शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी ‘जीआय’ मानांकनानुसारच गूळ बनवावा, गणेश हिंगमिरे यांचे आवाहन : बाजार समितीत गूळ विषयावर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 13:31 IST

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या गुळाला मानांकन मिळवून देण्यासाठी बाजार समितीच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘जीआय’ मानांकनानुसार गूळ बनविला तरच त्याला चांगला भाव मिळू शकेल, असा विश्वास शेतीमाल व्यवस्थापन अभ्यासक गणेश हिंगमिरे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांनी ‘जीआय’ मानांकनानुसारच गूळ बनवावा, गणेश हिंगमिरे यांचे आवाहन बाजार समितीत गूळ विषयावर कार्यशाळागुळात साखर घालण्याचे प्रकार टाळावेत

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या गुळाला मानांकन मिळवून देण्यासाठी बाजार समितीच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘जीआय’ मानांकनानुसार गूळ बनविला तरच त्याला चांगला भाव मिळू शकेल, असा विश्वास शेतीमाल व्यवस्थापन अभ्यासक गणेश हिंगमिरे यांनी व्यक्त केला.कोल्हापुरात बाजारसमितीत ‘कोल्हापुरी गुळाला जीआय मानांकन’ या विषयावर गूळ उत्पादकांची कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामध्ये पुण्याचे तज्ज्ञ हिंगमिरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद लाभला.हिंगमिरे म्हणाले, कोल्हापुरी गुळाला पूर्वापार परंपरेनुसार चांगली मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्याभोवतीच्या नद्यांमुळे येथील जमिनीची सुपिकता अधिक आहे. परिणामी, ऊस उत्पादन चांगले होते, उताराही चांगला होतो, त्यामुळे असा ऊस गूळ बनविण्यास उपयुक्त आहे.

या भौगोलिक परिस्थितीनुसार गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने लाभ उठवावा. त्यातून कोल्हापूरच्या गुळाला आधिकाधिक भाव मिळू शकेल तसेच ‘जीआय’ (केंद्राच्या अटीप्रमाणे) चा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने गूळ बनविण्याच्या प्रक्रियेसाठी घालून दिलेल्या अटी, नियमांचे शेतकऱ्यांनी पालन करावे, असेही ते म्हणाले.गुळात वापरले जाणारे रसायन, आर्द्रता यांचे निकषही नियमांनुसारच पाळावेत, असे सांगून हिंगमिरे म्हणाले, ऊस लागवडीपासून ते गूळ बनविण्यापर्यंतची प्रक्रिया ‘जीआय’ नियमानुसार झाल्यास गूळ जास्तीत-जास्त दर्जेदार बनून भावही चांगला मिळेल. ही प्रक्रिया एका शेतकऱ्यांला शक्य नसली तरीही शेतकऱ्यांनी सामुदायिक पद्धतीने गूळ उत्पादन घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.या कार्यशाळेस बाजार समितीचे उपसभापती अमित कांबळे, संचालक परशुराम खुडे, बाबासाहेब खोत, उपसचिव मोहन सालपे, सचिव दिलीप राऊत आदी उपस्थित होते.गुळात साखर घालण्याचे प्रकार टाळावेतहिंगमिरे म्हणाले, अलीकडच्या काळात गूळ बनविताना त्यात साखर घालण्याचे प्रमाण वाढले आहे, पण साखर घालून बनविलेला गूळ हा ‘जीआय’ प्रमाणित मानला जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी असे प्रकार टाळावेत, असेही त्यांनी आवाहन केले. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूर