शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

कोल्हापुरातील ऑनर किलिंग प्रकरण: जातीच्या अहंकारातून एक पिढी संपल्याचे वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 18:45 IST

बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून गावांतील ज्या लोकांनी त्यांना चिडवले, चेष्टा केली ते चिडवून घरी गेले आणि या तरुणांच्या मनात मात्र बदल्याचा वणवा पेटवण्यास कारणीभूत ठरले.

कोल्हापूर : जातीच्या अहंकारातून एक पिढी संपल्याचे वास्तव ऑनर किलिंगच्या घटनेतून पुढे आले. त्यांच्या बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून गावांतील ज्या लोकांनी त्यांना चिडवले, चेष्टा केली ते चिडवून घरी गेले आणि या तरुणांच्या मनात मात्र बदल्याचा वणवा पेटवण्यास कारणीभूत ठरले. ज्यांनी या दोन भावांना चिडवले, टोचले ते सारे आज आपापल्या कुटुंबात आनंदात आहेत आणि दोन उमलणारी आयुष्ये मात्र जन्मभरासाठी कारागृहात गेली. त्यामुळे त्यांना टोचा मारमारे समाजातील कावळेही या घटनेस तितकेच कारणीभूत आहेत.आरोपी गणेश व जयदीप हे कोल्हापुरातील एका महाविद्यालयात शिकत होते. गावातील लोक बहिणीच्या आंतरजातीय प्रेमविवाहावरून या दोघा भावांना वारंवार विचारून चेष्टा करत होते. याचा राग मनात धरून या दोघांनी बहिणीसह तिच्या पतीची निर्घृण हत्या केली. यात बहिणीचा मृत्यू तर दोघा सख्ख्या भावांना आजन्म कारावास अर्थात जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यांचे वयही २० वर्षांच्या आतील आहेत, त्यामुळे एका कुटुंबातील एक पिढीच संपुष्टात आली.कोल्हापूर जिल्ह्यात २०१५ पूर्वी आंतरजातीय प्रेमविवाहातून मुलीच्या घरच्यांनी लग्नास विरोध केल्याच्या घटना अनेक आहेत. मात्र, अशा प्रकारे आपल्याच बहिणीची व तिच्या पतीची हत्या करणे अशी घटना प्रथमच कसबा बावडा येथे घडली. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष या खटल्याकडे लागले होते.सैराटमध्ये प्रतिबिंब..कसबा बावडा येथील ही ऑनर किलिंगची घटना घडल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा झाली. समाजमन सुन्न झाले होते. बहिणींने प्रेमविवाह केल्यावर भाऊ किती टोकाला गेले आणि तेही समाजाने कावळ्यासारखे टोचल्यानेच हे घडले. त्याचदरम्यान नागराज मंजुळे यांचा सैराट हा याच विषयांवरील चित्रपट आला. त्याचा शेवटही कसबा बावड्यातील घटनेसारखाच होता. त्यामुळे ऑनर किलिंगच्या या घटनेचे प्रतिबिंब त्या चित्रपटात उमटले होते. चित्रपटाचा शेवट पाहतानाही लोक बधिर होऊनच चित्रपटगृह सोडत होते. समाजाचे हे वास्तव आज फारसे बदलले आहे, असे चित्र नाही. बाई मग ती कोणत्याही जाती-धर्माची असो ती पायातलं वहान बनूनच राहिली पाहिजे, ही मानसिकता अजूनही टिकून आहे व ती टिकलीमधून अधूनमधून व्यक्तही होत आहे.या घटनेत फिर्यादीसह १६ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी एकही साक्षीदार नव्हता; परंतु फिर्यादी आपल्या जबाबावर ठाम राहिल्याने न्यायालयाने शिक्षा ठोठावली. शाहूपुरीचे तत्कालीन निरीक्षक अरविंद चौधरी यांनी बारकाईने केलेला तपासही तितकाच महत्त्वाचा ठरला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय