शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

Raksha Bandhan : सैनिकांसाठी दोन लाख राख्यांचे संकलन, कोल्हापुरातील विवेकानंद ट्रस्टचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:00 IST

माझा भाऊ सीमेवर लढताना शहीद झाला, याचे जरी व्यक्तिगत दु:ख असले, तरी आम्हा सर्व कुटुंबीयांना त्याचा सार्थ अभिमान आहे. प्रत्येक घरात ‘कौस्तुभ’ जन्माला आला पाहिजे, असे प्रतिपादन शहीद मेजर कौस्तुभ राणें यांची बहिण अश्विनी तावडे यांनी केले.

ठळक मुद्देसैनिकांसाठी दोन लाख राख्यांचे संकलन, विवेकानंद ट्रस्टचा उपक्रम प्रत्येक घरात ‘कौस्तुभ’ जन्मावा : तावडे

कोल्हापूर : माझा भाऊ सीमेवर लढताना शहीद झाला, याचे जरी व्यक्तिगत दु:ख असले, तरी आम्हा सर्व कुटुंबीयांना त्याचा सार्थ अभिमान आहे. एकीकडे तरुण सैनिक सीमेवर शहीद होत आहेत, तर दुसरीकडे व्यसनाच्या नशेत अनेक तरुण जीवन संपवत आहेत. समाजातील ही स्थिती बदलली पाहिजे. प्रत्येक घरात ‘कौस्तुभ’ जन्माला आला पाहिजे, असे प्रतिपादन शहीद मेजर कौस्तुभ राणें यांची बहिण अश्विनी तावडे यांनी केले.

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सीमेवरील जवानांसाठी रक्षाबंधनासाठी संकलित केलेल्या राखी पाठविण्याच्या उपक्रमात महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते जवानांना राख्या बांधण्यात आल्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)

शाहू स्मारक भवनात स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सीमेवरील जवानांकरिता रक्षाबंधनासाठी संकलन केलेल्या राखी पाठविण्याच्या उपक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या. शहीद कुंडलिक माने यांच्या आई ज्ञानूबाई माने, वडील केरबा माने, निवृत्त सुभेदार एन. एन. पाटील उपस्थित होते.

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सीमेवरील जवानांसाठी रक्षाबंधनासाठी संकलित केलेल्या राखी पाठविण्याच्या उपक्रमात शालेय विद्यार्थिनींनी जवानांना राख्या बांधल्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)

महापौर बोंद्रे म्हणाल्या, ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम कौतुकास्पद आहे. छत्रपती ताराराणी मुलींसाठी, सैनिक स्कूलसाठी कटिबद्ध राहू. ज्ञानूबाई माने म्हणाल्या, ‘मुलाच्या जाण्याचे दु:ख आहे; पण एक मुलगा शहीद झाला म्हणून काय झाले? देशरक्षणासाठी गरज पडल्यास माझ्या नातवंडांनाही सीमेवर पाठवायला मी कमी करणार नाही.’कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘बॉर्डर’ विषयावर नाटिका सादर केली. शाहू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, ‘मर्द मराठे खरे’ हे गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते मराठा बटालियनचे लेफ्टनंट तानाजी चौगुले यांच्याकडे संकलित केलेल्या सुमारे दोन लाख राख्या सुपूर्द करण्यात आल्या. ‘शिवगंधार’ प्रस्तुत ‘वंदे मातरम्’ या देशभक्तिपर गीतांवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आला.

देशभक्तिपर गाण्यांनी कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढविला. महिलांनी मराठा बटालियनच्या जवानांना औक्षण करीत राखी बांधली; त्यामुळे वातावरण भावपूर्ण बनले. संयोजक किशोर घाटगे यांनी प्रास्ताविक केले.

सुखदेव गिरी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, डॉ. सायली कचरे, अंकुश टोपले, माधुरी नकाते, विशाल देवकुळे, सीमा मकोटे, धनंजय नामजोशी, रघुनाथ टिपुगडे, कमलाकर किलकिले, यशश्री घाटगे, आनंद गुरव, युवराज जाधव, सुनील सामंत उपस्थित होते. 

 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनkolhapurकोल्हापूर