शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

कोल्हापूर : थकीत ‘एफआरपी’ बाबत दोन आठवड्यात निर्णय घ्या, उच्च न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 16:37 IST

साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपी बाबत ‘आंदोलन अंकुश’ संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, यावर दोन आठवड्यात योग्य निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने साखर आयुक्तांना दिले आहेत. अशी माहिती संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देथकीत ‘एफआरपी’ बाबत दोन आठवड्यात निर्णय घ्याउच्च न्यायालयाचे साखर आयुक्तांना आदेश ‘आंदोलन अंकुश’चा पाठपुरावा

कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपी बाबत ‘आंदोलन अंकुश’ संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, यावर दोन आठवड्यात योग्य निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने साखर आयुक्तांना दिले आहेत. अशी माहिती संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.चुडमुंगे म्हणाले, शुगरकेन कंट्रोल कायद्यानुसार ऊस तुटल्यापासून १४ दिवसात एफआरपी प्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहे. याबाबत प्रादेशिक साखर सहसंचालक, साखर आयुक्तांच्या पातळीवर निवेदने दिली, आंदोलने केली पण त्यांनी न्याय दिला नाही. ऊस जाऊन दोन महिने झाले तरी हातात पैसे न आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

यासाठी ‘अंकुश’च्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन आयुक्तांनी दोन आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. चौदा दिवसानंतर १५ टक्के व्याजाने शेतकऱ्यांना पैसे आदा करावे लागणार आहेत.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी ८०० कोटीची एफआरपी थकवली असून त्याचे व्याज ३० कोटी शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे. याबाबत सोमवारी आयुक्तांची भेट घेणार असून दोन आठवड्यात कार्यवाही झाली नाहीतर आयुक्तांविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे. विकास शिखरे, रघूनाथ पाटील, प्रभाकर बंडगर, मनोज राजगिरे, आशाराणी पाटील उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा हातभारन्यायालयीन लढाई करण्यासाठी जिल्ह्यातील आठ ते नऊ हजार शेतकऱ्यांनी वर्गणी काढून दिली होती. त्याच्या माध्यमातून आम्ही लढाई जिंकल्याचे चुडमुंगे यांनी सागिंतले.

यड्रावकर पैसे द्या मग ‘हल्लाबोल’ करा‘शरद’चे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ मधील शेतकऱ्यांची एफआरपी थकवली आणि दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्याचे ढोंग करत आहेत. विनय कोरे जिल्ह्याचे नेते म्हणतात आणि आतापर्यंत केवळ ४७ टक्के एफआरपी दिल्याची टीका चुडमुंगे यांनी केली.

शेट्टींच्या नाद सोडलाहसन मुश्रीफ यांनी जिल्हा बॅँकेत बसून एफआरपीचा कायदा मोडला तरी शेतकऱ्यांचे नेते म्हणणारे गप्प बसल्याचे सांगत गेले वर्षीपासून राजू शेट्टींचे नाव घ्यायचे नाही आणि त्यांच्या रस्त्याला जाणार नसल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी