शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दावोसमध्ये कोल्हापूरला ठेंगा; एकाही प्रकल्पासाठी जिल्ह्याचा विचार नाही, करार तिथेच का?.. जाणून घ्या

By विश्वास पाटील | Updated: January 23, 2025 16:59 IST

कोल्हापूर बाजूला का..?

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूरने महायुती सरकारच्या पाठीशी अत्यंत घसघशीत सत्ताबळ दिले असतानाही या जिल्ह्याच्या विकासाकडे राज्य सरकार फारशा गांभीर्याने पाहत नसल्याचाच अनुभव बुधवारी आला. दावोस येथे सरकारच्या वतीने ६ लाख ८४ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे ३२ करार बुधवारपर्यंत झाले; परंतु त्यातील एकाही प्रकल्पासाठी कोल्हापूर जिल्ह्याचा विचार झालेला नाही. आणखी काही करार होणार असून त्यात कोल्हापूरला संधी मिळेल, असेही काही जण सांगत असले, तरी ते जर-तर आहे. कोल्हापुरात आयटी किंवा सेवा उद्योगाला मोठा वाव असून त्यादृष्टीने प्रकल्पाचा विचार व्हायला हवा होता.

कोल्हापूर बाजूला का..?कोल्हापूर हा महाराष्ट्रातील कृषी-औद्योगिकदृष्ट्या पुढारलेला जिल्हा आहे. त्याने स्वत:च्या हिमतीवर अनेक क्षेत्रांत चांगली प्रगती केली आहे. त्यामुळे कोल्हापूरला काय कमी आहे, तुम्ही आणि कशाला काय मागता, अशी धारणा राज्यकर्त्यांची नेहमीच राहिली आहे. त्यात मुख्यमंत्री विदर्भातील असेल तर ही धारणा जास्तच घट्ट होते.

गरज काय..?कोल्हापूरला गेल्या अनेक वर्षांत नवीन औद्योगिक प्रकल्प आलेला नाही. प्रत्येक निवडणुकीत राज्यकर्ते आम्ही आयटी प्रकल्प आणू, अशा वल्गना करतात; परंतु प्रत्यक्षात पदरात काही पडत नाही. कोल्हापूरला आयटीसाठी चांगली संधी आहे. हेच क्षेत्र वाढवण्याची क्षमता कोल्हापूरमध्ये आहे; परंतु त्यासाठी संघटित प्रयत्न होताना दिसत नाहीत.

अडचणी काय..?कोल्हापूरला मोठे अवजड प्रकल्प आता शक्य नाहीत. कारण तेवढी ५०० ते हजार एकर जमीन जिल्ह्यात एका ठिकाणी उपलब्ध नाही. बहुतांशी जमीन बागायती आहे आणि राहिलेली डोंगराळ आहे. सपाट जमीन शिल्लक नाही. त्यामुळे जास्त जमीन लागणारे प्रकल्प शक्य नाहीत. त्याशिवाय कोल्हापूरच्या रेल्वेला अजून गती नाही. राष्ट्रीय महामार्गाचे काम रडतखडत चालले आहे. विमानसेवा आता कुठे सुरळीत झाली आहे. या तिन्ही बाबी कोणत्याही नवीन प्रकल्पासाठी महत्त्वाच्या असतात. तिथे आपण कायमच मार खातो.

महायुतीचे कोल्हापूरचे सत्ताबळ

  • खासदार : ०२
  • आमदार : १०
  • कॅबिनेट मंत्री : ०३

कोणत्या जिल्ह्यात गेले प्रकल्प..

  • मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएमआर) : ०३
  • छत्रपती संभाजीनगर : ०२
  • पुणे : ०२
  • नागपूर : ०१
  • नागपूर-गडचिरोली : ०१
  • रत्नागिरी : ०१
  • रायगड : ०१

कोणत्या क्षेत्रातील करार..लॉजिस्टिक, ऑटोमोबाइल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन.

दावोस'मध्येच का..दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार झाले, त्या बहुतांश भारतीय कंपन्या आहेत, तरीही करार करण्यासाठी दावोसला कशासाठी अशीही चर्चा लोकांत आहे; परंतु त्यामागे तसे कारण आहे. दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये करार झाल्यावर त्या कंपन्याही जगमान्यता मिळते. त्यांना जगभरातील गुंतवणूकदार मिळतात, शिवाय त्या कंपन्या जगात कुठेही प्रकल्प उभारणी करू शकतात, त्यासाठीचे प्रतिमासंवर्धन होते.

सामंजस्य कराराची प्रक्रिया पुढे दोन-तीन वर्षे चालू राहते. त्यामुळे त्यातून काही चांगले प्रकल्प कोल्हापूरला येतील, अशी आशा बाळगूया. - देवेंद्र दिवाण, उद्योजक, गोशिमा, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसITमाहिती तंत्रज्ञान