शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

दावोसमध्ये कोल्हापूरला ठेंगा; एकाही प्रकल्पासाठी जिल्ह्याचा विचार नाही, करार तिथेच का?.. जाणून घ्या

By विश्वास पाटील | Updated: January 23, 2025 16:59 IST

कोल्हापूर बाजूला का..?

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूरने महायुती सरकारच्या पाठीशी अत्यंत घसघशीत सत्ताबळ दिले असतानाही या जिल्ह्याच्या विकासाकडे राज्य सरकार फारशा गांभीर्याने पाहत नसल्याचाच अनुभव बुधवारी आला. दावोस येथे सरकारच्या वतीने ६ लाख ८४ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे ३२ करार बुधवारपर्यंत झाले; परंतु त्यातील एकाही प्रकल्पासाठी कोल्हापूर जिल्ह्याचा विचार झालेला नाही. आणखी काही करार होणार असून त्यात कोल्हापूरला संधी मिळेल, असेही काही जण सांगत असले, तरी ते जर-तर आहे. कोल्हापुरात आयटी किंवा सेवा उद्योगाला मोठा वाव असून त्यादृष्टीने प्रकल्पाचा विचार व्हायला हवा होता.

कोल्हापूर बाजूला का..?कोल्हापूर हा महाराष्ट्रातील कृषी-औद्योगिकदृष्ट्या पुढारलेला जिल्हा आहे. त्याने स्वत:च्या हिमतीवर अनेक क्षेत्रांत चांगली प्रगती केली आहे. त्यामुळे कोल्हापूरला काय कमी आहे, तुम्ही आणि कशाला काय मागता, अशी धारणा राज्यकर्त्यांची नेहमीच राहिली आहे. त्यात मुख्यमंत्री विदर्भातील असेल तर ही धारणा जास्तच घट्ट होते.

गरज काय..?कोल्हापूरला गेल्या अनेक वर्षांत नवीन औद्योगिक प्रकल्प आलेला नाही. प्रत्येक निवडणुकीत राज्यकर्ते आम्ही आयटी प्रकल्प आणू, अशा वल्गना करतात; परंतु प्रत्यक्षात पदरात काही पडत नाही. कोल्हापूरला आयटीसाठी चांगली संधी आहे. हेच क्षेत्र वाढवण्याची क्षमता कोल्हापूरमध्ये आहे; परंतु त्यासाठी संघटित प्रयत्न होताना दिसत नाहीत.

अडचणी काय..?कोल्हापूरला मोठे अवजड प्रकल्प आता शक्य नाहीत. कारण तेवढी ५०० ते हजार एकर जमीन जिल्ह्यात एका ठिकाणी उपलब्ध नाही. बहुतांशी जमीन बागायती आहे आणि राहिलेली डोंगराळ आहे. सपाट जमीन शिल्लक नाही. त्यामुळे जास्त जमीन लागणारे प्रकल्प शक्य नाहीत. त्याशिवाय कोल्हापूरच्या रेल्वेला अजून गती नाही. राष्ट्रीय महामार्गाचे काम रडतखडत चालले आहे. विमानसेवा आता कुठे सुरळीत झाली आहे. या तिन्ही बाबी कोणत्याही नवीन प्रकल्पासाठी महत्त्वाच्या असतात. तिथे आपण कायमच मार खातो.

महायुतीचे कोल्हापूरचे सत्ताबळ

  • खासदार : ०२
  • आमदार : १०
  • कॅबिनेट मंत्री : ०३

कोणत्या जिल्ह्यात गेले प्रकल्प..

  • मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएमआर) : ०३
  • छत्रपती संभाजीनगर : ०२
  • पुणे : ०२
  • नागपूर : ०१
  • नागपूर-गडचिरोली : ०१
  • रत्नागिरी : ०१
  • रायगड : ०१

कोणत्या क्षेत्रातील करार..लॉजिस्टिक, ऑटोमोबाइल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन.

दावोस'मध्येच का..दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार झाले, त्या बहुतांश भारतीय कंपन्या आहेत, तरीही करार करण्यासाठी दावोसला कशासाठी अशीही चर्चा लोकांत आहे; परंतु त्यामागे तसे कारण आहे. दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये करार झाल्यावर त्या कंपन्याही जगमान्यता मिळते. त्यांना जगभरातील गुंतवणूकदार मिळतात, शिवाय त्या कंपन्या जगात कुठेही प्रकल्प उभारणी करू शकतात, त्यासाठीचे प्रतिमासंवर्धन होते.

सामंजस्य कराराची प्रक्रिया पुढे दोन-तीन वर्षे चालू राहते. त्यामुळे त्यातून काही चांगले प्रकल्प कोल्हापूरला येतील, अशी आशा बाळगूया. - देवेंद्र दिवाण, उद्योजक, गोशिमा, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसITमाहिती तंत्रज्ञान