शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
7
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
8
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
9
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
10
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
11
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
12
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
13
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
14
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
15
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
16
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
17
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
18
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
19
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
20
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने व्हावेत : अजित वाडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 17:49 IST

क्रिकेटची भारतातील लोकप्रियता पाहता, क्रिकेट जगतात भारत पाकिस्तानच्या एक पाऊल पुढे आहे. त्यामुळे येत्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने व्हावेत, असे मत भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दिव्यांगांच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शाहूपुरी जिमखाना येथे आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देभारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्याशी वार्तालाप दिव्यांगांच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटनदिग्गजांना नवोदितांची भीती : वाडेकर

कोल्हापूर : क्रिकेटची भारतातील लोकप्रियता पाहता, क्रिकेट जगतात भारत पाकिस्तानच्या एक पाऊल पुढे आहे. त्यामुळे येत्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने व्हावेत, असे मत भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दिव्यांगांच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शाहूपुरी जिमखाना येथे आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.वाडेकर म्हणाले, दिव्यांगांसाठीची ही स्पर्धा गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे. या स्पर्धेमधून अनेक नवीन खेळाडू घडत आहेत. आपल्या संघाने बांगलादेश संघाला सामना खेळण्यासाठी आमंत्रित केले आहे, तसेच इंग्लंडमध्ये आपल्या संघाला आमंत्रित करण्यात आले आहे.

२८ राज्यांत दिव्यांग सामने खेळले जातात. प्रत्येक झोनमध्ये ही स्पर्धा घेतली जाते. ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व आलेल्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येते. पूर्वी सॉफ्टबॉलने खेळली जाणारी ही स्पर्धा आता टणक चेंडूने खेळली जाते.आजच्या क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघ सर्वोत्तम बनला आहे. आज आय. पी. एल.सारख्या स्पर्धा क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. चांगल्या नवीन खेळाडूंना या स्पर्धांतून संधी मिळते. मोठ्या खेळाडूंबरोबर खेळल्याने नवीन खेळाडूंना अनुभव मिळतो. भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना भारताने राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्रयस्त ठिकाणी खेळून पाकिस्तानला हरविले तर आनंद होतो; त्यामुळे परदेशात कुठेही भारत व पाकिस्तान यांच्यात सामने व्हावेत. त्यांना सर्वाधिक क्रिकेटप्रेमींची गर्दी होते व ते विविध चित्रवाहिन्यांवर पाहिलेही जातात.खेळाडूंना अधिक आर्थिक लाभ होत असल्याने भविष्यात आणखी मोठ्या संख्येने मुले क्रिकेटकडे वळतील. ‘आयसीसी’चे तत्कालीन अध्यक्ष जगमोहन दालमियांच्या काळात क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आला. त्यामध्ये शरद पवार यांच्या काळात आणखी वाढ झाली. त्याचा फायदा जुन्या व नव्या खेळाडूंना होऊ लागला. यावेळी माजी कसोटीपटू उमेश कुलकर्णी, शाहूपुरी जिमखान्याचे अध्यक्ष विनोद कांबोज, संजय शेट्ये, राजेश पाटील, विजय भोसले, केशव जाधव, गिरीश शेवने, आदी उपस्थित होते.

दिग्गजांना नवोदितांची भीतीवर्षाच्या १२ महिन्यांतील आठ महिने क्रिकेटचे सामने होत आहेत. यात टिकायचे असेल तर तंदुरुस्तीला अधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, युवराज सिंग, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, आदी खेळाडू तंदुरुस्तीवर भर देत आहेत; कारण त्यांना माहीत आहे की, नवोदित आपल्याला पाठीमागे टाकतील. निवड समितीही तंदुरुस्त असणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान देते. त्यामुळे नवोदितांच्या भीतीपोटी दिग्गज खेळाडूही तंदुरुस्तीवर अधिक लक्ष देत आहेत, असेही वाडेकर यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Sportsक्रीडाkolhapurकोल्हापूरCricketक्रिकेट