शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
4
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
5
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
7
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
8
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
10
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
11
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
12
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
13
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
15
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
16
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
18
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
19
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
20
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

कोल्हापूर : जलवाहिनीचे काम बुधवारपर्यंत न झाल्यास महापालिकेवर कारवाई : विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 16:16 IST

जयंती नाल्यातून मैलामिश्रित सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी तुटून शंभर दिवस उलटले तरी अद्याप तिच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम बुधवार (दि. १०)पर्यंत पूर्ण न झाल्यास महापालिकेवर कारवाई करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना शुक्रवारी येथे दिले.

ठळक मुद्देजलवाहिनीचे काम बुधवारपर्यंत न झाल्यास महापालिकेवर कारवाई विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश पंचगंगा प्रदूषणप्रश्नी शिवसेना, प्रजासत्ताक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवेदन

कोल्हापूर : जयंती नाल्यातून मैलामिश्रित सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी तुटून शंभर दिवस उलटले तरी अद्याप तिच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम बुधवार (दि. १०)पर्यंत पूर्ण न झाल्यास महापालिकेवर कारवाई करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना शुक्रवारी येथे दिले.

पंचगंगा प्रदूषण या ज्वलंत विषयावर शिवसेना, प्रजासत्ताक सामाजिक संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर दळवी यांनी तातडीने हे आदेश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आढावा बैठक घेतली.

यावेळी त्यांना शिवसेना, प्रजासत्ताक व स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी पंचगंगा प्रदूषणासंदर्भात निवेदन देऊन लक्ष वेधले. यानंतर त्यांनी महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दळवी म्हणाले, पंचगंगा प्रदूषण व जयंती नाल्यातून मैलामिश्रित सांडपाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाबाबत जिल्हाधिकारी व महापालिकेच्या आयुक्तांकडून माहिती घेतली आहे. आयुक्तांनी या कामासाठी ठेकेदार नेमला असून, बुधवार (दि. १०)पर्यंत हे काम पूर्ण करू, आश्वासन दिले आहे. या कामावर दररोज पर्यवेक्षण करून कामाचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.दिलेल्या वेळेत म्हणजे बुधवार (दि. १०)पर्यंत हे काम पूर्ण झाले नाही तर महापालिकेवर कारवाई करावी, असे आदेशही यावेळी विभागीय आयुक्तांनी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे हे काम पूर्ण झाले नाही तर कारवाई अटळ आहे.शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंचगंगा प्रदूषण रोखण्यास महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, इचलकरंजी मुख्याधिकारी यांना पूर्णपणे अपयश आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

वास्तविक जलप्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात असूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख संजय पवार, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, सुजित चव्हाण, बाजीराव पाटील, सतीश कुरणे, आदींचा समावेश होता.‘प्रजासत्ताक’च्या दिलीप देसाई यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पंचगंगा प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलेले महापालिकेचे आयुक्त, इचलकरंजीचे मुख्याधिकारी यांच्यावर क्रि. प्रो. को. कलम १३३ व पर्यावरण संरक्षण कायदा कलम १५ नुसार कारवाई करावी.‘स्वाभिमानी शेतकरी’कडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका व इचलकरंजी नगरपालिकेने सोडलेल्या सांडपाण्यामुळे हे पाणी शेतीसाठी योग्य राहिलेले नाही. यामुळे इचलकरंजी परिसरातील अनेक लोक काविळीसारख्या आजाराने मृत्युमुखी पडले आहेत. याकडे गांभीर्याने न पाहिल्यास आंदोलन केले जाईल. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष भगवान काटे, सागर शंभुशेटे, शैलेश चौगुले, सागर मादनाईक, आदींचा समावेश होता. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्त