शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

कोल्हापूर : शेतकरी संपामुळे कांद्याची आवक घटली, बाजार समितीत आठशे क्विंटलचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 18:25 IST

शेतीमालाला दीडपट भाव द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सुरू केलेल्या संपाचा परिणाम दिसू लागला आहे. कोल्हापुरात आंदोलनाची तीव्रता नसली तरी नाशिकसह इतर भागातून येणाऱ्या मालावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत शनिवारी आठशे क्विंटलने कांद्याची आवक कमी झाली आहे.

ठळक मुद्दे शेतकरी संपामुळे कांद्याची आवक घटलीबाजार समितीत आठशे क्विंटलचा फटका भाजीपाल्यासह इतर शेतीमालाची आवक स्थिर

कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट भाव द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सुरू केलेल्या संपाचा परिणाम दिसू लागला आहे.

कोल्हापुरात आंदोलनाची तीव्रता नसली तरी नाशिकसह इतर भागातून येणाऱ्या मालावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत शनिवारी आठशे क्विंटलने कांद्याची आवक कमी झाली आहे.शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव द्या, शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या, या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १ जून २०१७ रोजी शेतकरी संप केला होता. त्याला वर्ष झाले तरी अद्याप मागण्या तशाच असल्याने किसान सभेने शुक्रवार (दि. १)पासून पुन्हा आंदोलन हाती घेतले आहे.कोल्हापुरात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शनिवारी मात्र सभेच्या वतीने आंदोलनाचा कोणताही कार्यक्रम हाती घेतला नाही. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत येथे ऊसदराचा प्रश्न, दूधदराचा प्रश्न एवढा ताणला नसल्याने आंदोलन आक्रमक नाही; पण नाशिकसह इतर भागातून येणाºया शेतीमालावर त्याचा परिणाम झालेला दिसतो.

कांद्याची आवक घटली असून, शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी ८०० क्विंटलने बाजार समितीत कांदा कमी आला आहे. भाजीपाल्यासह इतर शेतीमालावर त्याचा परिणाम झालेला दिसत नाही.

 

 

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चkolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी