शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

कोल्हापुरातील ऑनर किलिंग प्रकरण: जातीच्या अहंकारातून एक पिढी संपल्याचे वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 18:45 IST

बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून गावांतील ज्या लोकांनी त्यांना चिडवले, चेष्टा केली ते चिडवून घरी गेले आणि या तरुणांच्या मनात मात्र बदल्याचा वणवा पेटवण्यास कारणीभूत ठरले.

कोल्हापूर : जातीच्या अहंकारातून एक पिढी संपल्याचे वास्तव ऑनर किलिंगच्या घटनेतून पुढे आले. त्यांच्या बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून गावांतील ज्या लोकांनी त्यांना चिडवले, चेष्टा केली ते चिडवून घरी गेले आणि या तरुणांच्या मनात मात्र बदल्याचा वणवा पेटवण्यास कारणीभूत ठरले. ज्यांनी या दोन भावांना चिडवले, टोचले ते सारे आज आपापल्या कुटुंबात आनंदात आहेत आणि दोन उमलणारी आयुष्ये मात्र जन्मभरासाठी कारागृहात गेली. त्यामुळे त्यांना टोचा मारमारे समाजातील कावळेही या घटनेस तितकेच कारणीभूत आहेत.आरोपी गणेश व जयदीप हे कोल्हापुरातील एका महाविद्यालयात शिकत होते. गावातील लोक बहिणीच्या आंतरजातीय प्रेमविवाहावरून या दोघा भावांना वारंवार विचारून चेष्टा करत होते. याचा राग मनात धरून या दोघांनी बहिणीसह तिच्या पतीची निर्घृण हत्या केली. यात बहिणीचा मृत्यू तर दोघा सख्ख्या भावांना आजन्म कारावास अर्थात जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यांचे वयही २० वर्षांच्या आतील आहेत, त्यामुळे एका कुटुंबातील एक पिढीच संपुष्टात आली.कोल्हापूर जिल्ह्यात २०१५ पूर्वी आंतरजातीय प्रेमविवाहातून मुलीच्या घरच्यांनी लग्नास विरोध केल्याच्या घटना अनेक आहेत. मात्र, अशा प्रकारे आपल्याच बहिणीची व तिच्या पतीची हत्या करणे अशी घटना प्रथमच कसबा बावडा येथे घडली. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष या खटल्याकडे लागले होते.सैराटमध्ये प्रतिबिंब..कसबा बावडा येथील ही ऑनर किलिंगची घटना घडल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा झाली. समाजमन सुन्न झाले होते. बहिणींने प्रेमविवाह केल्यावर भाऊ किती टोकाला गेले आणि तेही समाजाने कावळ्यासारखे टोचल्यानेच हे घडले. त्याचदरम्यान नागराज मंजुळे यांचा सैराट हा याच विषयांवरील चित्रपट आला. त्याचा शेवटही कसबा बावड्यातील घटनेसारखाच होता. त्यामुळे ऑनर किलिंगच्या या घटनेचे प्रतिबिंब त्या चित्रपटात उमटले होते. चित्रपटाचा शेवट पाहतानाही लोक बधिर होऊनच चित्रपटगृह सोडत होते. समाजाचे हे वास्तव आज फारसे बदलले आहे, असे चित्र नाही. बाई मग ती कोणत्याही जाती-धर्माची असो ती पायातलं वहान बनूनच राहिली पाहिजे, ही मानसिकता अजूनही टिकून आहे व ती टिकलीमधून अधूनमधून व्यक्तही होत आहे.या घटनेत फिर्यादीसह १६ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी एकही साक्षीदार नव्हता; परंतु फिर्यादी आपल्या जबाबावर ठाम राहिल्याने न्यायालयाने शिक्षा ठोठावली. शाहूपुरीचे तत्कालीन निरीक्षक अरविंद चौधरी यांनी बारकाईने केलेला तपासही तितकाच महत्त्वाचा ठरला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय