शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

कोल्हापूर : साखर उद्योगाला जाहीर केलेल्या दराची चिंता, गाळप वाढणार : तीस टक्के हंगाम आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 10:57 IST

एका बाजूला उसाचे गाळप वाढणार आहे व त्याचवेळेला बाजारातील साखरेचे दर घसरत असल्याने एफआरपीपेक्षा जादा रक्कम ज्या कारखान्यांनी जाहीर केली आहे, त्यातील अनेक कारखान्यांना ही रक्कम देताना चांगलाच घाम फुटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा बफर साठा करून बाजारातील साखरेचे दर नियंत्रित करण्याची मागणी पुढे आली आहे.

ठळक मुद्दे अनेक कारखान्यांना एफआरपीपेक्षा जादा रक्कम देताना घाम फुटण्याची चिन्हे साखरेचा बफर साठा करून बाजारातील साखरेचे दर नियंत्रित करण्याची मागणी ६८० लाख टन गाळप, ७५ लाखांहून जास्त टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज

विश्वास पाटील 

कोल्हापूर : एका बाजूला उसाचे गाळप वाढणार आहे व त्याचवेळेला बाजारातील साखरेचे दर घसरत असल्याने एफआरपीपेक्षा जादा रक्कम ज्या कारखान्यांनी जाहीर केली आहे, त्यातील अनेक कारखान्यांना ही रक्कम देताना चांगलाच घाम फुटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा बफर साठा करून बाजारातील साखरेचे दर नियंत्रित करण्याची मागणी पुढे आली आहे.राज्यातील यंदाचा हंगाम तीस टक्के संपला आहे. यंदा सरकारने ६३० लाख गाळप टनाचा अंदाज केला होता; परंतु नोव्हेंबरपर्यंत लांबलेला परतीच्या पावसामुळे यंदा किमान ५० लाख टन गाळप वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुख्यत: सोलापूर जिल्ह्यात व मराठवाड्यात हे गाळप वाढणार आहे. नव्या अंदाजानुसार ६८० लाख टन गाळप व ७५ लाखांहून जास्त टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.भविष्यात साखरेचे दर चांगले राहतील असे गृहीत धरून कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केले आहे; परंतु साखरेचे दर ३ हजारांवर आल्यावर तेवढीच पहिली उचल देताना कारखान्यांची दमछाकच होणार आहे. इतर बिले थांबवून कारखाने तूर्त काहीतरी व्यवस्था करू शकतील परंतु दर घसरला तर राज्य बँकेकडून मिळणारी उचल कमी होणार असून कारखान्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

 

बाजारातील साखरेचे दर वाढू नयेत याची काळजी घेण्याऱ्या केंद्र सरकारने कारखान्यांना किमान ३५०० रुपये क्विंटल दर मिळायला हवा याची दक्षता घेतली पाहिजे. यासाठी निर्यातीस प्रोत्साहन किंवा बफर साठा करून बाजारातील दर घसरू नयेत यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.विजय औताडेसाखर उद्योगातील तज्ज्ञ

 

हंगामाचे असेही वैशिष्ट्ययंदाच्या हंगामात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २९ कारखाने वाढले आहेत. त्यामध्ये सहकारी १० व खासगी १९ वाढले. प्रतिदिन गाळपही १ लाख ५४ हजार टनांनी वाढले. अनेक कारखान्यांनी विस्तारीकरण केल्याचा हा परिणाम आहे. आतापर्यंत १ कोटी टनांचे गाळप जास्त झाले आहे. परतीच्या पावसामुळे टनेज वाढले परंतु उतारा मात्र पाँईट २ ने घसरला आहे.राज्यातील १८ डिसेंबरअखेरचे गाळपविभाग       हंगाम सुरू झालेले कारखाने      गाळप (लाख टन)      साखर उत्पादन (लाख टन)    उतारा टक्के(कंसातील आकडे खासगी कारखान्यांचे)

  1. कोल्हापूर            २६ (११)                                  ६७.२२                                ७.४६                              ११.११
  2. पुणे                     ३०(३०)                                  ११२.४०                              ११.२६                            १०.०३
  3. अहमदनगर        १५ (०९)                                 ३९.९५                                 ०३.७२                            ०९.३३
  4. औरंगाबाद           ११(०९)                                 २३.९१                                  ०१.९४                           ०८.१३
  5. नांदेड                  १४(१५)                                  ३५.३९                                  ०३.६८                           ०९.२४
  6. अमरावती           ०० (०२)                                 ०२.१७                                  ००.०२                           ०९.५०
  7. नागपूर               ०० (०४)                                 ०१.७१                                  ००.०१                           ०८.४२

एकूण                    १४७ (६१)                             २८२.७६                              २८.२९                         ०९.९१ 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर