शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

HSC Result2024: विभागात कोल्हापूर जिल्हा अव्वल, सातारा द्वितीय तर सांगलीचा तृत्तीय क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 13:59 IST

साडेआठ हजार विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागाने ९४.२४ टक्के निकालासह राज्यात चौथा क्रमांक पटकाविला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ०.९६ टक्क्यांनी निकालात वाढ झाली असली तरी दोन स्थानांनी विभागाचा क्रमांक घसरला आहे. गतवर्षी कोल्हापूर विभागाने ९३.२८ टक्के निकालासह राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला होता. दरम्यान, कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला. कोल्हापूरचा ९५.६६ टक्के निकाल लागला. सातारा जिल्ह्याने ९३.६३ टक्के गुणांसह द्वितीय, तर ९२.६८ टक्के गुणांसह सांगली तृतीय ठरला.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला. कोल्हापूर विभागाच्या निकालाबाबत मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील ८६१ कनिष्ठ महाविद्यालयांमधील १ लाख १४ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. १७५ केंद्रांवर झालेल्या या परीक्षेत १ लाख ७ हजार ७४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल ९५.६६, सातारा जिल्ह्याचा निकाल ९३.६३ तर सांगली जिल्ह्याचा निकाल ९२.६८ टक्के लागला.

दृष्टिक्षेपात विभागाचा निकालजिल्हा  -   प्रविष्ट विद्यार्थी  -  उत्तीर्ण विद्यार्थी  -  टक्केवारीकोल्हापूर -  ४९२१०  -  ४७०७६  -  ९५.६६सातारा -  ३३७८९  - ३१६३७  - ९३.६३सांगली-   ३१३२० -  २९०२८ -  ९२.६८

मुलींची बाजीकोल्हापूर विभागात ५३ हजार ७८१ मुलींनी बारावीची परीक्षा दिली. यापैकी ५२ हजार १७५ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.०१ टक्के आहे, तर विभागात ६० हजार ५३८ मुलांपैकी ५५ हजार ५६६ मुले उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९१.७८ टक्के इतके आहे.

साडेआठ हजार विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीतविभागात ८ हजार ५६३ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत प्रावीण्यासह प्रथम श्रेणी मिळवली आहे. ३२ हजार ४६२ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले. ५३ हजार ३८ विद्यार्थ्यांनी ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुणांची कमाई केली. ३५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्या १३ हजार ६७८ इतकी आहे. दरम्यान विभागात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इतर जिल्ह्यांपेक्षा कमी आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHSC Exam Resultबारावी निकालSangliसांगलीSatara areaसातारा परिसर