शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
2
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
3
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
4
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
5
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
6
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
7
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
8
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
9
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
10
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
11
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
12
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
13
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
14
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
15
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
16
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
17
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
18
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
19
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
20
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!

कोल्हापूर : आण्णासाहेब पाटील महामंडळाची सहकारी बॅँकांनाही पतहमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:27 IST

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आता राष्ट्रीयीकृत बॅँकांप्रमाणेच सहकारी बॅँकांनाही पतहमी (क्रेडिट गॅरंटी) देणार आहेत. लाभार्थ्यांच्या वयोमर्यादेतही वाढ केली असून, पुरुषांसाठी ५०, तर महिला लाभार्थ्यांसाठी ५५ वर्षे केले आहेत. त्याचबरोबर कर्जाची मर्यादाही वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देआण्णासाहेब पाटील महामंडळाची सहकारी बॅँकांनाही पतहमीलाभार्थ्यांची वयोमर्यादाही वाढवली : दोन व्यक्तींच्या गटालाही आता २५ लाख मिळणार

कोल्हापूर : आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आता राष्ट्रीयीकृत बॅँकांप्रमाणेच सहकारी बॅँकांनाही पतहमी (क्रेडिट गॅरंटी) देणार आहेत. लाभार्थ्यांच्या वयोमर्यादेतही वाढ केली असून, पुरुषांसाठी ५०, तर महिला लाभार्थ्यांसाठी ५५ वर्षे केले आहेत. त्याचबरोबर कर्जाची मर्यादाही वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गटातील युवकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी राज्य सरकारने नोव्हेंबर १९९८ ला आण्णासाहेब पाटील मागास आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली; पण मराठा क्रांती मोर्चानंतर महामंडळाला ऊर्जितावस्थेत आणण्याचे काम सरकारने केले. जुन्या योजना बंद करत असताना, नवीन तीन सुधारित योजना राबविण्याचा निर्णय घेतला.

या योजनांतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या १८ ते ४५ वयोगटातील लाभार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न ८ लाखांच्या आत हवे. राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या माध्यमातून या योजना राबविल्या गेल्या; पण या बॅँका फारसा प्रतिसाद देत नाहीत किंवा त्यांचा विस्तारही खेडोपाडी नसल्याने गेले चार-सहा महिने लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. याबाबत महामंडळाच्या पातळीवर चर्चा होऊन, योजनांचे निकष बदलत असताना जास्तीत जास्त लोकांना लाभ होण्यासाठी शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला.गट कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये पूर्वी १८ ते ४५ वर्षे वयोमर्यादा होती. त्यामध्ये बदल करून, पुरुष लाभार्थ्यांसाठी ५०, तर महिला लाभार्थ्यांसाठी ५५ वर्षे केली आहेत. त्याचबरोबर या योजनेत वैयक्तिक कर्ज खात्यालाच मान्यता देण्यात येत होती. त्याशिवाय एकाच कुटुंबातील (रक्त नाते संबंधातील) व्यक्ती कर्जासाठी सहकर्जदार राहिले असतील, तर अशा कर्ज प्रकरणांना मंजुरी दिली जाणार आहे.

राष्ट्रीयीकृत बॅँकांना क्रेडिट गॅरंटी दिली जात होती, त्यामध्ये बदल करून, मंत्रिमंडळ उपसमितीच्या आदेशानुसार यापुढे राष्ट्रीयीकृत बॅँकांप्रमाणेच सहकारी बॅँकांनाही महामंडळातर्फे क्रेडिट गॅरंटी योजना लागू केली जाणार आहे.गट कर्ज व्याज परतावा योजनेत किमान पाच व्यक्तींच्या गटाला, किमान १0 लाख ते कमाल ५० लाखांच्या कर्जावरील व्याज परतावा दिला जात होता.

त्यामध्ये बदल करून, दोन व्यक्तींसाठी किमान २५ लाख, तीन व्यक्तींसाठी ३५ लाख, चार व्यक्तींसाठी ४५ लाख, तर पाच व पाचपेक्षा अधिक व्यक्ती असल्यास ५० लाखांच्या मर्यादेवरील कर्जावर व्याज परतावा महामंडळ करणार आहे. महिला बचत गटांसाठी असलेली कमाल वयाची अट वगळण्यात आली आहे.

योजनांच्या विस्तारासाठी प्रतिनिधींची नेमणूकमहामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनांची माहिती जास्तीत जास्त लोकांना व्हावी, यासाठी एलआयसी एजंटाप्रमाणे तालुका पातळीवर प्रतिनिधीही नेमले जाणार आहेत.

मराठ्यांना जातीचा दाखला जोडणे अनिवार्ययो योजनेंतर्गत मराठा समाजाला जास्तीत जास्त लाभ देण्याच्या दृष्टीने १ फेबु्रवारी २०१९ पासून मराठा समाजातील सर्व लाभार्थ्यांनी जातीचा दाखला अपलोड करणे अनिवार्य केले आहे.

सहकारी बॅँकांना पतहमी देण्याचा निर्णय झाल्याने आता प्रलंबित कर्ज प्रकरणांना गती येईल. लवकरच याबाबतचे परिपत्रक बॅँकांना येणार असून, ग्रामीण भागातील जास्तीत जास्त युवकांना लाभ देण्याचा प्रयत्न राहील.- संजय पवार, उपाध्यक्ष, आण्णासाहेब पाटील महामंडळ 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर