे गाजर दाखविले. जी. एस. टी., नोटाबंदीमुळे उद्योग बंद पडल्याने लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. कौशल्य विकास योजनेंतर्गत ७२५२ प्रशिक्षण संस्था पैशांअभावी बंद पडल्या आहेत. डी. एड., बी. एड्.ची पदवी घेतलेले लाखो तरुण नोकरीच्या शोधात आहेत.

आदिल फरास, युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी आभार मानले. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, रणजितसिंह पाटील, आर. के. पोवार, अनिल साळोखे, संगीता खाडे, कल्पेश चौगुले, अमोल माने, विकास पाटील, राजवर्धन नाईक, नितीन जांभळे, मधुकर जांभळे, शिवाजी देसाई, आदी उपस्थित होते.

नविद मुश्रीफ यांचे कौतुक!नविद मुश्रीफ यांनी एल्गार मोर्चाचे अवघ्या चार दिवसांत यशस्वी नियोजन केले. मोर्चात तरुणांची लक्षणीय संख्या पाहून कोते-पाटील भारावून गेले आणि त्यांनी मुश्रीफ यांचे कौतुक केले.

गाजरांची माळ अन् लक्षवेधी फलकमोर्चात कार्यकर्त्यांच्या हातात सरकारविरोधातील फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. माजी नगरसेवक अमोल माने यांनी गळ्यात चक्क गाजरांची माळ घालून सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

मोदींच्या चेहऱ्यांशी साम्य असलेली व्यक्ती मोर्चात आणली होती. त्यांच्या हातात गाजर व गळ्यात ‘मी भारताला लागलेले ग्रहण; लवकरच सुटेन’ असा अडकविलेला फलक लक्षवेधी होता.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस