शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी ‘जीआय’ मानांकनानुसारच गूळ बनवावा, गणेश हिंगमिरे यांचे आवाहन : बाजार समितीत गूळ विषयावर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 13:31 IST

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या गुळाला मानांकन मिळवून देण्यासाठी बाजार समितीच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘जीआय’ मानांकनानुसार गूळ बनविला तरच त्याला चांगला भाव मिळू शकेल, असा विश्वास शेतीमाल व्यवस्थापन अभ्यासक गणेश हिंगमिरे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांनी ‘जीआय’ मानांकनानुसारच गूळ बनवावा, गणेश हिंगमिरे यांचे आवाहन बाजार समितीत गूळ विषयावर कार्यशाळागुळात साखर घालण्याचे प्रकार टाळावेत

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या गुळाला मानांकन मिळवून देण्यासाठी बाजार समितीच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘जीआय’ मानांकनानुसार गूळ बनविला तरच त्याला चांगला भाव मिळू शकेल, असा विश्वास शेतीमाल व्यवस्थापन अभ्यासक गणेश हिंगमिरे यांनी व्यक्त केला.कोल्हापुरात बाजारसमितीत ‘कोल्हापुरी गुळाला जीआय मानांकन’ या विषयावर गूळ उत्पादकांची कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामध्ये पुण्याचे तज्ज्ञ हिंगमिरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद लाभला.हिंगमिरे म्हणाले, कोल्हापुरी गुळाला पूर्वापार परंपरेनुसार चांगली मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्याभोवतीच्या नद्यांमुळे येथील जमिनीची सुपिकता अधिक आहे. परिणामी, ऊस उत्पादन चांगले होते, उताराही चांगला होतो, त्यामुळे असा ऊस गूळ बनविण्यास उपयुक्त आहे.

या भौगोलिक परिस्थितीनुसार गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने लाभ उठवावा. त्यातून कोल्हापूरच्या गुळाला आधिकाधिक भाव मिळू शकेल तसेच ‘जीआय’ (केंद्राच्या अटीप्रमाणे) चा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने गूळ बनविण्याच्या प्रक्रियेसाठी घालून दिलेल्या अटी, नियमांचे शेतकऱ्यांनी पालन करावे, असेही ते म्हणाले.गुळात वापरले जाणारे रसायन, आर्द्रता यांचे निकषही नियमांनुसारच पाळावेत, असे सांगून हिंगमिरे म्हणाले, ऊस लागवडीपासून ते गूळ बनविण्यापर्यंतची प्रक्रिया ‘जीआय’ नियमानुसार झाल्यास गूळ जास्तीत-जास्त दर्जेदार बनून भावही चांगला मिळेल. ही प्रक्रिया एका शेतकऱ्यांला शक्य नसली तरीही शेतकऱ्यांनी सामुदायिक पद्धतीने गूळ उत्पादन घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.या कार्यशाळेस बाजार समितीचे उपसभापती अमित कांबळे, संचालक परशुराम खुडे, बाबासाहेब खोत, उपसचिव मोहन सालपे, सचिव दिलीप राऊत आदी उपस्थित होते.गुळात साखर घालण्याचे प्रकार टाळावेतहिंगमिरे म्हणाले, अलीकडच्या काळात गूळ बनविताना त्यात साखर घालण्याचे प्रमाण वाढले आहे, पण साखर घालून बनविलेला गूळ हा ‘जीआय’ प्रमाणित मानला जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी असे प्रकार टाळावेत, असेही त्यांनी आवाहन केले. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूर