शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कोल्हापुरातील ऑनर किलिंग प्रकरण: जातीच्या अहंकारातून एक पिढी संपल्याचे वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 18:45 IST

बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून गावांतील ज्या लोकांनी त्यांना चिडवले, चेष्टा केली ते चिडवून घरी गेले आणि या तरुणांच्या मनात मात्र बदल्याचा वणवा पेटवण्यास कारणीभूत ठरले.

कोल्हापूर : जातीच्या अहंकारातून एक पिढी संपल्याचे वास्तव ऑनर किलिंगच्या घटनेतून पुढे आले. त्यांच्या बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून गावांतील ज्या लोकांनी त्यांना चिडवले, चेष्टा केली ते चिडवून घरी गेले आणि या तरुणांच्या मनात मात्र बदल्याचा वणवा पेटवण्यास कारणीभूत ठरले. ज्यांनी या दोन भावांना चिडवले, टोचले ते सारे आज आपापल्या कुटुंबात आनंदात आहेत आणि दोन उमलणारी आयुष्ये मात्र जन्मभरासाठी कारागृहात गेली. त्यामुळे त्यांना टोचा मारमारे समाजातील कावळेही या घटनेस तितकेच कारणीभूत आहेत.आरोपी गणेश व जयदीप हे कोल्हापुरातील एका महाविद्यालयात शिकत होते. गावातील लोक बहिणीच्या आंतरजातीय प्रेमविवाहावरून या दोघा भावांना वारंवार विचारून चेष्टा करत होते. याचा राग मनात धरून या दोघांनी बहिणीसह तिच्या पतीची निर्घृण हत्या केली. यात बहिणीचा मृत्यू तर दोघा सख्ख्या भावांना आजन्म कारावास अर्थात जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यांचे वयही २० वर्षांच्या आतील आहेत, त्यामुळे एका कुटुंबातील एक पिढीच संपुष्टात आली.कोल्हापूर जिल्ह्यात २०१५ पूर्वी आंतरजातीय प्रेमविवाहातून मुलीच्या घरच्यांनी लग्नास विरोध केल्याच्या घटना अनेक आहेत. मात्र, अशा प्रकारे आपल्याच बहिणीची व तिच्या पतीची हत्या करणे अशी घटना प्रथमच कसबा बावडा येथे घडली. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष या खटल्याकडे लागले होते.सैराटमध्ये प्रतिबिंब..कसबा बावडा येथील ही ऑनर किलिंगची घटना घडल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा झाली. समाजमन सुन्न झाले होते. बहिणींने प्रेमविवाह केल्यावर भाऊ किती टोकाला गेले आणि तेही समाजाने कावळ्यासारखे टोचल्यानेच हे घडले. त्याचदरम्यान नागराज मंजुळे यांचा सैराट हा याच विषयांवरील चित्रपट आला. त्याचा शेवटही कसबा बावड्यातील घटनेसारखाच होता. त्यामुळे ऑनर किलिंगच्या या घटनेचे प्रतिबिंब त्या चित्रपटात उमटले होते. चित्रपटाचा शेवट पाहतानाही लोक बधिर होऊनच चित्रपटगृह सोडत होते. समाजाचे हे वास्तव आज फारसे बदलले आहे, असे चित्र नाही. बाई मग ती कोणत्याही जाती-धर्माची असो ती पायातलं वहान बनूनच राहिली पाहिजे, ही मानसिकता अजूनही टिकून आहे व ती टिकलीमधून अधूनमधून व्यक्तही होत आहे.या घटनेत फिर्यादीसह १६ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी एकही साक्षीदार नव्हता; परंतु फिर्यादी आपल्या जबाबावर ठाम राहिल्याने न्यायालयाने शिक्षा ठोठावली. शाहूपुरीचे तत्कालीन निरीक्षक अरविंद चौधरी यांनी बारकाईने केलेला तपासही तितकाच महत्त्वाचा ठरला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय