शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अपात्र कर्जमाफीचे व्याज देणार, एकरी पन्नास हजार पीककर्ज द्या: हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:39 IST

केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटी व्याजासह परत मिळावेत, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रकरणात विकास संस्थांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक संस्था अनिष्ट दुराव्यात गेल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्हा बॅँकेची सर्वसाधारण सभा-संचालक मंडळ माझ्यासोबत माझ्यावर ‘अविश्वास’ या जन्मात अशक्य! : हसन मुश्रीफ

 कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटी व्याजासह परत मिळावेत, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रकरणात विकास संस्थांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक संस्था अनिष्ट दुराव्यात गेल्या आहेत. जर न्यायालयाने व्याजाची रक्कम दिली नाही तर ती देण्यासाठी बँक तरतूद करेल, अशी ग्वाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.

व्यवसाय वृद्धीसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार असून, त्यामध्ये यशस्वी झालो तर पुढील वर्षी संस्थांना १२ टक्के लाभांश देऊ, असेही त्यांनी सांगितले.जिल्हा बँकेची ८० वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी शाहू सांस्कृतिक मंदिर, शाहू मार्केट यार्ड येथेझाली.त्यावेळी अध्यक्षस्थानावरून मुश्रीफ बोलत होते.

ते म्हणाले, अपात्र कर्जमाफी व नोटाबंदीतून मार्ग काढत अपात्र कर्जमाफीविरोधात सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू असून, २२ आॅक्टोबरला अंतिम निर्णय होईल. अपात्र ११२ कोटी असले तरी गेल्या सहा वर्षांत व्याजाची रक्कमही तेवढीच झाली आहे. मेंबर पातळीवरून ही रक्कम वसूल झालेली नाही; पण बँकेने विकास संस्थांकडून वसूल केल्याने संस्था आर्थिक अडचणीत आल्या. त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी बँकेची आहे.

न्यायालयाने अपात्र रक्कम व्याजासह देण्यास सांगितले तर ‘नाबार्ड’कडून ती वसूल करता येईल; पण त्यांनी नाही दिले तर बँकेच्या नफ्यातून व्याजाची तरतूद केली जाईल. नोटाबंदीतील अजूनही २५ कोटी रिझर्व्ह बँकेने स्वीकारलेले नाहीत. अडचणीतील साखर कारखान्यांना मदत करत असताना ठेवीसह एकूणच व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी मार्केटिंग गतिमान करणार आहे.

साखर कारखान्यांकडून आलेला भरणा चालू अथवा सेव्हिंग खात्यावर पंधरा ते तीन आठवडे तसाच पडून राहतो. त्यामुळे संस्थांना व्याजाचा फटका बसत असल्याची तक्रार रंगराव चिमणे यांच्यासह इतरांनी केली. यावर रकमा ज्या त्यावेळी वर्ग केल्या जातात. तसे आढळल्यास संबंधिताला तत्काळ निलंबित केले जाईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेसाठी एन. ए. प्लॉटची अट आहे ती शिथील करावी, अशी मागणी तानाजी चौगले (सोळांकूर) यांनी केली. पीक कर्ज एकरी ५० हजार रुपये द्यावे, अशी मागणी माणिक पाटील (चुये) यांनी केली. १७ टक्के लाभांश द्या, असे अशोकराव पवार यांनी सूचित केले.

दोनशेवरून तीनशे कोटी अधिकृत भागभांडवल, प्रवेश शुल्क शंभरावरून पाचशे, भागाचा दाखला हवा असल्याने शंभरऐवजी पाचशे रुपये घेण्याबाबत पोटनियम दुरुस्तीस मान्यता देण्यात आली.यावेळी अपात्र ११२ कोटींसाठी लढाई दिल्याबद्दल विकास संस्थांच्यावतीने मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. सुरेश पाटील, अ‍ॅड. विजयसिंह पाटील यांच्यासह बहुतांशी संस्था प्रतिनिधींनी अभिनंदन केले.

अहवाल वाचन बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी केले. उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ संचालक पी. एन. पाटील, निवेदिता माने, पी. जी. शिंदे, अधिकारी, सभासद उपस्थित होते.माझ्यावर ‘अविश्वास’ या जन्मात अशक्य!  हसन मुश्रीफ : संचालक मंडळ माझ्यासोबतकोल्हापूर : गेले दोन-तीन दिवस जिल्हा बॅँकेच्या सत्तेबाबत चर्चा सुरू आहे; पण बॅँकेचे सगळे संचालक माझ्या मागे उभे आहेत. मला बदलायचे झाले तर मी राजीनामा दिला पाहिजे; अन्यथा दोन तृतीयांश संचालकांनी बदलण्याची मागणी करून अविश्वास ठराव आणला पाहिजे. ते या जन्मात अशक्य आहे, असे आव्हान जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी महादेवराव महाडिक यांना दिले.‘गोकुळ’ मल्टिस्टेटवरून माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार मुश्रीफ यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ‘माझ्या एका उडीची गरज आहे. जिल्हा बॅँकेत सत्तांतर होण्यास वेळ लागणार नाही,’ असा इशारा महाडिक यांनी दिला होता. त्याला जिल्हा बॅँकेच्या सर्वसाधारण सभेत मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले.मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात जिल्हा बॅँकेच्या सत्तांतराबाबत चर्चा सुरू आहे; पण बॅँकेचे सगळे संचालक माझ्या पाठीशी आहेत. ते ज्यावेळी सांगतील त्यावेळी क्षणात पायउतार होईन. बॅँकेची अध्यक्ष निवड वर्षाला होत नाही; त्यामुळे एक तर मी राजीनामा दिला पाहिजे किंवा माझ्यावर अविश्वास ठराव आणला पाहिजे. कठीण काळातून आपण बॅँकेला गतवैभव मिळवून दिले आणि आगामी काळात देशातील नंबर वनची बॅँक करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.मुश्रीफ यांनाच ‘दिल्ली’त पाठवाथकबाकीदार संस्थांना मतदानाचा अधिकार द्या, अशी मागणी प्रा. किसन कुराडे यांनी केली; पण ९७ व्या घटनादुरुस्तीने ते शक्य नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगताच ‘पुन्हा घटनादुरुस्तीसाठी मुश्रीफ यांना दिल्लीत पाठवा,’ असे के. पी. पाटील यांनी सांगितले. यावर ‘मला दिल्लीत घालवून हे मंत्री व्हायला मोकळे झाले!’ असा टोला लगावत‘पी. एन. पाटील उभे राहतात का विचारा!’ असे मुश्रीफांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणFarmerशेतकरीbankबँक