शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

कोल्हापूर : जलवाहिनीचे काम बुधवारपर्यंत न झाल्यास महापालिकेवर कारवाई : विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 16:16 IST

जयंती नाल्यातून मैलामिश्रित सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी तुटून शंभर दिवस उलटले तरी अद्याप तिच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम बुधवार (दि. १०)पर्यंत पूर्ण न झाल्यास महापालिकेवर कारवाई करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना शुक्रवारी येथे दिले.

ठळक मुद्देजलवाहिनीचे काम बुधवारपर्यंत न झाल्यास महापालिकेवर कारवाई विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश पंचगंगा प्रदूषणप्रश्नी शिवसेना, प्रजासत्ताक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवेदन

कोल्हापूर : जयंती नाल्यातून मैलामिश्रित सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी तुटून शंभर दिवस उलटले तरी अद्याप तिच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम बुधवार (दि. १०)पर्यंत पूर्ण न झाल्यास महापालिकेवर कारवाई करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना शुक्रवारी येथे दिले.

पंचगंगा प्रदूषण या ज्वलंत विषयावर शिवसेना, प्रजासत्ताक सामाजिक संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर दळवी यांनी तातडीने हे आदेश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आढावा बैठक घेतली.

यावेळी त्यांना शिवसेना, प्रजासत्ताक व स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी पंचगंगा प्रदूषणासंदर्भात निवेदन देऊन लक्ष वेधले. यानंतर त्यांनी महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दळवी म्हणाले, पंचगंगा प्रदूषण व जयंती नाल्यातून मैलामिश्रित सांडपाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाबाबत जिल्हाधिकारी व महापालिकेच्या आयुक्तांकडून माहिती घेतली आहे. आयुक्तांनी या कामासाठी ठेकेदार नेमला असून, बुधवार (दि. १०)पर्यंत हे काम पूर्ण करू, आश्वासन दिले आहे. या कामावर दररोज पर्यवेक्षण करून कामाचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.दिलेल्या वेळेत म्हणजे बुधवार (दि. १०)पर्यंत हे काम पूर्ण झाले नाही तर महापालिकेवर कारवाई करावी, असे आदेशही यावेळी विभागीय आयुक्तांनी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे हे काम पूर्ण झाले नाही तर कारवाई अटळ आहे.शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंचगंगा प्रदूषण रोखण्यास महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, इचलकरंजी मुख्याधिकारी यांना पूर्णपणे अपयश आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

वास्तविक जलप्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात असूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख संजय पवार, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, सुजित चव्हाण, बाजीराव पाटील, सतीश कुरणे, आदींचा समावेश होता.‘प्रजासत्ताक’च्या दिलीप देसाई यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पंचगंगा प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलेले महापालिकेचे आयुक्त, इचलकरंजीचे मुख्याधिकारी यांच्यावर क्रि. प्रो. को. कलम १३३ व पर्यावरण संरक्षण कायदा कलम १५ नुसार कारवाई करावी.‘स्वाभिमानी शेतकरी’कडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका व इचलकरंजी नगरपालिकेने सोडलेल्या सांडपाण्यामुळे हे पाणी शेतीसाठी योग्य राहिलेले नाही. यामुळे इचलकरंजी परिसरातील अनेक लोक काविळीसारख्या आजाराने मृत्युमुखी पडले आहेत. याकडे गांभीर्याने न पाहिल्यास आंदोलन केले जाईल. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष भगवान काटे, सागर शंभुशेटे, शैलेश चौगुले, सागर मादनाईक, आदींचा समावेश होता. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्त