शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कोल्हापूर : थकीत ‘एफआरपी’ बाबत दोन आठवड्यात निर्णय घ्या, उच्च न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 16:37 IST

साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपी बाबत ‘आंदोलन अंकुश’ संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, यावर दोन आठवड्यात योग्य निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने साखर आयुक्तांना दिले आहेत. अशी माहिती संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देथकीत ‘एफआरपी’ बाबत दोन आठवड्यात निर्णय घ्याउच्च न्यायालयाचे साखर आयुक्तांना आदेश ‘आंदोलन अंकुश’चा पाठपुरावा

कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपी बाबत ‘आंदोलन अंकुश’ संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, यावर दोन आठवड्यात योग्य निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने साखर आयुक्तांना दिले आहेत. अशी माहिती संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.चुडमुंगे म्हणाले, शुगरकेन कंट्रोल कायद्यानुसार ऊस तुटल्यापासून १४ दिवसात एफआरपी प्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहे. याबाबत प्रादेशिक साखर सहसंचालक, साखर आयुक्तांच्या पातळीवर निवेदने दिली, आंदोलने केली पण त्यांनी न्याय दिला नाही. ऊस जाऊन दोन महिने झाले तरी हातात पैसे न आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

यासाठी ‘अंकुश’च्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन आयुक्तांनी दोन आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. चौदा दिवसानंतर १५ टक्के व्याजाने शेतकऱ्यांना पैसे आदा करावे लागणार आहेत.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी ८०० कोटीची एफआरपी थकवली असून त्याचे व्याज ३० कोटी शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे. याबाबत सोमवारी आयुक्तांची भेट घेणार असून दोन आठवड्यात कार्यवाही झाली नाहीतर आयुक्तांविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे. विकास शिखरे, रघूनाथ पाटील, प्रभाकर बंडगर, मनोज राजगिरे, आशाराणी पाटील उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा हातभारन्यायालयीन लढाई करण्यासाठी जिल्ह्यातील आठ ते नऊ हजार शेतकऱ्यांनी वर्गणी काढून दिली होती. त्याच्या माध्यमातून आम्ही लढाई जिंकल्याचे चुडमुंगे यांनी सागिंतले.

यड्रावकर पैसे द्या मग ‘हल्लाबोल’ करा‘शरद’चे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ मधील शेतकऱ्यांची एफआरपी थकवली आणि दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्याचे ढोंग करत आहेत. विनय कोरे जिल्ह्याचे नेते म्हणतात आणि आतापर्यंत केवळ ४७ टक्के एफआरपी दिल्याची टीका चुडमुंगे यांनी केली.

शेट्टींच्या नाद सोडलाहसन मुश्रीफ यांनी जिल्हा बॅँकेत बसून एफआरपीचा कायदा मोडला तरी शेतकऱ्यांचे नेते म्हणणारे गप्प बसल्याचे सांगत गेले वर्षीपासून राजू शेट्टींचे नाव घ्यायचे नाही आणि त्यांच्या रस्त्याला जाणार नसल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी