शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

HSC Result2024: विभागात कोल्हापूर जिल्हा अव्वल, सातारा द्वितीय तर सांगलीचा तृत्तीय क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 13:59 IST

साडेआठ हजार विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागाने ९४.२४ टक्के निकालासह राज्यात चौथा क्रमांक पटकाविला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ०.९६ टक्क्यांनी निकालात वाढ झाली असली तरी दोन स्थानांनी विभागाचा क्रमांक घसरला आहे. गतवर्षी कोल्हापूर विभागाने ९३.२८ टक्के निकालासह राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला होता. दरम्यान, कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला. कोल्हापूरचा ९५.६६ टक्के निकाल लागला. सातारा जिल्ह्याने ९३.६३ टक्के गुणांसह द्वितीय, तर ९२.६८ टक्के गुणांसह सांगली तृतीय ठरला.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला. कोल्हापूर विभागाच्या निकालाबाबत मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील ८६१ कनिष्ठ महाविद्यालयांमधील १ लाख १४ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. १७५ केंद्रांवर झालेल्या या परीक्षेत १ लाख ७ हजार ७४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल ९५.६६, सातारा जिल्ह्याचा निकाल ९३.६३ तर सांगली जिल्ह्याचा निकाल ९२.६८ टक्के लागला.

दृष्टिक्षेपात विभागाचा निकालजिल्हा  -   प्रविष्ट विद्यार्थी  -  उत्तीर्ण विद्यार्थी  -  टक्केवारीकोल्हापूर -  ४९२१०  -  ४७०७६  -  ९५.६६सातारा -  ३३७८९  - ३१६३७  - ९३.६३सांगली-   ३१३२० -  २९०२८ -  ९२.६८

मुलींची बाजीकोल्हापूर विभागात ५३ हजार ७८१ मुलींनी बारावीची परीक्षा दिली. यापैकी ५२ हजार १७५ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.०१ टक्के आहे, तर विभागात ६० हजार ५३८ मुलांपैकी ५५ हजार ५६६ मुले उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९१.७८ टक्के इतके आहे.

साडेआठ हजार विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीतविभागात ८ हजार ५६३ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत प्रावीण्यासह प्रथम श्रेणी मिळवली आहे. ३२ हजार ४६२ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले. ५३ हजार ३८ विद्यार्थ्यांनी ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुणांची कमाई केली. ३५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्या १३ हजार ६७८ इतकी आहे. दरम्यान विभागात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इतर जिल्ह्यांपेक्षा कमी आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHSC Exam Resultबारावी निकालSangliसांगलीSatara areaसातारा परिसर