शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Raksha Bandhan : सैनिकांसाठी दोन लाख राख्यांचे संकलन, कोल्हापुरातील विवेकानंद ट्रस्टचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:00 IST

माझा भाऊ सीमेवर लढताना शहीद झाला, याचे जरी व्यक्तिगत दु:ख असले, तरी आम्हा सर्व कुटुंबीयांना त्याचा सार्थ अभिमान आहे. प्रत्येक घरात ‘कौस्तुभ’ जन्माला आला पाहिजे, असे प्रतिपादन शहीद मेजर कौस्तुभ राणें यांची बहिण अश्विनी तावडे यांनी केले.

ठळक मुद्देसैनिकांसाठी दोन लाख राख्यांचे संकलन, विवेकानंद ट्रस्टचा उपक्रम प्रत्येक घरात ‘कौस्तुभ’ जन्मावा : तावडे

कोल्हापूर : माझा भाऊ सीमेवर लढताना शहीद झाला, याचे जरी व्यक्तिगत दु:ख असले, तरी आम्हा सर्व कुटुंबीयांना त्याचा सार्थ अभिमान आहे. एकीकडे तरुण सैनिक सीमेवर शहीद होत आहेत, तर दुसरीकडे व्यसनाच्या नशेत अनेक तरुण जीवन संपवत आहेत. समाजातील ही स्थिती बदलली पाहिजे. प्रत्येक घरात ‘कौस्तुभ’ जन्माला आला पाहिजे, असे प्रतिपादन शहीद मेजर कौस्तुभ राणें यांची बहिण अश्विनी तावडे यांनी केले.

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सीमेवरील जवानांसाठी रक्षाबंधनासाठी संकलित केलेल्या राखी पाठविण्याच्या उपक्रमात महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते जवानांना राख्या बांधण्यात आल्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)

शाहू स्मारक भवनात स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सीमेवरील जवानांकरिता रक्षाबंधनासाठी संकलन केलेल्या राखी पाठविण्याच्या उपक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या. शहीद कुंडलिक माने यांच्या आई ज्ञानूबाई माने, वडील केरबा माने, निवृत्त सुभेदार एन. एन. पाटील उपस्थित होते.

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सीमेवरील जवानांसाठी रक्षाबंधनासाठी संकलित केलेल्या राखी पाठविण्याच्या उपक्रमात शालेय विद्यार्थिनींनी जवानांना राख्या बांधल्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)

महापौर बोंद्रे म्हणाल्या, ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम कौतुकास्पद आहे. छत्रपती ताराराणी मुलींसाठी, सैनिक स्कूलसाठी कटिबद्ध राहू. ज्ञानूबाई माने म्हणाल्या, ‘मुलाच्या जाण्याचे दु:ख आहे; पण एक मुलगा शहीद झाला म्हणून काय झाले? देशरक्षणासाठी गरज पडल्यास माझ्या नातवंडांनाही सीमेवर पाठवायला मी कमी करणार नाही.’कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘बॉर्डर’ विषयावर नाटिका सादर केली. शाहू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, ‘मर्द मराठे खरे’ हे गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते मराठा बटालियनचे लेफ्टनंट तानाजी चौगुले यांच्याकडे संकलित केलेल्या सुमारे दोन लाख राख्या सुपूर्द करण्यात आल्या. ‘शिवगंधार’ प्रस्तुत ‘वंदे मातरम्’ या देशभक्तिपर गीतांवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आला.

देशभक्तिपर गाण्यांनी कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढविला. महिलांनी मराठा बटालियनच्या जवानांना औक्षण करीत राखी बांधली; त्यामुळे वातावरण भावपूर्ण बनले. संयोजक किशोर घाटगे यांनी प्रास्ताविक केले.

सुखदेव गिरी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, डॉ. सायली कचरे, अंकुश टोपले, माधुरी नकाते, विशाल देवकुळे, सीमा मकोटे, धनंजय नामजोशी, रघुनाथ टिपुगडे, कमलाकर किलकिले, यशश्री घाटगे, आनंद गुरव, युवराज जाधव, सुनील सामंत उपस्थित होते. 

 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनkolhapurकोल्हापूर