शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

कोल्हापूर : भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने व्हावेत : अजित वाडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 17:49 IST

क्रिकेटची भारतातील लोकप्रियता पाहता, क्रिकेट जगतात भारत पाकिस्तानच्या एक पाऊल पुढे आहे. त्यामुळे येत्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने व्हावेत, असे मत भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दिव्यांगांच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शाहूपुरी जिमखाना येथे आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देभारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्याशी वार्तालाप दिव्यांगांच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटनदिग्गजांना नवोदितांची भीती : वाडेकर

कोल्हापूर : क्रिकेटची भारतातील लोकप्रियता पाहता, क्रिकेट जगतात भारत पाकिस्तानच्या एक पाऊल पुढे आहे. त्यामुळे येत्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने व्हावेत, असे मत भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दिव्यांगांच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शाहूपुरी जिमखाना येथे आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.वाडेकर म्हणाले, दिव्यांगांसाठीची ही स्पर्धा गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे. या स्पर्धेमधून अनेक नवीन खेळाडू घडत आहेत. आपल्या संघाने बांगलादेश संघाला सामना खेळण्यासाठी आमंत्रित केले आहे, तसेच इंग्लंडमध्ये आपल्या संघाला आमंत्रित करण्यात आले आहे.

२८ राज्यांत दिव्यांग सामने खेळले जातात. प्रत्येक झोनमध्ये ही स्पर्धा घेतली जाते. ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व आलेल्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येते. पूर्वी सॉफ्टबॉलने खेळली जाणारी ही स्पर्धा आता टणक चेंडूने खेळली जाते.आजच्या क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघ सर्वोत्तम बनला आहे. आज आय. पी. एल.सारख्या स्पर्धा क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. चांगल्या नवीन खेळाडूंना या स्पर्धांतून संधी मिळते. मोठ्या खेळाडूंबरोबर खेळल्याने नवीन खेळाडूंना अनुभव मिळतो. भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना भारताने राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्रयस्त ठिकाणी खेळून पाकिस्तानला हरविले तर आनंद होतो; त्यामुळे परदेशात कुठेही भारत व पाकिस्तान यांच्यात सामने व्हावेत. त्यांना सर्वाधिक क्रिकेटप्रेमींची गर्दी होते व ते विविध चित्रवाहिन्यांवर पाहिलेही जातात.खेळाडूंना अधिक आर्थिक लाभ होत असल्याने भविष्यात आणखी मोठ्या संख्येने मुले क्रिकेटकडे वळतील. ‘आयसीसी’चे तत्कालीन अध्यक्ष जगमोहन दालमियांच्या काळात क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आला. त्यामध्ये शरद पवार यांच्या काळात आणखी वाढ झाली. त्याचा फायदा जुन्या व नव्या खेळाडूंना होऊ लागला. यावेळी माजी कसोटीपटू उमेश कुलकर्णी, शाहूपुरी जिमखान्याचे अध्यक्ष विनोद कांबोज, संजय शेट्ये, राजेश पाटील, विजय भोसले, केशव जाधव, गिरीश शेवने, आदी उपस्थित होते.

दिग्गजांना नवोदितांची भीतीवर्षाच्या १२ महिन्यांतील आठ महिने क्रिकेटचे सामने होत आहेत. यात टिकायचे असेल तर तंदुरुस्तीला अधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, युवराज सिंग, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, आदी खेळाडू तंदुरुस्तीवर भर देत आहेत; कारण त्यांना माहीत आहे की, नवोदित आपल्याला पाठीमागे टाकतील. निवड समितीही तंदुरुस्त असणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान देते. त्यामुळे नवोदितांच्या भीतीपोटी दिग्गज खेळाडूही तंदुरुस्तीवर अधिक लक्ष देत आहेत, असेही वाडेकर यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Sportsक्रीडाkolhapurकोल्हापूरCricketक्रिकेट