शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

साखर उतारा ०.३९ टक्क्यांनी घटल्याचा परिणाम : पुढील हंगामातील कोल्हापूरची एफआरपीमध्ये ५० रुपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:01 PM

आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील १०, तर सांगलीतील एक कारखान्याचा हंगाम बंद झाला आहे. मार्चअखेर बहुतांश कारखान्यांची, तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एक-दोन कारखान्यांची धुराडी थंडावणार आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील अकरा ११ साखर कारखान्यांचे हंगाम बंद झाले असून, आतापर्यंत एक कोटी ६७ लाख टन गाळप झाले आहे. या महिन्याअखेर बहुतांश कारखाने, तर एक-दोन कारखाने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद होण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ४६ लाख टनांनी हंगाम मागे असला तरी उर्वरित कालावधीत २०-२५लाख टन गाळप होऊ शकते.

गतवर्षीपेक्षा कोल्हापूर जिल्ह्याचा उतारा सध्या ०.२२ टक्क्यांनी कमी दिसत असल्याने पुढील हंगामातील ‘एफआरपी’मध्ये ५० रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी, महापूर आणि परतीच्या पावसाने झोडपल्याने साखर कारखान्यांच्या यंदाच्या हंगामासमोर उसाचे संकट होते. त्यामुळे मागील हंगामातील गाळपाच्या तुलनेत निम्म्यावर ऊस उत्पादन होईल, असा अंदाज होता. गाळप हंगामही उशिरा सुरू झाल्याने अद्याप कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील १०, तर सांगलीतील एक कारखान्याचा हंगाम बंद झाला आहे. मार्चअखेर बहुतांश कारखान्यांची, तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एक-दोन कारखान्यांची धुराडी थंडावणार आहेत.

आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात एक कोटी १० लाख २१ हजार ३५१, तर सांगली जिल्ह्यात ५७ लाख १९ हजार ५७८ असे विभागात एक कोटी ६७ लाख ४० हजार ९२९ टनांचे गाळप झाले. सरासरी १२.१५ टक्के साखर उतारा राखत दोन कोटी ३ लाख ४२ हजार ७६५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत सांगली जिल्ह्यातील कारखान्यांचे २४ लाख ३३ हजार ८२६ टनांनी, तर कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांचे २२ लाख १६ हजार ४०२ टनांनी गाळप कमी झाले आहे. हंगाम संपायला अजून पंधरा-वीस दिवस आहेत. सध्या कारखान्यांचे गाळप पाहता दोन्ही जिल्ह्यांत अजून २० ते २५ लाख टन गाळप होण्याची शक्यता आहे. महापूर आणि अतिवृष्टीने उसाच्या उत्पादनाबरोबरच साखर उताऱ्याला मोठा फटका बसेल, असे वाटत होते. मात्र विभागाच्या सरासरी उताºयात ०.२२ टक्क्यांनी घट झाली आहे. 

सांगलीच्या ‘एफआरपी’वर परिणाम नाहीसांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप २४ लाख टनांनी कमी झाले असले तरी साखर उताºयात वाढच दिसत आहे. गेल्या हंगामात जिल्ह्याचा सरासरी उतारा १२.१३ टक्के होता, तो आता १२.१८ टक्के असून, शेवटच्या टप्प्यातील गाळपानंतर तो वाढण्याची शक्यता आहे. परिणामी सांगलीच्या एफआरपीवर कोणताही परिणाम होणार नाही. 

या कारखान्यांचा हंगाम संपलादौलत (अथर्व ट्रेडर्स), संताजी घोरपडे, भोगावती, आप्पासाहेब नलवडे, डी. वाय. पाटील, उदयसिंगराव गायकवाड (अथणी) , इंदिरा महिला (अथणी), रिलायबल फराळे, इको केन (म्हाळुंगे), कुंभी, मोहनराव शिंदे.

 

गतहंगामाच्या तुलनेत फार गाळप कमी होईल असे वाटत होते, तसे दिसत नाही. साखर उताराही जवळपास गतवर्षीएवढाच राहील, असा अंदाज आहे.- अरुण काकडे (प्रादेशिक साखर सहसंचालक) 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने