शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कोल्हापूर : नियम मोडणारी देवस्थान समिती बरखास्त करा, पुजारी हटाव संघर्ष समितीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 1:57 PM

कायदा धाब्यावर बसविणारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची पगारी पुजारी कायद्यानुसार स्थापन झालेली  नवी समिती बरखास्त करण्यात यावी व लोकप्रतिनिधींनी पावसाळी अधिवेशनात समितीविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी श्री करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देनियम मोडणारी देवस्थान समिती बरखास्त करापुजारी हटाव संघर्ष समिती, हक्कभंगाच्या कारवाईची मागणी

कोल्हापूर : कायदा धाब्यावर बसविणारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची पगारी पुजारी कायद्यानुसार स्थापन झालेली  नवी समिती बरखास्त करण्यात यावी व लोकप्रतिनिधींनी पावसाळी अधिवेशनात समितीविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी श्री करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत केली.

शासनाने मंजूर केलेल्या पगारी पुजारी कायद्यानुसार नवी समिती स्थापन होऊन त्यांच्याकडे अंबाबाई मंदिराच्या सर्व अधिकारांचे हस्तांतरण होणे गरजेचे आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने आपल्या अधिकारांचा गैरवापर करीत पुजारी नियुक्ती प्रक्रिया सुरू केली आहे. ही जनतेची दिशाभूल आहे. यावेळी डॉ. सुभाष देसाई, दिलीप देसाई व डॉ. जयश्री चव्हाण यांनी पगारी पुजारी नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ते म्हणाले, महाराष्ट्र शासन विधान मंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी अधिकृत केलेले अध्यादेश व केलेले विनियम क्रमांक ३५ हा सन २०१८ च्या महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक १२ एप्रिल २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

त्यानुसार विद्यमान पुजाऱ्यांचे आनुवंशिक हक्क, विशेषाधिकार नाहीसे करण्याचा निर्णय झाला आहे. त्यात कोणताही बदल करायचा असेल, तर शासनाची रीतसर परवानगी घ्यावी लागते. अन्यथा ही कृती बेकायदेशीर ठरून शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर शासनाने कायद्याची ताबडतोब अंमलबजावणी करणे; त्यासाठी कलम ३ च्या पोटकलम (९) अन्वये श्री करवीरनिवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर व्यवस्थापन समिती स्थापन करणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे देवस्थान समितीने मंदिराचे सर्वाधिकार हस्तांतरित करावयाचे आहेत.

मात्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी ‘कायद्यानुुसार पुजारी नेमण्याचे सर्व अधिकार देवस्थान व्यवस्थापन समितीस राहतील,’ असे जाहीर करून दिशाभूल केली आहे. देवस्थान समिती ही सर्वस्वी वेगळी आहे.

पुनर्गठित होणाऱ्या व्यवस्थेवर आपला हक्क सांगणे ही शासनाची, समाजाची आणि भक्तांची घोर फसवणूक आहे.शिवाय, नव्या कायद्याचा आधार घेऊन परंपरागत पुजाऱ्यांना पुन्हा नेमण्याचे कटकारस्थान शिजत आहे. या कायद्यानुसार श्री करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर व्यवस्थापनातील सारे लोकसेवक आहेत, याचे भान ठेवावे. समितीतील शासकीय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालू नये. 

 

टॅग्स :Ambadevi Mandirअंबादेवी संस्थानkolhapurकोल्हापूर