शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : साखर उद्योगाला जाहीर केलेल्या दराची चिंता, गाळप वाढणार : तीस टक्के हंगाम आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 10:57 IST

एका बाजूला उसाचे गाळप वाढणार आहे व त्याचवेळेला बाजारातील साखरेचे दर घसरत असल्याने एफआरपीपेक्षा जादा रक्कम ज्या कारखान्यांनी जाहीर केली आहे, त्यातील अनेक कारखान्यांना ही रक्कम देताना चांगलाच घाम फुटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा बफर साठा करून बाजारातील साखरेचे दर नियंत्रित करण्याची मागणी पुढे आली आहे.

ठळक मुद्दे अनेक कारखान्यांना एफआरपीपेक्षा जादा रक्कम देताना घाम फुटण्याची चिन्हे साखरेचा बफर साठा करून बाजारातील साखरेचे दर नियंत्रित करण्याची मागणी ६८० लाख टन गाळप, ७५ लाखांहून जास्त टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज

विश्वास पाटील 

कोल्हापूर : एका बाजूला उसाचे गाळप वाढणार आहे व त्याचवेळेला बाजारातील साखरेचे दर घसरत असल्याने एफआरपीपेक्षा जादा रक्कम ज्या कारखान्यांनी जाहीर केली आहे, त्यातील अनेक कारखान्यांना ही रक्कम देताना चांगलाच घाम फुटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा बफर साठा करून बाजारातील साखरेचे दर नियंत्रित करण्याची मागणी पुढे आली आहे.राज्यातील यंदाचा हंगाम तीस टक्के संपला आहे. यंदा सरकारने ६३० लाख गाळप टनाचा अंदाज केला होता; परंतु नोव्हेंबरपर्यंत लांबलेला परतीच्या पावसामुळे यंदा किमान ५० लाख टन गाळप वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुख्यत: सोलापूर जिल्ह्यात व मराठवाड्यात हे गाळप वाढणार आहे. नव्या अंदाजानुसार ६८० लाख टन गाळप व ७५ लाखांहून जास्त टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.भविष्यात साखरेचे दर चांगले राहतील असे गृहीत धरून कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केले आहे; परंतु साखरेचे दर ३ हजारांवर आल्यावर तेवढीच पहिली उचल देताना कारखान्यांची दमछाकच होणार आहे. इतर बिले थांबवून कारखाने तूर्त काहीतरी व्यवस्था करू शकतील परंतु दर घसरला तर राज्य बँकेकडून मिळणारी उचल कमी होणार असून कारखान्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

 

बाजारातील साखरेचे दर वाढू नयेत याची काळजी घेण्याऱ्या केंद्र सरकारने कारखान्यांना किमान ३५०० रुपये क्विंटल दर मिळायला हवा याची दक्षता घेतली पाहिजे. यासाठी निर्यातीस प्रोत्साहन किंवा बफर साठा करून बाजारातील दर घसरू नयेत यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.विजय औताडेसाखर उद्योगातील तज्ज्ञ

 

हंगामाचे असेही वैशिष्ट्ययंदाच्या हंगामात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २९ कारखाने वाढले आहेत. त्यामध्ये सहकारी १० व खासगी १९ वाढले. प्रतिदिन गाळपही १ लाख ५४ हजार टनांनी वाढले. अनेक कारखान्यांनी विस्तारीकरण केल्याचा हा परिणाम आहे. आतापर्यंत १ कोटी टनांचे गाळप जास्त झाले आहे. परतीच्या पावसामुळे टनेज वाढले परंतु उतारा मात्र पाँईट २ ने घसरला आहे.राज्यातील १८ डिसेंबरअखेरचे गाळपविभाग       हंगाम सुरू झालेले कारखाने      गाळप (लाख टन)      साखर उत्पादन (लाख टन)    उतारा टक्के(कंसातील आकडे खासगी कारखान्यांचे)

  1. कोल्हापूर            २६ (११)                                  ६७.२२                                ७.४६                              ११.११
  2. पुणे                     ३०(३०)                                  ११२.४०                              ११.२६                            १०.०३
  3. अहमदनगर        १५ (०९)                                 ३९.९५                                 ०३.७२                            ०९.३३
  4. औरंगाबाद           ११(०९)                                 २३.९१                                  ०१.९४                           ०८.१३
  5. नांदेड                  १४(१५)                                  ३५.३९                                  ०३.६८                           ०९.२४
  6. अमरावती           ०० (०२)                                 ०२.१७                                  ००.०२                           ०९.५०
  7. नागपूर               ०० (०४)                                 ०१.७१                                  ००.०१                           ०८.४२

एकूण                    १४७ (६१)                             २८२.७६                              २८.२९                         ०९.९१ 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर