शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

कोल्हापूर : गवत, चिंच, नारळाचा शिवाजी विद्यापीठाच्या उत्पन्नाला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:40 AM

गवत, विविध रोपे, चिंच आणि नारळ यांच्या विक्रीतून शिवाजी विद्यापीठाच्या उत्पन्नवाढीला हातभार लागत आहे. या विक्रीतून वर्षाकाठी विद्यापीठाला सुमारे पाच लाख रुपये मिळतात.

ठळक मुद्दे गवत, चिंच, नारळाचा शिवाजी विद्यापीठाच्या उत्पन्नाला हातभारवर्षाकाठी मिळतात पाच लाख रुपये; वृक्ष संवर्धनाचा खर्च

संतोष मिठारी

कोल्हापूर : गवत, विविध रोपे, चिंच आणि नारळ यांच्या विक्रीतून शिवाजी विद्यापीठाच्या उत्पन्नवाढीला हातभार लागत आहे. या विक्रीतून वर्षाकाठी विद्यापीठाला सुमारे पाच लाख रुपये मिळतात.विद्यापीठाचा परिसर ८५० एकरांमध्ये पसरलेला आहे. वृक्षांचा आणि मोकळा परिसर असलेल्या ६०० एकर परिसरात गवत उगविते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा ते अज्ञातांकडून पेटविण्याचा प्रकार होतो.

या आगीमुळे झाडांची हानी होते. त्यामुळे विद्यापीठातर्फे दरवर्षी निविदा पद्धतीने या गवताची विक्री केली जाते. त्यातून सुमारे चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. पर्यावरणशास्त्र विभाग, प्रौढ निरंतर शिक्षण विभाग आणि विद्यापीठाच्या मुख्य इमारत परिसरात चिंच आणि लोककला केंद्राच्या मागील बाजूस नारळाची झाडे आहेत. त्यांच्या विक्रीमधून साधारणत: २५ हजार रुपये मिळतात.

हे उत्पन्न विद्यापीठ परिसरातील झाडांच्या संवर्धनासाठी खर्च केले जाते. दरम्यान, गेल्या वर्षी विद्यापीठाने संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या मागील विहिरीच्या परिसरात नारळाची १६१ झाडे लावली. त्यात यावर्षी ४० झाडांची भर पडणार आहे.

आठ नंबरचे प्रवेशद्वार ते क्रांतिवन मार्गावरील दोन्ही बाजूंना चिंचेची आणि मुद्रणालयाच्या परिसरात आवळ्याची प्रत्येकी २०० झाडे लावली आहेत. त्यांतून येत्या काही वर्षांत विद्यापीठातील जैवविविधतेला बळ आणि उत्पन्नवाढीसाठीचा हातभार वाढणार आहे.

सव्वा लाख रोपांची विक्रीविद्यापीठातील वनस्पतिशास्त्र अधिविभागातील लीड बॉटनिकल गार्डनद्वारे स्थानिक, डोंगरी परिसरातील विविध प्रजातींच्या रोपांची नाममात्र दरात विक्री केली जाते. काही सामाजिक संस्थांना ती मोफत दिली जातात.

दरवर्षी विविध रोपांच्या विक्रीतून सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. गेल्या वर्षी विभागाने सव्वा लाख रोपे वितरित केली. त्यातील सुमारे ४० हजार रोपांच्या विक्रीतून दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याचे वनस्पतिशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ. डी. के. गायकवाड यांनी सांगितले.

आग लागून झाडांची हानी होऊ नये म्हणून गवत आणि पक्ष्यांनी खाऊन राहिलेल्या फळांची विक्री केली जाते. पैसे मिळविणे हा त्यामागील उद्देश नाही. जैवविविधतेला बळ देण्यासाठी या वर्षी नारळ, आवळा आणि चिंचेची झाडे लावली आहेत. फळझाडांमध्ये स्थानिक प्रजातींची झाडे आवर्जून लावली जात आहेत.-डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, उद्यान विभाग, शिवाजी विद्यापीठ 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर